शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाच्या माहेरघरात शिक्षक दारोदार

By admin | Updated: June 5, 2015 01:17 IST

नुकताच १२ वी व १० वीच्या सीबीएसईचा निकाल लागला. जिल्ह्यात १२ वीत प्रथम नेहा सिंग या विद्यार्थिनीने व १० वीत प्रथमेश दहीकर याने प्रथम येऊन

शिक्षकांच्या उन्हाळी सुट्या नावापुरत्या: कॉन्व्हेंटमध्ये प्रवेशासाठी प्रचंड गर्दीब्रह्मपुरी: नुकताच १२ वी व १० वीच्या सीबीएसईचा निकाल लागला. जिल्ह्यात १२ वीत प्रथम नेहा सिंग या विद्यार्थिनीने व १० वीत प्रथमेश दहीकर याने प्रथम येऊन ब्रह्मपुरी शिक्षणाचे माहेरघर आहे, हे सिद्ध करुन दाखविले आहे. परंतु दुसरीकडे शिक्षणाच्या माहेरघरातील शिक्षक प्रवेशासाठी दारोदार फिरत असल्याने विषमतेचे चित्र निर्माण झाले आहे.तालुक्यात १२ वीचा निकाल समाधानकारक आहे. परंतु तालुक्यातील बहुतांश शाळा व महाविद्यालयात प्रवेशासाठी अजूनही फिरावे लागत असल्याने शिक्षकांच्या उन्हाळी सुट्ट्यांवर पाणी फिरल्या गेले आहे. महाविद्यालयातील प्रवेशासाठी असे चित्र पूर्वी दिसत नव्हते. अलिकडे प्राध्यापकांनाही फिरावे लागत असल्याने विद्यार्थ्यांचे भाव गगनाला भिडले आहे. शिक्षक दारोदारी जात असल्याने शिक्षकांप्रति विद्यार्थ्यांच्या मनात आदरभाव नसल्याचे अनेक शिक्षकांचे मत आहे. प्राचार्य उंटावरुन शेळ्या हाकण्यापलीकडे कुलरच्या बाहेर पडत नाही. परंतु शिक्षकांना प्रवेशासाठी बाहेर जाऊन फिरावेच लागेल, असा बडगा मानगुटीवर बसवला जात आहे. अनेक प्राचार्यांना शहरात किंवा गावखेड्यात पाहिले जात नाही.केवळ त्या शिक्षकाच्या भरवश्यावर प्रवेश आणले जात असल्याने प्राचार्यपद शोभेचे बनले असल्याचे शिक्षकांकडूनच आता बोलले जात आहे. शिक्षक दारोदार फिरुनही त्यालाच प्रवेशासाठी दोषी ठरविण्याचीही भूमिका वरिष्ठाकडून ठरवून अपमानीत करण्याचाही प्रयत्न केला जात असल्याने शिक्षणाच्या माहेरघरात शिक्षकांची व्यवस्था ‘आयाराम गयाराम’ प्रकाराची बनलेली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी बहुतांश पालक कॉन्व्हेंटच्या प्रचंड रांगेत उभा राहून प्रवेश घेण्यासाठी धडपत असतात. पण दारावर आलेल्या शिक्षकाला प्रतिसाद न देता आल्यापावली अपमानित केले जाते.अशी विषम स्थिती प्रवेशासाठी निर्माण झाली आहे. कॉन्व्हेंटच्या प्रवेश शुल्कावर कुठलेही निर्बंध नाही. मासिक फी दरवर्षी वाढविली जात आहे. तरीपण या लुटमार प्रकाराकडे श्क्षिणाधिकाऱ्यांचा कानाडोळा होत आहे. दरवर्षी प्रवेश फी पाच हजाराच्या वरुन घेतली जात असल्याने मध्यवर्गीयाचे शिक्षणनगरीत आर्थिक कंबरडे मोडत आहे. (तालुका प्रतिनिधी)‘ढ’ विद्यार्थ्यांवर गडांतरशाळेत १०० टक्के निकाल लावण्याची स्पर्धा लागली असून कुमकुवत मुलांना निकाल लावण्याच्या नादात काढण्याचे फर्मानही शाळांकडून काढले जात असल्याने शिक्षणाच्या माहेरघरात विद्यार्थ्यांची ही दशा घडून येत आहे. यावरही कोणाचेही निर्बंध नाही. शाळेत शिक्षकांकडून अनेक कामे करवून घेतली जात असते. परंतु पगार अल्प असल्याने शिक्षणाचा स्तर खालावला जात असतो. अनेक खाजगी शाळेत श्क्षिकांचे आर्थिक शोषणही होताना दिसून येत आहे. शहरात अनेक खाजगी वर्ग सुरु आहेत. तेथेही नियमित शिक्षक संगनमताने शिकवणी वर्ग सुरु ठेवून अमाप पैसा लाटत आहेत तर दुसरीकडे बेरोजगार अल्पशा पगारावर काम करीत असल्याने त्यांचे आर्थिक शोषण होताना दिसून येत आहे. शिक्षणाच्या माहेरघरात विद्यार्थ्यांच्या भरवश्यावर यश संपादन करुन शाळेचा नाव मोठा करण्यासाठी हा प्रकार सुरु झाला आहे. शिक्षण विभाग मात्र याकडे अजिबात दुर्लक्ष करीत आहे. शिक्षणात अग्रेसर असलेली नगरी पैशाच्या जोरावर समोर जात असली तरी शिक्षकाची स्थिती मात्र केविलवाणी आहे.