शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

अध्यापन करताना शिक्षकांना स्वातंत्र्य द्यायला हवे : वसंत पुरके

By admin | Updated: January 18, 2016 00:57 IST

शिक्षण ही निरंतन चालणारी प्रक्रिया आहे. शिक्षणात हे विविध कलागुणांचा संगम असला पाहिजे. शिक्षकांना अध्यापन करताना स्वातंत्र्य द्यायला हवे,

वरोरा : शिक्षण ही निरंतन चालणारी प्रक्रिया आहे. शिक्षणात हे विविध कलागुणांचा संगम असला पाहिजे. शिक्षकांना अध्यापन करताना स्वातंत्र्य द्यायला हवे, मात्र शिक्षकांनी समाजात जबाबदारपणे वागायला पाहिजे याकरिता शिक्षकांची गुणवत्ता वाढणे आवश्यक आहे. जे शिक्षक प्रामाणिकपणे शिकवितात त्यांचे कौतुक व्हायला पाहिजे, असे मत राज्याचे माजी शिक्षण मंत्री प्रा.वसंत पुरके यांनी केले. ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ व कर्मविर विद्यालय वरोराच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ‘सध्याच्या शिक्षणाची दशा व दिशा’ या विषयावर आयोजित परिसंवादामध्ये ते बोलत होते. यावेळी ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संजय देवतळे, लोक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव ना.गो. थुटे, दिशा एज्युकेशन पार्इंटचे संचालक रूपेश घागी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. अध्यापन हे पवित्र कार्य आहे. खरा अध्यापक विद्यार्थ्यांमधील चांगल्या गुणांना सतत शोध घेत असतो व त्यांच्या विकासात चालना देतो, म्हणून तो समाजाला संजीवनी देवू शकतो आणि मुलांचे भविष्य घडवू शकतो. व्यक्तीच्या आचार विचारात होणारे बदल म्हणजे शिक्षण आणि व्यक्ती वर्तनातील चांगल्या गुणांचे शिक्षण म्हणजे सतपरिवर्तन. हे सतपरिवर्तन शिक्षणातून येते, असे मत प्रा.वसंत पुरके यांनी व्यक्त केले. शिक्षकांनी अध्यापनात नवीन तंत्राचा वापर करावा आणि वाचनावर भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी सेवानिवृत्त व गुणवंत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. संचालन, आभार शेंडे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)