शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

अध्यापन करताना शिक्षकांना स्वातंत्र्य द्यायला हवे : वसंत पुरके

By admin | Updated: January 18, 2016 00:57 IST

शिक्षण ही निरंतन चालणारी प्रक्रिया आहे. शिक्षणात हे विविध कलागुणांचा संगम असला पाहिजे. शिक्षकांना अध्यापन करताना स्वातंत्र्य द्यायला हवे,

वरोरा : शिक्षण ही निरंतन चालणारी प्रक्रिया आहे. शिक्षणात हे विविध कलागुणांचा संगम असला पाहिजे. शिक्षकांना अध्यापन करताना स्वातंत्र्य द्यायला हवे, मात्र शिक्षकांनी समाजात जबाबदारपणे वागायला पाहिजे याकरिता शिक्षकांची गुणवत्ता वाढणे आवश्यक आहे. जे शिक्षक प्रामाणिकपणे शिकवितात त्यांचे कौतुक व्हायला पाहिजे, असे मत राज्याचे माजी शिक्षण मंत्री प्रा.वसंत पुरके यांनी केले. ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ व कर्मविर विद्यालय वरोराच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ‘सध्याच्या शिक्षणाची दशा व दिशा’ या विषयावर आयोजित परिसंवादामध्ये ते बोलत होते. यावेळी ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संजय देवतळे, लोक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव ना.गो. थुटे, दिशा एज्युकेशन पार्इंटचे संचालक रूपेश घागी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. अध्यापन हे पवित्र कार्य आहे. खरा अध्यापक विद्यार्थ्यांमधील चांगल्या गुणांना सतत शोध घेत असतो व त्यांच्या विकासात चालना देतो, म्हणून तो समाजाला संजीवनी देवू शकतो आणि मुलांचे भविष्य घडवू शकतो. व्यक्तीच्या आचार विचारात होणारे बदल म्हणजे शिक्षण आणि व्यक्ती वर्तनातील चांगल्या गुणांचे शिक्षण म्हणजे सतपरिवर्तन. हे सतपरिवर्तन शिक्षणातून येते, असे मत प्रा.वसंत पुरके यांनी व्यक्त केले. शिक्षकांनी अध्यापनात नवीन तंत्राचा वापर करावा आणि वाचनावर भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी सेवानिवृत्त व गुणवंत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. संचालन, आभार शेंडे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)