शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

वन्यप्राण्यांच्या दहशतीखाली सुरू आहे तेंदूपत्ता संकलन

By admin | Updated: May 20, 2015 01:45 IST

एका महिन्यापुरता का होईना, हजारो कुटुंबाना रोजगार देणाऱ्या तेंदूपत्ता तोडाईच्या कामाला चंद्रपूर जिल्ह्यात सुरुवात झाली आहे.

विरुर (स्टे.) : एका महिन्यापुरता का होईना, हजारो कुटुंबाना रोजगार देणाऱ्या तेंदूपत्ता तोडाईच्या कामाला चंद्रपूर जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. मात्र वन्यप्राण्यांच्या दहशतीखाली हजारो मजूर जंगलात तेंदूपत्ता तोडतानाचे दृष्य बघायला मिळत आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात उन्हाळ्यात तेंदूपत्ता गोळा करणे हाच व्यवसाय आहे. उन्हाळा आला की, कंत्राटदाराच्या दिवाणजीचे निमंत्रण केव्हा येते, याची ही कुटुंबे चातकासारखी वाट बघतात. ग्रामीण भागात उन्हाळ्यात शेतीची कामे संपल्याने तसेच मजुरांना रोजगार मिळत नसल्याने गेल्या कित्येक वर्षांपासून तेंदूपत्ताचा व्यवसाय अविरत सुरू आहे. यासाठी प्रत्येक कार्यालयात तेंदू विभाग असतो. या भागात तेंदू हंगामाला मे महिन्यात प्रत्यक्ष सुरूवात होते. १५ ते २० दिवसांचा हा हंगाम असतो. हा हंगाम सुरू होण्यापूर्वी आॅक्टोबर महिन्यात तेंदू युनिटच्या लिलावाची जाहिरात विविध वर्तमानपत्रातून प्रसिद्ध होेते.यानंतर आंध्रप्रदेश, छत्तीसगड या राज्यातील बडे कंत्राटदार आदिवासीबहुल भागात लिलावासाठी दाखल होतात. वनविभागाने तेंदू युनिटचा लिलाव केल्यानंतर मे महिन्यात तेंदू संकलनाच्या कामाला सुरुवात होते. शेतीच्या हंगामाच्या काळात शेतीवर राबायचे व उन्हाळ्यात मात्र दिवसभर या तोडाईच्या कामात स्वत:ला गुंतवून घेऊन चार पैसे जमवायचे, असा क्रमच जणू ठरुन गेला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो कुटुंब जादा पैसे मिळावे म्हणून या तेंदू संकलनाच्या काळात गडचिरोली जिल्ह्यात दाखल होतात. या जिल्ह्यातील आदिवासी जनता हेच काम करतात. पण येथे काम जास्त व हात कमी अशी स्थिती असते म्हणून कंत्राटदार बाहेरुन मजूर आणतात. तेंदू पानाचे काय करतात. हे शहरी भागातील लोकांना माहिती नसेल. शहरातील लोकांना सिगारेट परिचयाची आहे. मात्र बिडीची त्यांना ओळख नाही. ग्रामीण भागातील लोकांना सिगारेट ओढणे परवडत नाही म्हणून ते बिडी पितात. ग्रामीण भागात बिडी प्रसिद्ध आहे. तेंदूच्या पानापासून बिडी तयार करण्यात येते.आदिवासी कुटुंबातील लहान मुलांपासून ते वृद्धापर्यंतचे लोक तेंदू संकलनाचे काम करतात. मुलामुलींचे लग्न, शिक्षण, आरोग्य, सावकारांचे देणे, वर्षभराचे आर्थिक नियोजन आदी विविध कामे तेंदूच्या मजुरीतूनच करण्यात येतात. तेंदू वेचताना सत्तर पानांचा एक पुडा याप्रमाणे एका मजुराला दिवसाला शंभर पुडके करुन द्यावे लागतात. काही कंत्राटदार मजुरांची आर्थिक लूट देखील करतात. तेंदुपत्ता व्यवसायात उद्योजक कोट्यावधीश झाले तर तेंदू संकलनाचे काम करणारे मजुर मात्र आजही अर्धपोटी राहत आहे. हा तेंदूपत्ता मजुरावरील अन्याय असून अन्यायाला वाचा फोडण्याचे काम कुणीही केले नाही. मागील दहा वर्षात विदर्भातील तेंदूपत्ता घटक खरेदी केलेला ठेकेदार आणि मजुरांचा विचार केल्यास मजूर आहे त्याच ठिकाणी आहे. परंतु ठेकेदार मात्र मोठे झाले. ठेकेदार व मजुरांची दरी वाढत गेली. याकडे लक्ष कोण देणार? बिडी शौकीनांचे प्रमाण कमी होत असल्याने एका दृष्टीने या व्यवसायाला अखेरची घरघरसुद्धा लागली आहे. असे असले तरी हजारो आदिवासींची रोजीरोटी असलेला हा व्यवसाय पूर्व विदर्भात अविरत सुरू आहे.सध्या पहाटेपासून मजुर आपल्या मुलाबाळांसह जंगलात पाने आणण्यासाठी जात आहे. त्यांना अनेक वन्यप्राण्यांचा सामना करावा लागतो. मागील वर्षांपासून वन्यप्राण्यांचे झालेली हल्ले बघता मजुरामध्ये कुठेतरी भितीचे वातावरण आहे. मात्र न डगमगता पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना काम केल्याशिवाय पर्याय नाही. ईकडे आड आणि दुसरीकडे विहिर अशी स्थिती तेंदूपत्ता मजुरांची झाली आहे. (वार्ताहर)