शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
4
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
5
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
6
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
7
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
8
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
9
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
10
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
11
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
12
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
13
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
14
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
15
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
16
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
17
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
18
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
19
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!

तळोधी पोलीस ठाणे न्याय हक्काचे रक्षण करणारे ठरावे

By admin | Updated: January 26, 2016 00:38 IST

पोलीस स्टेशन म्हणजे लोकांच्या न्याय हक्काच मंदिर असते. पोलीस स्टेशन मधून सर्व सामान्य माणसाला न्याय मिळण्याची अपेक्षा असते.

सुधीर मुनगंटीवार : नवनिर्मित पोलीस ठाण्याचे उद्घाटनचंद्रपूर : पोलीस स्टेशन म्हणजे लोकांच्या न्याय हक्काच मंदिर असते. पोलीस स्टेशन मधून सर्व सामान्य माणसाला न्याय मिळण्याची अपेक्षा असते. तळोधी पोलीस स्टेशन या परिसरातील लोकांच्या न्याय हक्काचे रक्षण करणारे ठरावे, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. तळोधी (बा.) येथील नवनिर्मित पोलीस ठाण्याच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला खा. अशोक नेते, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरुनुले, आ. कीर्तिकुमार भांगडिया, विशेष पोलीस महानिरीक्षक रविंद्र कदम, पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, माजी आमदार अतुल देशकर, सभापती देवराव भोंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिह राजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधू व ठाणेदार विवेक सोनवणे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.तळोधी पोलीस स्टेशन व्हावे ही या परिसरातील नागरिकांची बऱ्याच दिवसांची मागणी होती. त्यानुसार शासनाने २०१४ मध्ये या पोलीस स्टेशनला मान्यता दिली. या पोलीस स्टेशन अंतर्गत ४२ गावांचा समावेश आहे. पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीसाठी चारगाव मेंढा वलनी या ठिकाणी पाच एकर जागाही मंजूर करण्यात आली आहे. इमारत बांधण्यासाठी लवकर निधी देण्यात येईल, असे ना. मुनगंटीवार यांनी सांगितले. बल्लारपूर, पडोली व तळोधी येथील पोलीस स्टेशन इमारत आधुनिक व सुसज्ज व्हावी, अशी सूचना त्यांनी यावेळी केली. आमदार कीर्तिकुमार भांगडीया, विशेष पोलीस महानिरीक्षक रविंद्र कदम व जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनीची यावेळी भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचालन बबन बुरनुले यांनी तर आभार अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिह राजपूत यांनी मानले. कार्यक्रमाला पोलीस अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)विकास प्रक्रिया लोकचळवळ व्हावीतळोधी बाळापूर या गावातील सिमेंट रस्ते बांधकासाठी २५-१५ या अंतर्गत येत्या अर्थसंकल्पात २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व मामा तलावाचे नूतनीकरण, दुरुस्ती व शेती सिंचनासाठी वापर हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. विकास हा केवळ शासनाचा कार्यक्रम न राहता तो लोकचळवळ व्हावी. लॉजिस्टिक हब, वैद्यकीय महाविद्यालय, सैनिकी शाळा, विजेच्या दरात कपात व मेक इन चंद्रपूर या सारख्या विकासाच्या योजनांमुळे विदर्भ विकासाला गती प्राप्त झाली आहे, असे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.