शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
3
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
4
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
5
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
6
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
7
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
8
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
9
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
10
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
11
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
12
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
13
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
14
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
15
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
16
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
17
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
18
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
19
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
20
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग

तळोधी पोलीस ठाणे न्याय हक्काचे रक्षण करणारे ठरावे

By admin | Updated: January 26, 2016 00:38 IST

पोलीस स्टेशन म्हणजे लोकांच्या न्याय हक्काच मंदिर असते. पोलीस स्टेशन मधून सर्व सामान्य माणसाला न्याय मिळण्याची अपेक्षा असते.

सुधीर मुनगंटीवार : नवनिर्मित पोलीस ठाण्याचे उद्घाटनचंद्रपूर : पोलीस स्टेशन म्हणजे लोकांच्या न्याय हक्काच मंदिर असते. पोलीस स्टेशन मधून सर्व सामान्य माणसाला न्याय मिळण्याची अपेक्षा असते. तळोधी पोलीस स्टेशन या परिसरातील लोकांच्या न्याय हक्काचे रक्षण करणारे ठरावे, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. तळोधी (बा.) येथील नवनिर्मित पोलीस ठाण्याच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला खा. अशोक नेते, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरुनुले, आ. कीर्तिकुमार भांगडिया, विशेष पोलीस महानिरीक्षक रविंद्र कदम, पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, माजी आमदार अतुल देशकर, सभापती देवराव भोंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिह राजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधू व ठाणेदार विवेक सोनवणे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.तळोधी पोलीस स्टेशन व्हावे ही या परिसरातील नागरिकांची बऱ्याच दिवसांची मागणी होती. त्यानुसार शासनाने २०१४ मध्ये या पोलीस स्टेशनला मान्यता दिली. या पोलीस स्टेशन अंतर्गत ४२ गावांचा समावेश आहे. पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीसाठी चारगाव मेंढा वलनी या ठिकाणी पाच एकर जागाही मंजूर करण्यात आली आहे. इमारत बांधण्यासाठी लवकर निधी देण्यात येईल, असे ना. मुनगंटीवार यांनी सांगितले. बल्लारपूर, पडोली व तळोधी येथील पोलीस स्टेशन इमारत आधुनिक व सुसज्ज व्हावी, अशी सूचना त्यांनी यावेळी केली. आमदार कीर्तिकुमार भांगडीया, विशेष पोलीस महानिरीक्षक रविंद्र कदम व जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनीची यावेळी भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचालन बबन बुरनुले यांनी तर आभार अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिह राजपूत यांनी मानले. कार्यक्रमाला पोलीस अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)विकास प्रक्रिया लोकचळवळ व्हावीतळोधी बाळापूर या गावातील सिमेंट रस्ते बांधकासाठी २५-१५ या अंतर्गत येत्या अर्थसंकल्पात २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व मामा तलावाचे नूतनीकरण, दुरुस्ती व शेती सिंचनासाठी वापर हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. विकास हा केवळ शासनाचा कार्यक्रम न राहता तो लोकचळवळ व्हावी. लॉजिस्टिक हब, वैद्यकीय महाविद्यालय, सैनिकी शाळा, विजेच्या दरात कपात व मेक इन चंद्रपूर या सारख्या विकासाच्या योजनांमुळे विदर्भ विकासाला गती प्राप्त झाली आहे, असे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.