शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

वाहन परवाना शिबिर घ्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:21 IST

अतिक्रमणामुळे नागरिक त्रस्त चंद्रपूर : स्थानिक गांधी चौक ते जटपुरा गेटपर्यंत नव्याने रस्ता तयार केला जात आहे. मात्र ...

अतिक्रमणामुळे नागरिक त्रस्त

चंद्रपूर : स्थानिक गांधी चौक ते जटपुरा गेटपर्यंत नव्याने रस्ता तयार केला जात आहे. मात्र यातही व्यावसायिक अतिक्रमण करीत आहेत. त्यामुळे नागरिकांना नाहक अडचणींचा सामना करावा लागत आहे. महानगर पालिकेने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.

बसस्थानकांवर सोयी उपलब्ध कराव्यात

चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक बसस्थानकांवर सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. कोरपना, गडचांदूर, कोरपना, सावली या तालुका मुख्यालयामध्ये तर, बसस्थानकसुद्धा नाही. त्यामुळे येथे सोयीसुविधायुक्त बसस्थानक निर्माण करावे, अशी मागणी होत आहे. अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी, बसण्यासाठी जागा, शौचालय नाही.

डासांचा प्रादुर्भाव वाढला

वरोरा: शहरात मोठ्या प्रमाणात नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बहुतांश वॉर्डामध्ये कचराकुंड्याच नसल्याने दिवसेंदिवस डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे.याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे.

वाहनतळाअभावी वाहनधारक त्रस्त

चंद्रपूर : शहरातील बहुतांश इमारतीमध्ये वाहनतळाची जागा नसल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. महानगरपालिकेच्या प्रशासनाने याकडे लक्ष देऊन वाहनतळाची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, गोलबाजार, आझाद बाग परिसरात तर वाहने रस्त्यावर ठेवली जात आहे.

नाल्यांचा उपसा करावा

चंद्रपूर : शहरातील बालाजी वार्ड, समाधीवार्ड तसेच काही वार्डतील नाल्या तुंबल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नाल्यांमध्ये घाण साचून असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला. मनपा स्वच्छता कर्मचाऱ्यांना तातडीने या वॉर्डात पाठविण्याची मागणी नागरिकांनी केली.

अतिक्रमण हटाव मोहीम थंडावली

चंद्रपूर : कोरोना संकटामुळे मागील वर्षी मार्च महिन्यात लाॅकडाऊन करण्यात आले. त्यामुळे अतिकमण मोहीम थंडावली. परिणामी शहरातील विविध मार्गांवर दुकानदार व काही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. त्यामुळे ते हटवण्याची मागणी करण्यात आली आहे.

रस्त्यांची दुरुस्ती करावी

ब्रह्मपुरी : येथील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून वाहन चालविताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्याची दुरुस्तीकरण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

मोबाइलधारक त्रस्त

चंद्रपूर: मोबाइलचा वापर सर्वत्र वाढला आहे. पण काही कंपन्यांकडून अनावश्यक सेवांचा भडीमार ग्राहकांवर केला जात आहे. यामुळे मोबाइलधारक त्रस्त झाले आहेत. याची तक्रार संबंधित ग्राहक तक्रार केंद्राकडे करतात; पण त्याचा निपटारा होत नसल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.