शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्लामच्या नावावर हिंसाचार; हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन...सर्वात मोठ्या मुस्लिम देशाने पाकिस्तानला सुनावले
2
NEET-PG परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घेण्याचे NBE ला आदेश; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
3
बिहारमध्ये आश्रय मिळेना म्हणून दिल्लीत थाटला संसार; ३८ बांगलादेशी घुसखोर पोलिसांच्या ताब्यात
4
Video: धाड पडताच ५०० च्या नोटांचे बंडल इंजिनिअरने खिडकीबाहेर फेकले; पैशांचा ढीग पाहून अधिकारी चक्रावले
5
Honda ची सर्वात लोकप्रिय बाईक; कंपनीने बंद केले उत्पादन, कारण काय..?
6
सॅल्यूट! नौदलाच्या नारीशक्तीची कमाल; आव्हानांवर मात करत ८ महिन्यांत जगाला घातली प्रदक्षिणा
7
एक-दोन नव्हे भारतात कोरोनाचे चार नवे व्हेरिएंट; रुग्णांच्या संख्येतही होतेय वाढ! महाराष्ट्रात किती लोकांना लागण?
8
"तुला खूप  सुंदर बायको मिळालीय’’, लोकांच्या सततच्या चिडवण्यामुळे पती वैतागला, छपरावरून उडी मारायला गेला, मग...  
9
शेपूट वाकडं ते वाकडंच! पाक सरकारचे मंत्री, हाफिज सईदचा मुलगा अन् पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड एकाच मंचावर...
10
"पाकिस्तानातून दहशतवादी नव्हे तर मुस्लीम आले अन्..."; ऑपरेशन सिंदूरसंदर्भात माजी खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांचं मोठं विधान
11
अर्शद वारसी अडचणीत! 'पंप अँड डंप' प्रकरणात सेबीची मोठी कारवाई, पत्नीचाही सहभाग उघड
12
भारत आता तो भारत राहिलेला नाही, दहशतवाद नष्ट करणारच!, पंतप्रधान नरेंद्र मोदींची बिहारमध्ये गर्जना
13
हगवणे बंधूंना शस्त्र परवाना, ‘मामां’ची सही..! वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या सुपेकरांनी स्पष्टच सांगितलं
14
नववी पास मुस्कानला वकील होऊन लढायची आहे स्वत:ची केस, जेलमध्ये घ्यायचंय LLB चं शिक्षण
15
आमदारकीचे तिकीट हवे असेल तर..; पीएम मोदींनी आपल्या नेत्यांसमोर ठेवली एक मोठी अट
16
"RCB फायनलमध्ये जिंकली नाही तर मी पतीला घटस्फोट देईन’’, सामन्यावेळी पोस्टर घेऊन आलेल्या महिलेचा फोटो व्हायरल 
17
Corona Virus : "कोरोनासोबत जगण्याची सवय लावा, २१-२८ दिवस...”; नव्या व्हेरिएंटबद्दल काय म्हणाले तज्ज्ञ?
18
‘एनडीए’ची पहिलीच महिला सिल्व्हर मेडलिस्ट..! श्रीती दक्षने ‘लोकमत’ला सांगितला प्रेरणादायी प्रवास
19
प्रसिद्ध टीव्ही कपलला Bigg Boss 19 ची ऑफर? मध्यंतरी दोघंही आले होते चर्चेत
20
पाकिस्तानला दिलेल्या शस्त्रास्त्रांचा बार फुसका कसा निघाला? उत्तर देताना चिनी संरक्षण प्रवक्त्यांची उडाली फे फे

वाहन परवाना शिबिर घ्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:21 IST

अतिक्रमणामुळे नागरिक त्रस्त चंद्रपूर : स्थानिक गांधी चौक ते जटपुरा गेटपर्यंत नव्याने रस्ता तयार केला जात आहे. मात्र ...

अतिक्रमणामुळे नागरिक त्रस्त

चंद्रपूर : स्थानिक गांधी चौक ते जटपुरा गेटपर्यंत नव्याने रस्ता तयार केला जात आहे. मात्र यातही व्यावसायिक अतिक्रमण करीत आहेत. त्यामुळे नागरिकांना नाहक अडचणींचा सामना करावा लागत आहे. महानगर पालिकेने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.

बसस्थानकांवर सोयी उपलब्ध कराव्यात

चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक बसस्थानकांवर सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. कोरपना, गडचांदूर, कोरपना, सावली या तालुका मुख्यालयामध्ये तर, बसस्थानकसुद्धा नाही. त्यामुळे येथे सोयीसुविधायुक्त बसस्थानक निर्माण करावे, अशी मागणी होत आहे. अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी, बसण्यासाठी जागा, शौचालय नाही.

डासांचा प्रादुर्भाव वाढला

वरोरा: शहरात मोठ्या प्रमाणात नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बहुतांश वॉर्डामध्ये कचराकुंड्याच नसल्याने दिवसेंदिवस डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे.याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे.

वाहनतळाअभावी वाहनधारक त्रस्त

चंद्रपूर : शहरातील बहुतांश इमारतीमध्ये वाहनतळाची जागा नसल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. महानगरपालिकेच्या प्रशासनाने याकडे लक्ष देऊन वाहनतळाची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, गोलबाजार, आझाद बाग परिसरात तर वाहने रस्त्यावर ठेवली जात आहे.

नाल्यांचा उपसा करावा

चंद्रपूर : शहरातील बालाजी वार्ड, समाधीवार्ड तसेच काही वार्डतील नाल्या तुंबल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नाल्यांमध्ये घाण साचून असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला. मनपा स्वच्छता कर्मचाऱ्यांना तातडीने या वॉर्डात पाठविण्याची मागणी नागरिकांनी केली.

अतिक्रमण हटाव मोहीम थंडावली

चंद्रपूर : कोरोना संकटामुळे मागील वर्षी मार्च महिन्यात लाॅकडाऊन करण्यात आले. त्यामुळे अतिकमण मोहीम थंडावली. परिणामी शहरातील विविध मार्गांवर दुकानदार व काही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. त्यामुळे ते हटवण्याची मागणी करण्यात आली आहे.

रस्त्यांची दुरुस्ती करावी

ब्रह्मपुरी : येथील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून वाहन चालविताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्याची दुरुस्तीकरण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

मोबाइलधारक त्रस्त

चंद्रपूर: मोबाइलचा वापर सर्वत्र वाढला आहे. पण काही कंपन्यांकडून अनावश्यक सेवांचा भडीमार ग्राहकांवर केला जात आहे. यामुळे मोबाइलधारक त्रस्त झाले आहेत. याची तक्रार संबंधित ग्राहक तक्रार केंद्राकडे करतात; पण त्याचा निपटारा होत नसल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.