शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
5
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
6
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
7
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
8
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
9
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
11
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
12
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
13
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
14
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
15
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
17
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
18
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
19
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
20
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!

मोकाट डुकरांचा बंदोबस्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:27 IST

अनियंत्रित वाहनांवर आळा घाला चंद्रपूर : येथील पडोली परिसरात कोळसा, राख, रेती व अन्य साहित्याची वाहतूक करणारे अनेक ट्रक ...

अनियंत्रित वाहनांवर आळा घाला

चंद्रपूर : येथील पडोली परिसरात कोळसा, राख, रेती व अन्य साहित्याची वाहतूक करणारे अनेक ट्रक ये-जा करतात. मात्र या ट्रकचे चालक भरधाव वेगाने ट्रक चालवत असून रस्त्याच्या वळणावरही वाहनाचा वेग कमी करत नाहीत़ त्यामुळे अपघात होत आहेत.

स्वच्छता अभियानाचे तीनतेरा

कोरपना : केंद्र शासनाकडून देशभर स्वच्छता अभियान राबविला जात आहे. मात्र या अभियानाचा पुरता फज्जा उडाल्याचे चित्र कोरपना तालुक्यात दिसून येत आहे. तालुक्यातील ग्रामीण भागासह तालुका मुख्यालयी सर्वत्र कचरा दिसून येतो. त्यामुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी आहे.

विंजासन-देऊळगाव रस्त्यावर झुडपे

माजरी : विंजासन-देऊळगाव या रस्त्यावर झुडपे वाढली आहेत. त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. मात्र झुडपे तोडण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याचा परिणाम समोरून येणारे वाहने दिसत नाही आणि अपघात घडतात. याकडे लक्ष देऊन झुडपे तोडण्याची मागणी होत आहे.

प्रवाशी वाहतुकीमुळे अपघाताची शक्यता

जिवती : तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध वाहतूक सुरू आहे. आंध्रप्रदेशाच्या सीमेवर तालुका असल्याने येथे आंध्रप्रदेशातील अनेक वाहने अवैध प्रवासी वाहतूक करीत आहेत. जिवती ते अदिलाबाद या मार्गावर महामंडळाच्या बसेस नसल्याने अवैध वाहतूकदारांचे फावत आहे. ही वाहतूक तातडीने बंद करावी, अशी मागणी आहे.

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त

नागभीड : ब्रह्मपुरीकडे जाणाऱ्या मार्गावर खड्डे पडल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांचा अंदाज घेता येत नसल्याने अनेकांना अपघात होऊन जखमीही व्हावे लागले आहे. रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

वीज वितरणचे जनित्र बनले धोकादायक

जिवती : सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने ग्राहकांना शॉक देणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे जिवतीसह अनेक गावात डीपी रात्रंदिवस सतत उघड्या राहतात. या शिवाय विविध विभागात घराजवळून जाणाऱ्या तारांमुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. याकडे लक्ष देण्यासाठी वीज वितरण कंपनीकडे वेळ नसल्याचे चित्र तालुक्यात आहे.

रस्त्यावरील बांधकाम साहित्याने अपघात वाढ

चंद्रपूर : शहरात अनेक ठिकाणी घरांचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामावर लागणारे साहित्य रस्त्यावरच टाकण्यात येत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. नियमानुसार, असे साहित्य रस्त्यावर टाकता येत नाही, मात्र याकडे मनपाचे दुर्लक्ष होत आहे.