शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

मोकाट डुकरांचा बंदोबस्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:27 IST

अनियंत्रित वाहनांवर आळा घाला चंद्रपूर : येथील पडोली परिसरात कोळसा, राख, रेती व अन्य साहित्याची वाहतूक करणारे अनेक ट्रक ...

अनियंत्रित वाहनांवर आळा घाला

चंद्रपूर : येथील पडोली परिसरात कोळसा, राख, रेती व अन्य साहित्याची वाहतूक करणारे अनेक ट्रक ये-जा करतात. मात्र या ट्रकचे चालक भरधाव वेगाने ट्रक चालवत असून रस्त्याच्या वळणावरही वाहनाचा वेग कमी करत नाहीत़ त्यामुळे अपघात होत आहेत.

स्वच्छता अभियानाचे तीनतेरा

कोरपना : केंद्र शासनाकडून देशभर स्वच्छता अभियान राबविला जात आहे. मात्र या अभियानाचा पुरता फज्जा उडाल्याचे चित्र कोरपना तालुक्यात दिसून येत आहे. तालुक्यातील ग्रामीण भागासह तालुका मुख्यालयी सर्वत्र कचरा दिसून येतो. त्यामुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी आहे.

विंजासन-देऊळगाव रस्त्यावर झुडपे

माजरी : विंजासन-देऊळगाव या रस्त्यावर झुडपे वाढली आहेत. त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. मात्र झुडपे तोडण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याचा परिणाम समोरून येणारे वाहने दिसत नाही आणि अपघात घडतात. याकडे लक्ष देऊन झुडपे तोडण्याची मागणी होत आहे.

प्रवाशी वाहतुकीमुळे अपघाताची शक्यता

जिवती : तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध वाहतूक सुरू आहे. आंध्रप्रदेशाच्या सीमेवर तालुका असल्याने येथे आंध्रप्रदेशातील अनेक वाहने अवैध प्रवासी वाहतूक करीत आहेत. जिवती ते अदिलाबाद या मार्गावर महामंडळाच्या बसेस नसल्याने अवैध वाहतूकदारांचे फावत आहे. ही वाहतूक तातडीने बंद करावी, अशी मागणी आहे.

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त

नागभीड : ब्रह्मपुरीकडे जाणाऱ्या मार्गावर खड्डे पडल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांचा अंदाज घेता येत नसल्याने अनेकांना अपघात होऊन जखमीही व्हावे लागले आहे. रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

वीज वितरणचे जनित्र बनले धोकादायक

जिवती : सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने ग्राहकांना शॉक देणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे जिवतीसह अनेक गावात डीपी रात्रंदिवस सतत उघड्या राहतात. या शिवाय विविध विभागात घराजवळून जाणाऱ्या तारांमुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. याकडे लक्ष देण्यासाठी वीज वितरण कंपनीकडे वेळ नसल्याचे चित्र तालुक्यात आहे.

रस्त्यावरील बांधकाम साहित्याने अपघात वाढ

चंद्रपूर : शहरात अनेक ठिकाणी घरांचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामावर लागणारे साहित्य रस्त्यावरच टाकण्यात येत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. नियमानुसार, असे साहित्य रस्त्यावर टाकता येत नाही, मात्र याकडे मनपाचे दुर्लक्ष होत आहे.