शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू
2
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
3
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
4
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
5
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
6
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
7
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
8
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
9
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
10
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
11
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
12
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
13
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
14
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
15
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
16
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
17
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
18
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
19
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
20
Chipi Airport: चिपी विमानतळ सेवा पुन्हा सुरू होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

भाऊंच्या आत्मविश्वासाला तार्इंचा अडसर

By admin | Updated: June 14, 2014 23:27 IST

बल्लारपूर हा मतदारसंघ जुना नव्हे तर, २००९ च्या केंद्रीय पुनर्रचनेत निर्माण झालेला आहे. पूर्वी चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातच असलेल्या बल्लारपूरचे विभाजन करून हा नवा मतदार संघ अस्तित्वात आला.

गोपालकृष्ण मांडवकर - चंद्रपूर बल्लारपूर हा मतदारसंघ जुना नव्हे तर, २००९ च्या केंद्रीय पुनर्रचनेत निर्माण झालेला आहे. पूर्वी चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातच असलेल्या बल्लारपूरचे विभाजन करून हा नवा मतदार संघ अस्तित्वात आला. त्यासाठी मूल-सावली मतदारसंघ गोठविण्यात आला. तिकडे भाजपाच्या शोभाताई फडणवीस बेघर झाल्या. चंद्रपूर अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने आपला परंपरागत मतदारसंघ सोडून सुधीर मुनगंटीवारांना बल्लारपुरात यावे लागले. तर, शोभातार्इंना विधान परिषदेत सदस्यत्व देवून पक्षाकडून राजकीय पूनर्वसन करण्यात आले. या क्षेत्रात होणारी विधानसभेची ही दुसरी निवडणूक आहे. भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांची येथून दुसऱ्यांदा (आजवर मिळून पाचव्यांदा) पुन्हा जय्यत तयारी सुरू आहे. गेल्या वेळी काँग्रेसने त्यांच्या विरोधात जोरात ताकद लावली होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया यांचे राजकीय वारसदार या नात्याने राहूल पुगलिया यांना मैदानात उतरविण्यात आले होते. विदर्भात प्रचंड चर्चेच्या ठरलेल्या या लढतील अखेर बाजी मात्र सुधीर मुनगंटीवारांनीच मारली होती. ८२ हजार १९६ मते घेवून त्यांनी राहूल पुगलिया यांचा २० हजार ७३६ मतांनी पराभव केला होता. राजकीय व्यस्ततेतूनही मतदारांशी असलेला कायम जनसंपर्क ही मुनगंटीवारांंची जमेची सर्वात मोठी बाजू आहे. २०१४ मधील लोकसभा निवडणुकीतही मतदारांनी भाजपाच्या पारड्यात अधिक मते टाकली आहेत. काँग्रेसपेक्षा २९ हजारांवर मतांची लिड येथून भाजपाला मिळाली. भाजपासाठी वातावरण तसे ठिकठाक दिसत असले तरी, शोभाताई फडणवीसांच्या नाराजीचा सामना मुनगंटीवारांना येथे करावाच लागणार आहे. या मतदारसंघात बल्लारपूर आणि मूल या दोन नगरपालिका आहेत. मूल हा शोभातार्इंचा मतदारसंघ होता. एके काळी वामनराव गड्डमवारांसारख्या मातब्बर नेत्याला पराभूत करून आपले पाय राजकारणात घट्ट रोवणाऱ्या तार्इंना विधान परिषद सदस्यत्व घेवून नाईलाजाने सभागृहात मागच्या दाराने जावे लागले. त्याची सल त्यांना आहे. यापूर्वी त्यांचे मुनगंटीवारांशी चांगले जमायचे. आता मात्र दोघांमधून विस्तवही जात नाही. तसे खासदार हंसराज अहीरांशीही तार्इंचे बिनसले आहे. मूल तालुक्यात तार्इंना मानणारा वर्ग मोठा आहे. विधानपरिषदेवर जावूनही त्यांनी जनसंपर्क मात्र तुटू दिला नाही. त्यामुळे भाजपाला त्यांना विश्वासात घेवूनच काम करावे लागणार आहे. राजकीय महत्वाकांज्ञेपोटी त्या बल्लारपुरातून दावेदारीही करू शकतात, अशी चर्चा आहे.काँग्रेसला येथे बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे. गेल्या वेळी राहूल पुगलिया यांनी मुनगंटीवारांसारख्या मातब्बराला दिलेली टक्कर तशी मोठीच होती. काँग्रेसने राबविलेल्या प्रचार यंत्रणेमुळे भाजपालाही घाम फुटला होता. मात्र मतदारांनी अखेरच्या क्षणी मुनगंटीवारांना पसंती दिली. गेल्या पाच वर्षात बल्लारपुरातील स्थिती बदलली आहे. बल्लारपूर पेपर मील हे पुगलिया यांचे बलस्थान आहे. कामगार नेता अशी प्रतिमा असलेल्या नरेश पुगलिया यांची या वर्गाने कायम पाठराखण केली आहे. मात्र अलिकडे बल्लारपूर पेपर मिलमध्ये कामगार वर्गात सुरू असलेल्या संघर्षामुळे वातावरण काही अंशी बदललेले दिसत आहे. काँग्रेसकडून उमेदवार बदलला आणि स्थानिकाला उमेदवारी देण्याचा विचार झाला तर, घनश्याम मुलचंदाणी यांचे नाव पुढे येवू शकते. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाशपाटील मारकवार हे सुद्धा या ठिकाणी संधीच्या शोधात आहेत. जिल्हा परिषदेतील अनुभवाच्या बळावर ते सुद्धा आपले नाव मुंबईत चालवित आहेत. यावेळी शिवसेना आणि मनसेही रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे. शिवसेनेकडून सिक्की यादव यांचे तर मनसेकडून विष्णु बुजोणे यांचे नाव घेतले जात आहे. पेपरमीलमुळे होणारे वायू आणि जल प्रदुषण, कोळसा खाणीमुळे बदलेले पर्यावरण आणि पोंभूर्णासारख्या मागास क्षेत्राचा विकास हे येथील मुख्य प्रश्न आहेत. पण गेल्या अनेक वर्षात मीलच्या प्रदुषणाचा प्रश्न सुटू शकलेला नाही. मुनगंटीवारांच्या काळातही न्याय न मिळाल्याची मतदारांची भावना आहे. त्यामुळे कुणालाही हे मुद्दे दुर्लक्षित करून चालणार नाही, हे तेवढेच खरे.