शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
2
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
3
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
4
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
5
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
6
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
9
धक्कादायक! ब्रेकअपमुळे पाचवीतील ४ मुलींनी रचला वर्गातील मुलाच्या हत्येचा कट
10
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
11
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
12
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
13
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
14
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
15
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
16
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
17
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
18
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना
19
जाम घाबरलेला रोहित शर्मा; किंग कोहलीच्या रुपात देवच पावला! टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील खास किस्सा
20
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर

स्वाभिमान योजना १० वर्षांपासून थंडबस्त्यात

By admin | Updated: June 14, 2014 01:54 IST

केंद्र शासनाने २००४ मध्ये बेरोजगार व गरीब आदिवासींच्या उत्थानाकरिता स्वाभीमान योजना सुरू केली.

बल्लारपूर : केंद्र शासनाने २००४ मध्ये बेरोजगार व गरीब आदिवासींच्या उत्थानाकरिता स्वाभीमान योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत भूमिहीन बेरोजगार आदिवासी युवकांना चार एकर कोरडवाहू व चार एक सिंचनाची जमीन देण्याचे ठरवून याकरिता निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परंतु ही योजना सुरू झाली तेव्हापासून तर आजपर्यंत या योजनेंतर्गत एकाही आदिवासींना त्याचा लाभ मिळाला नाही.अखिल भारतीय आदिवासी मूल निवासी अन्याय निवारण तथा विकास संघाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष येथील डॉ. वसंत मसरात यांनी याबाबत माहिती अधिकारातून माहिती घेतली असता ही बाब उघड झाली आहे. तब्बल नऊ वर्षांपासून एकाही आदिवासीला या योजनेचा फायदा मिळाला नाही. यात अधिकाऱ्यांची उदासिनता आणि आदिवासींकडे शासनाचे दुर्लक्ष दिसून येते. या योजनेकरिता शासनाने जो निधी उपलब्ध करून दिला आहे. तो निधी गेला कुठे, असा प्रश्न डॉ. मसराम यांनी उपस्थित केला आहे. या योजनेंतर्गत आदिवासींना जमिनी का देण्यात आल्या नाहीत, अशी विचारणा त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली असता जमिनीच विकत मिळत नाहीत, असे कारण पुढे केले जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मसराम यांनी स्वत:च्या मालकीची घोडपेठ येथील १६ एकर जमीन शासकीय दराने विक्रीसाठी ठेवली आहे. या योजनेतून आदिवासिंना फायदा मिळेल, हा त्यांचा उद्देश आहे. यासंबंधीत शासकीय अधिकाऱ्यांना तसे लेखी लिहूनही दिले आहे. यासंबंधी मागील तीन वर्षांपासून त्यांनी शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. एकीकडे, या योजनेकरिता शासकीय दराने जमिनी विकत मिळत नाही, अशी ओरड अधिकारी करीत आहे. तर दुसरीकडे शासकीय दरात जमीन विकायला तयार असतानाही याकडे दुर्लक्ष करायचे असे टोलवाटोलवीचे धोरण सुरू आहे. अशाने, योजना कशी यशस्वी व्हायची आणि आदिवासींना त्याचा लाभ कसा मिळायचा, असा प्रश्न डॉ. मसराम यांनी उपस्थित केला आहे. (तालुका प्रतिनिधी)