शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

भाजप पक्षाला साथ द्या, गोंडपिंपरीला स्मार्ट सिटी बनवू

By admin | Updated: January 9, 2016 01:28 IST

येत्या १० जानेवारीस गोंडपिंपरी नगर पंचायतीची सार्वत्रिक निवडणूक पार पडणार असून या निवडणुकीत गोंडपिंपरी वासियांनी भाजपाला स्पष्ट बहुमत दिल्यास ...

सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन : गोंडपिंपरीत जाहीर सभागोंडपिंपरी : येत्या १० जानेवारीस गोंडपिंपरी नगर पंचायतीची सार्वत्रिक निवडणूक पार पडणार असून या निवडणुकीत गोंडपिंपरी वासियांनी भाजपाला स्पष्ट बहुमत दिल्यास शहराला स्मार्ट सिटी बनवू सोबतच पहिल्याच टप्प्यात १० कोटींचा विकास निधी देवून संपूर्ण राज्यात पोंभूर्ण्यासह गोंडपिंपरी नगरपंचायतीला आदर्श नगरपंचायत करु, असे आश्वासन राज्याचे अर्थ, नियोजन, वने तथा जिल्हा पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे. येथील नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रचार सभेत मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.कार्यक्रमाप्रसंगी प्रामुख्याने राजुरा क्षेत्र आमदार अ‍ॅड. संजय धोटे, भाजपा ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, देवराव भोंगळे, राहुल सराफ, हरिश शर्मा, राजू घरोटे, प्रमोद कडू, सतीश धोटे, सुरेश धोटे, बबन निकोडे, दीपक बोनगीरवार, सुहास माडूरवार, नरेंद्र इंगोले तथा पक्षातर्फे १७ ही प्रभागात उभे असलेले उमेदवार प्रामुख्याने उपस्थित होते.शहराच्या विकासाबाबत बोलताना ना. मुनगंटीवार म्हणाले, गोंडपिंपरी शहरवासीयांचा मी ऋणी असून शहरातील मुलभूत गरजांपैकी रस्ते, नाली, वीज, पाणी, घरकूल आदी सुविधा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविणार. त्याचबरोबरच दारिद्रय रेषेखालील भूमीहिनांना ५० हजारापर्यंत अर्थसहाय्य करुन त्या जागेवर घरकुलांची उभारणी होण्यासाठी शासनाने नुकतेच निर्णय घेतले आहेत. तसेच जिल्ह्यातील दारुबंदीबाबत बोलताना ते म्हणाले, रात्र आहे तर रावणही आहे. दारुबंदी केल्यापासून जिल्ह्यातील गुन्ह्यात घट झाली असून अपघातही कमी झाले आहे. तर दारुबंदी जिल्ह्यात काही लाचखोर व दृष्ट प्रवृत्तीच्या समाजकंटकांनी अवैध विक्रीस चालना दिल्यामुळे विषारी व बनावट दारुची आयात होत असून आगामी काळात दारुबंदीची शिस्त घालण्यासाठी आपण महिल्यांच्या समित्या नेमणार असून दारु विक्रीला खतपाणी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची खैर करणार नाही, असे म्हणत पोलीस विभागाच्याही कानपिचक्या घेतल्या.तर क्षेत्र आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनी भाजपा उमेदवारांंना स्पष्ट बहुमताने निवडून देण्याचे आवाहन उपस्थितांना केले. प्रास्ताविक भाजपा जिल्हा सचिव बबन निकोडे, संचालन अमोल कडूकर तर आभार रविंद्र पावडे यांनी मानले. कार्यक्रमास हजारोंची उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)