शहरं
Join us  
Trending Stories
1
GT 'टायटन्स' जहाज बुडता बुडता वाचलं! हार्दिकच्या चुकीमुळं MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

दीड महिना खूप सोसले, आता लॉकडाऊन नकोच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:21 IST

कोरोना उद्रेकामुळे जिल्ह्यातील हजारो लोकांचे रोजगार बुडाले. व्यवसाय कोलमडले. अनेकांच्या उदरनिर्वाहाची साधने उद्ध्वस्त झाली. जुने व्यवसाय बंद करून दारोदारी ...

कोरोना उद्रेकामुळे जिल्ह्यातील हजारो लोकांचे रोजगार बुडाले. व्यवसाय कोलमडले. अनेकांच्या उदरनिर्वाहाची साधने उद्ध्वस्त झाली. जुने व्यवसाय बंद करून दारोदारी भटकून जीवनाेपयोगी किरकोळ वस्तू विक्री करावी लागत आहे. यातून मिळणाऱ्या तुटपुंज्या मोबदल्यातून कुटुंबाच्या दैनंदिन गरजा भागविणे कठीण झाले. कोरोना कहर सुरू असल्याने प्रशासनाने निश्चित केलेल्या वेळात किती विक्री होईलच, याची खात्री नाही. त्यामुळे दीड महिन्यांपासून जिल्ह्यातील हजारो लघुव्यावसायिकांची प्रचंड आर्थिक ओढाताण सुरू आहे. या कालावधीत जिल्हा प्रशासनाने कोरोनाविरुद्ध प्रतिबंधात्मक उपाययोजना वाढविल्या. आरटीपीसीआर व अ‍ॅन्टिजन चाचण्यांची व्याप्ती वाढविली. त्यामुळे संसर्गाचा आलेख उतरणीला लागला. मृतांची संख्याही कमी होत आहे. पॉझिटिव्ही दर १० टक्क्यांपेक्षा खाली आणि ऑक्सिजनवरील रुग्णसंख्या कमी झालेल्या २० जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल झाले. चंद्रपूर जिल्हा मात्र रेड झोनमध्ये आहे. त्यातच निर्बंधांना मुदतवाढ दिल्याने जगायचे कसे, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत.

लघुव्यवसायांवर कुठाराघात

जिल्हा प्रशासनाने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत लागू केलेल्या निर्बंधांचा पॉझ बटनासारखा वापर केला. त्याची उपयुक्तताही सिद्ध होऊ लागली. परंतु गोरगरीब, सर्वसामान्य नागरिक व लघुव्यवसायांवर या निर्बंधांचा प्रचंड आघात बसला आहे. त्यामुळे १५ जून २०२१ च्या सकाळी ७ वाजतापर्यंत आधीचे सर्व निर्बंध ‘जैसे थे’ ठेवल्याचे सोमवारी जाहीर होताच नागरिकांत नाराजी उमटत आहे.

हजारो कुटुंंबे आर्थिक तणावात

निर्बंध लागू केल्यानंतर कामगार, हमाल, हॉकर्स आणि अन्य लघुव्यावसायिकांच्या अर्थार्जनाची जबाबदारी घेण्यास सरकार कमी पडले. कार्डधारकांना धान्याची व्यवस्था हा अपवाद वगळल्यास पार काही मिळाले नाही. उद्योगांना शिथिलता देण्यात आली. पण कच्चा माल ते व्रिकीपर्यंतची साखळी विस्कळीत झाली. रोजगाराचे मार्ग बंद असल्याने हजारो कुटुंंबांमध्ये मोठा आर्थिक ताणतणाव वाढला.

हाताला कामच नाही; बेरोजगार वैतागले

कोरोना संसर्गापासून सुशिक्षित बेरोजगारांचे तर हाल सुरू आहेत. कौशल्यावर आधारीत रोजगार आणि नोकर भरती ठप्प आहे. नोकरीला पात्र असलेले शिक्षण पूर्ण करूनही कुठे संधी नाही. उद्याचे बघू; पण आजचा खर्च कसा भागवायचा, असा विचार करू पाहणाऱ्या बेरोजगारांना जिल्ह्यात सद्यस्थितीत कुठेच रोजगार नाही. त्यामुळे दीड दोन महिन्यांपासून तेही वैतागले असून निर्बंधांबाबत नाराजी व्यक्त करीत आहेत.