शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

दीड महिना खूप सोसले, आता लॉकडाऊन नकोच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:21 IST

कोरोना उद्रेकामुळे जिल्ह्यातील हजारो लोकांचे रोजगार बुडाले. व्यवसाय कोलमडले. अनेकांच्या उदरनिर्वाहाची साधने उद्ध्वस्त झाली. जुने व्यवसाय बंद करून दारोदारी ...

कोरोना उद्रेकामुळे जिल्ह्यातील हजारो लोकांचे रोजगार बुडाले. व्यवसाय कोलमडले. अनेकांच्या उदरनिर्वाहाची साधने उद्ध्वस्त झाली. जुने व्यवसाय बंद करून दारोदारी भटकून जीवनाेपयोगी किरकोळ वस्तू विक्री करावी लागत आहे. यातून मिळणाऱ्या तुटपुंज्या मोबदल्यातून कुटुंबाच्या दैनंदिन गरजा भागविणे कठीण झाले. कोरोना कहर सुरू असल्याने प्रशासनाने निश्चित केलेल्या वेळात किती विक्री होईलच, याची खात्री नाही. त्यामुळे दीड महिन्यांपासून जिल्ह्यातील हजारो लघुव्यावसायिकांची प्रचंड आर्थिक ओढाताण सुरू आहे. या कालावधीत जिल्हा प्रशासनाने कोरोनाविरुद्ध प्रतिबंधात्मक उपाययोजना वाढविल्या. आरटीपीसीआर व अ‍ॅन्टिजन चाचण्यांची व्याप्ती वाढविली. त्यामुळे संसर्गाचा आलेख उतरणीला लागला. मृतांची संख्याही कमी होत आहे. पॉझिटिव्ही दर १० टक्क्यांपेक्षा खाली आणि ऑक्सिजनवरील रुग्णसंख्या कमी झालेल्या २० जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल झाले. चंद्रपूर जिल्हा मात्र रेड झोनमध्ये आहे. त्यातच निर्बंधांना मुदतवाढ दिल्याने जगायचे कसे, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत.

लघुव्यवसायांवर कुठाराघात

जिल्हा प्रशासनाने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत लागू केलेल्या निर्बंधांचा पॉझ बटनासारखा वापर केला. त्याची उपयुक्तताही सिद्ध होऊ लागली. परंतु गोरगरीब, सर्वसामान्य नागरिक व लघुव्यवसायांवर या निर्बंधांचा प्रचंड आघात बसला आहे. त्यामुळे १५ जून २०२१ च्या सकाळी ७ वाजतापर्यंत आधीचे सर्व निर्बंध ‘जैसे थे’ ठेवल्याचे सोमवारी जाहीर होताच नागरिकांत नाराजी उमटत आहे.

हजारो कुटुंंबे आर्थिक तणावात

निर्बंध लागू केल्यानंतर कामगार, हमाल, हॉकर्स आणि अन्य लघुव्यावसायिकांच्या अर्थार्जनाची जबाबदारी घेण्यास सरकार कमी पडले. कार्डधारकांना धान्याची व्यवस्था हा अपवाद वगळल्यास पार काही मिळाले नाही. उद्योगांना शिथिलता देण्यात आली. पण कच्चा माल ते व्रिकीपर्यंतची साखळी विस्कळीत झाली. रोजगाराचे मार्ग बंद असल्याने हजारो कुटुंंबांमध्ये मोठा आर्थिक ताणतणाव वाढला.

हाताला कामच नाही; बेरोजगार वैतागले

कोरोना संसर्गापासून सुशिक्षित बेरोजगारांचे तर हाल सुरू आहेत. कौशल्यावर आधारीत रोजगार आणि नोकर भरती ठप्प आहे. नोकरीला पात्र असलेले शिक्षण पूर्ण करूनही कुठे संधी नाही. उद्याचे बघू; पण आजचा खर्च कसा भागवायचा, असा विचार करू पाहणाऱ्या बेरोजगारांना जिल्ह्यात सद्यस्थितीत कुठेच रोजगार नाही. त्यामुळे दीड दोन महिन्यांपासून तेही वैतागले असून निर्बंधांबाबत नाराजी व्यक्त करीत आहेत.