शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

दुपारपाळीच्या शाळांचे वेळापत्रक बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2016 01:00 IST

सध्या चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान ४५ अंशावर पोहोचले आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक शाळा, कॉन्व्हेंट व्यवस्थापन ...

तीव्र उन्हाचा फटका : जिल्हा परिषद आज काढणार आदेशचंद्रपूर : सध्या चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान ४५ अंशावर पोहोचले आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक शाळा, कॉन्व्हेंट व्यवस्थापन केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या नावावर भर उन्हात शाळा भरवित असल्याचे दिसून येत आहे. हा मुद्दा गुरूवारी पार पडलेल्या जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या सभेत गाजला. त्यामुळे शाळा, कॉन्व्हेंचे वेळापत्रक बदलवून सकाळी ७.३० ते १०.३० या वेळात शाळा भरविण्याचा आदेश शिक्षण विभाग शुक्रवारी काढणार आहे.जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव, शांताराम चौखे आणि ब्रिजभूषण पाझारे यांनी शाळांच्या वेळाबाबत प्रश्न उपस्थित करून शिक्षण विभागाला चाांगेलच धारेवर धरले. विदर्भात सर्वाधिक तापमानाचा जिल्हा म्हणून चंद्रपूर जिल्ह्याला ओळखले जाते. येथील तापमान दुपारच्या सुमारास ४५ अंश सेल्सीअस पर्यंत असते. त्यामुळे दुपारी घराबाहेर पडणे धोक्याचे ठरत असून आतापर्यंत जिल्ह्यात चार जणांचा उष्मघाताने मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अनेक नागरिक दुपारी घराबाहेर पडण्यास घाबरतात. मात्र एवढ्या तीव्र उन्हातही चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील अनेक शाळा, कॉन्व्हेंट भरविले जात आहेत. यामागे केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा व्यवस्थापनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे भर उन्हातही विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागत आहे. उन्हाचा पारा वाढल्याने शेजारच्या तेलंगाना व आंध्र प्रदेशात शाळांना सुट्ट्या लागल्या आहेत. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात परिस्थती वेगळी असून अद्यापही शाळांना सुट्ट्या लागल्या नाही. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव, शांताराम चौखे, आणि ब्रिजभुषण पाझारे यांनी जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या सभेत हा विषय लावून धरत शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. दुपारी भरविण्यात येणाऱ्या शाळांचे वेळापत्रक बदलवून सकाळच्या सत्रात वर्ग घेण्याची मागणी या सदस्यांनी केली. त्यामुळे शाळा, कॉन्व्हेंटचे वेळापत्रक सकाळी ७.३० ते १०.३० या वेळात करण्यात येणार आहे. तसा आदेश शुक्रवारी शिक्षण विभागाकडून काढण्यात येणार आहे. गुरूवारी पार पडलेल्या शिक्षण समितीच्या सभेला जिल्हा परिषद शिक्षण सभापती देवराव भोंगळे, शिक्षण विभागाचे अधिकारी, शिक्षण समितीचे सदस्य, कर्मचारी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)