शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

खताच्या प्रत्यक्ष विक्रीनंतरच विक्रेत्यांना मिळणार अनुदान

By admin | Updated: June 10, 2017 00:34 IST

दरवर्षी खताचा काळाबाजार होत असते. अनेक विक्रेते खताची टंचाई निर्माण करून जादा दराने खत विक्री करतात. यात शेतकऱ्यांची मोठी लूट होत असते.

शासनाचे पाऊल : काळाबाजार रोखण्यासाठी उपाययोजनालोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दरवर्षी खताचा काळाबाजार होत असते. अनेक विक्रेते खताची टंचाई निर्माण करून जादा दराने खत विक्री करतात. यात शेतकऱ्यांची मोठी लूट होत असते. यावर उपाययोजना म्हणून शासनाने पाऊल उचलले असून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष खतांची विक्री झाल्यानंतरच विक्रेत्या कंपन्यांना शासकीय अनुदान देण्यात येणार आहे. खताची मागणी, पुरवठ्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करून खताचा प्रत्यक्ष वापर झाल्यानंतर पैसा हळूहळू वापरात येणार आहे. त्यामुळे कृषी केंद्राकडून होणाऱ्या काळाबाजाराला आता लगाम लागणार आहे.यापूर्वी जिल्ह्यात खताची रॅक आल्यानंतर खत कंपन्या युनिरा, डीएपी, पोटॅश, फॉस्फेट आदी खतांच्या अनुदानासाठी सरकारकडे दावा करीत होत्या. त्यांना खतांवर ९० टक्के अनुदान दिले जाते. मात्र खताची प्रत्यक्ष विक्री व्हायला विलंब लागायचा. खत पडून असायचे, कंपन्या अनुदान घेवून मोकळ्या व्हायच्या. आता खत विक्रेत्याकडून शेतकऱ्यांनी खते खरेदी केल्यानंतरच कंपन्यांना तसेच विक्रेत्यांना अनुदान मिळणार आहे. जूनपासून अनुदानित खतांच्या विक्रीला सुरुवात करण्यात येणार आहे. खतांची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांचे आधारकार्ड थम्स घेतले जाणार आहे. ग्रामीण भागात शेतकरी एकत्रितपणे खते खरेदी करतात. यासाठी खत नेण्यासाठी आलेल्या रिक्षा चालकाचाही आधार क्रमांक व थम्स घेण्यात येणार आहे. यातून काळाबाजार रोखण्यास मदत होणार आहे. कंपन्यांना अनुदान मिळणारशेतकऱ्यांना वाजवी दराने खत उपलब्ध व्हावे, यासाठी खतांवर मोठी सबसिडी दिली जाते. युरियाच्या ५० किलो बॅगची विक्री किंमत ३०१ रुपये शासनाने ठरवून दिली आहे. परंतु या कंपन्यांचे उत्पादन खर्च जवळजवळ ७०० ते ९०० रुपये एवढा आहे. उत्पादन खर्च व विक्री किंमत यातील फरक भरून काढण्यासाठी कंपन्यांना अनुदान दिले जाणार आहे.