शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
2
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
3
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
4
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
5
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
6
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
7
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
8
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
9
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
10
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
11
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
12
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
13
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
14
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
15
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
16
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मनोज जरांगेंसोबत उद्धव ठाकरेंनी फोनवरून साधला संवाद
17
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले
18
'ट्रम्प यांच्या टॅरिफ'ला धक्का बसणार ! जपानमधील मेगा डीलनंतर पंतप्रधान मोदी चीनला पोहोचले
19
रात्री गाढ झोपले, सकाळी मृतदेह बाहेर काढले; भूस्खलनात आई-वडिलांसह ५ मुलांचा मृत्यू
20
Nagpur Girl Stabbed: एका दिवसाची आईची साथ सुटली अन् एंजेल नेहमीसाठीच दुरावली!

विद्यार्थ्यांनी विकासाचे धडे घ्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 22:48 IST

शाश्वत विकासासाठी आजच्या तरुणाईने विधायक कामांचे धडे घ्यावे. यातून जिल्ह्यातील ग्रामीण भागाचे चित्र बदलेल. शाश्वत स्वच्छतेची मोहीम गतिमान होईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण जिल्हा परिषद अंतर्गत ज्युबिली विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात पार पडलेल्या जिल्हास्तरीय स्वच्छतामित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.

ठळक मुद्देजितेंद्र पापळकर : जिल्हास्तरीय स्वच्छतामित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शाश्वत विकासासाठी आजच्या तरुणाईने विधायक कामांचे धडे घ्यावे. यातून जिल्ह्यातील ग्रामीण भागाचे चित्र बदलेल. शाश्वत स्वच्छतेची मोहीम गतिमान होईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण जिल्हा परिषद अंतर्गत ज्युबिली विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात पार पडलेल्या जिल्हास्तरीय स्वच्छतामित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) विजय पचारे, प्राचार्य काळबांडे, निवृत्त जिल्हा क्रीडा अधिकारी चचाणे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय धोटे, विस्तार अधिकारी गणेश चव्हाण, रामटेके, ज्युबिली विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षिका पुष्पा कोठेवार, मोरे उपस्थित होते. जिल्हास्तरीय स्वच्छतामित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेच्या स्वरूपाची माहिती स्वच्छ भारत मिशनचे माहिती शिक्षण संवाद तज्ज्ञ कृष्णकांत खानझोडे यांनी दिली. मुख्य कार्यकारी पापळकर म्हणाले, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घेण्यात येणारी स्पर्धा महाविद्यालयीन युवकांना प्रेरणा देणारी आहे. स्वच्छतामित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेतील स्पर्धकांनी प्रत्येक तालुक्यात स्वच्छतेची चळवळ निर्माण करावी. राज्यस्तरीय स्पर्धेत जिल्ह्याचे नाव लौकिक करावे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. ही स्पर्धा कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन गटामध्ये घेण्यात आली. कनिष्ठ महाविद्यालयीन गटामधून प्रथम मोनाली इद्र्रदास बदकी, द्वितीय निश्चय ठवरदास उराडे, तर तृतीय पुरस्कार सुषमा बबन जवादे यांनी पटकविला आहे.वरिष्ठ महाविद्यालयीन गटातून प्रथम पुरस्कार आकाश दिवाकर कडू, द्वितीय मोनाली पुंडलिक ठाकरे, तृतीय पवनलाल हुकरे यांनी मिळविला. विजेत्यांना स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) पचारे म्हणाले, तरूणांमध्ये विधायक कार्य करण्याची प्रचंड शक्ती असते. शासनाच्या विविध योजनांमधून त्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य केल्या जात आहे. पालकांनी मुलांशी संवाद ठेवून चांगल्या कार्यात मदत करावी, असेही त्यांनी सांगितले. तालुकास्तरावरून जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. संचालन मोरेश्वर बारसागडे यांनी केले. माहिती शिक्षण संवाद सल्लागार प्रवीण खंडारे यांनी आभार मानले. अधिकारी असे मत मांडले. यावेळी विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.