शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

रस्त्यावरील केबल जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 22:11 IST

येथील ताडोबा रोड तुकूम परिसरामध्ये मागील काही दिवसांपासून डिव्हायडरच्या अगदी मधोमध नव्याने विद्युत खांब लावण्यात आले आहेत. मात्र जुन्या विद्युत खांबाला लावलेले केबल रस्त्यावरच ठेवण्यात आल्याने संबंधितांचा हा हलगर्जीपणा एखाद्याचा जीव घेऊ शकतो. मात्र याचे कंत्राटदार तसेच महानगरपालिका प्रशासनाला काहीच देणे-घेणे नसल्याचे चित्र आहे. येथील सदर केबल तसेच खांब हटवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देहलगर्जीपणा वाहनधारकांच्या जीवावर बेतणार : महानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येथील ताडोबा रोड तुकूम परिसरामध्ये मागील काही दिवसांपासून डिव्हायडरच्या अगदी मधोमध नव्याने विद्युत खांब लावण्यात आले आहेत. मात्र जुन्या विद्युत खांबाला लावलेले केबल रस्त्यावरच ठेवण्यात आल्याने संबंधितांचा हा हलगर्जीपणा एखाद्याचा जीव घेऊ शकतो. मात्र याचे कंत्राटदार तसेच महानगरपालिका प्रशासनाला काहीच देणे-घेणे नसल्याचे चित्र आहे. येथील सदर केबल तसेच खांब हटवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.चंद्रपूर शहरामध्ये मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहे. या विकासकामांमध्ये काही जुन्या वास्तुंचे नव्याने बांधकाम करण्यात येत आहे. त्यातच जुन्या विद्युत खांबाला हटवून चंद्रपूरच्या सौंदर्यात भर पडेल, अशा नव्या स्वरुपातील विद्युत खांब लावण्याचे काम सुरू आहे.काही ठिकाणी पोल लावण्याचे काम पूर्णही झाले आहे. मात्र जुन्या पोलला हटविण्याऐवजी ते त्याच ठिकाणी ठेवण्यात येत असल्याने अपघाताची शक्यता आहे.नवीन इलेक्ट्रीक पोल लावण्यात आल्यानंतर जुने खांब त्याच ठिकाणी उभे करून ठेवण्यात आले असून अडगळीत पडलेले केबलसुद्धा हटविण्यात आले नाही. सदर केबल अगदी रस्त्यावर असल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका प्रशासन एखादा मोठा अपघात होण्याची, तर वाट बघत नसेल ना, असा प्रश्न स्थानिकांसह प्रवाशांना पडला आहे.अधिकाऱ्यांचेही दुर्लक्षया रस्त्याने दररोज महापौर, उपमहापौर तसेच महानगरपालिकेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी दररोज ये-जा करतात. एवढेच नाही तर जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासनातील बहुतांश अधिकारीही याच रस्त्याने जातात मात्र कोणीही या केबलसंदर्भात महापालिका प्रशासनाकडे विचारणा करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.