शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

विकलांगतेवर मात करुन झुंजणाऱ्या बंडूच्या जिद्दीची कहाणी

By admin | Updated: December 3, 2015 01:18 IST

परिस्थिती कितीही बिकट असली तरी आलेल्या परिस्थितीशी दोन हात करीत झुंजायचे. मात्र हार मानायची नाही. प्रबळ इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाच्या ...

शासनदरबारी उपेक्षाच : अपंगांसाठी असलेल्या योजना कागदातच गुंडाळल्याप्रकाश काळे गोवरीपरिस्थिती कितीही बिकट असली तरी आलेल्या परिस्थितीशी दोन हात करीत झुंजायचे. मात्र हार मानायची नाही. प्रबळ इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाच्या जोरावर परिस्थितीलाच गुलाम करुन विकलांगतेवर मात करीत आयुष्याच्या खडतर वाटेवरुन सुरु झालेला प्रवास अनेकांच्या काळजालाच छेद करणारा आहे.राजुरा तालुक्यातील गोवरी येथील बंडू वाघमारे (४७) यांची कहाणी अनेकांच्या हृदयाला पाझर फोडणारी आहे. घरी अठरा विश्वे दारिद्र्य. जन्मताच हातापायांना अपंगत्व. जन्माला आलेले बाळ सुदृढ असावं ही प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. मात्र बंडूला जन्मताच अपंगत्व आले आणि जन्मदात्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने घरी दोन वेळेच्या जेवणाचे वांधे. शिकण्याची इच्छा मनात असताना घरची परिस्थिती आडवी आली. त्यामुळे जेमतेम शिक्षण पूर्ण केले. वय वाढत गेल्याने पोटापाण्याचा व रोजगाराचा प्रश्न आवासून उभा राहिला. परंतु कुठे रोजगार करावा तर शरीर साथ देत नाही. पाठीशी कुणाचा आधार नाही. आयुष्याची सारी स्वप्न मावळल्यासारखी. मात्र परिस्थितीने जिथे हात टेकले, तेथून बंडूच्या संघर्षाला सुरुवात झाली. सामान्य मानसापेक्षा बंडूची उंची कमी आहे. जन्मताच हातपाय आखूड असल्याने त्याला इतराप्रमाणे काम करता येत नाही. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने पोटाची आग त्याने जवळून अनुभवली. मनात काहीतरी नवीन करुन दाखविण्याची धडपड होती. पण शरीर साथ देत नाही. कुणाचा आधार नाही आणि कुठला रोजगार करण्याशिवाय त्याला दुसरा पर्याय नाही. सारी परिस्थितीच विपरीत आहे. मात्र अशाही परिस्थितीत संघर्षाची वाट त्यांने शोधून काढली. घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे पोटाचा सवाल बंडूला दिवस-रात्र छळत होता. परंतु त्याला कुणीही काम द्यायला धजावत नव्हते. गावात काम शोधूनही कुणी रोजगार द्यायला तयार नाही. अशाही कठीण परिस्थितीत बंडूने गावाशेजारी असणाऱ्या कोळसा खाणीतील एका ट्रॉन्सपोर्ट कंपनीत काम शोधले. परंतु विकलांगतेमुळे सहा किमी अंतरावर जाण्यायेण्याचा प्रश्न त्याच्यापुढे उभा राहिला. सायकलने जावे तर हातपाय आखूड पडतात. परंतु जिद्दीपुढे परिस्थितीला झुकवून मोठ्या हिमतीने हाल, अपेष्टा सहन करीत बंडूने सायकल चालविण्याची कला अवगत केली.एका ट्रान्सपोर्ट कंपनीत काम करताना सशक्त व्यक्तीलाही चढता उतरताना त्रास होईल. परंतु बंडू ते काम आता सरावाने करीत असल्याचे सांगतो. बंडूकडे शासनाच्या शंभर टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र आहे. शासनाकडून मदत मिळावी यासाठी अनेकदा त्याने शासकीय कार्यालयाचे उंबरडे झिजविले. परंतु त्याच्या पदरी कायम उपेक्षाच आली. अपंगाना मदत करण्यासाठी शासन कोट्यवधी रुपयांचा खर्च करते. परंतु कर्तव्यात कसूर करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे त्या योजना गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतत नाही. याउलट बोगस लाभार्थ्यांची संख्या अधिक आहे. समाजात असे अनेक विकलांग बंडू आहेत त्यांची आजही शासन दरबारी उपेक्षाच सुरू आहे. हे त्यांच्या आयुष्याचे धगधगते वास्तव कुणालाही का समजत नाही. हा खरा ज्वलंत प्रश्न शासनाची लक्तरेच वेशीवर टांगणारा आहे.समाजातील अशा असंख्य विकलांगांना त्यांना हक्काचा अधिकार व लाभ मिळाला तर त्यांच्यासाठी राबविलेल्या योजनांचे खरेच स्वार्थक लाभल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर झळकेल. मात्र विकलांग असूनही परिस्थितीशी झुंजणाऱ्या बंडूसारख्या असंख्य विकलांगांना व त्यांच्या जिद्दीला खरे तर आज सलाम करावा हवा.