शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
3
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
4
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
5
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
6
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
7
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
8
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
9
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
10
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
11
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
12
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
13
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
14
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
15
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
16
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
17
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
18
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
19
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

वादळाचा वीज वितरणला जबर फटका

By admin | Updated: May 1, 2016 00:28 IST

बुधवारी आणि गुरुवारी लागोपाठ दोन दिवस जिल्ह्यातील काही भागाला वादळाने चांगलेच झोडपले.

अनेक गावे ४८ तास अंधारात : खांब वाकले, वीज वाहिन्या तुटल्या, रोहित्रही बिघडलेचंद्रपूर : बुधवारी आणि गुरुवारी लागोपाठ दोन दिवस जिल्ह्यातील काही भागाला वादळाने चांगलेच झोडपले. या वादळामुळे घरे क्षतिग्रस्त होऊन नागरिकांचे अतोनात नुकसान झालेच; सोबत वीज वितरण कंपनीला वादळाचा जबर फटका सहन करावा लागला. केवळ चार तालुक्यातच वीज वितरणचे १४ लाखांहून अधिक नुकसान झाले आहे. अर्थातच याचा फटका नागरिकांनाही सहन करावा लागला. अनेक गावे ४८ तास अंधारात होती. अद्यापही काही गावांचा वीज पुरवठा पूर्ववत झाला नसल्याची माहिती आहे.बुधवारी रात्री जिल्ह्यात अनेक ठिकाणी चक्रीवादळासह पावसाने हजेरी लावली. तर गुरूवारीही चंद्रपूर शहरासह अनेक गावांना चक्रीवादळाचा तडाखा बसला. गुरूवारी रात्रीच्या सुमारास अनेक ठिकाणी चक्रीवादळासह पाऊस झाला. त्यामुळे अनेकांच्या घरांचे छप्परे उडाली. तर वीज कंपनीच्या खांबावर झाडे पडल्याने अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटल्या. अनेक गावातील वीज रात्रभर गूल होती. या वादळाचा सर्वाधिक फटका चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा, राजुरा व ब्रह्मपुरी तालुक्याला बसला. या पाचही तालुक्यातील अनेक गावातील कुटुंबांचे अतोनात नुकसान झाले. राजुरा तालुुक्यातील गोवरी येथे चक्रीवादळाने गावातील बहुतांश घरांचे छप्पर उडाले. अनेक मोठमोठी झाडे उन्मळून पडली. विजेचे खांब तुटल्याने राजुरा-गोवरी मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. गोवरी येथील बंडू बोरकुटे, भास्कर गंधमवार, शंकर गंधमवार, भाऊराव जुनघरी यांचा घरांची छप्परे उडाली तर प्रभाकर जुनघरी, डॉ. वासुदेव लोहे, पैकन बल्की, नवनाथ पाचभाई, रुपेश पाचभाई यांच्या गोठ्यातील टिनाचे पत्रे वाऱ्याच्या जबरदस्त तडाख्यात उडून गेली. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की घराच्या छप्परांचा सांगाडाच ५०० फुटापर्यंत दूर फेकल्या गेला होता. यात अनेकांच्या घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. दोन दिवस झालेल्या वादळाचा नागरिकांना तर फटका बसलाच; शिवाय वीज वितरण कंपनीलाही मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागले. वीज वितरण कंपनीचे जनसंपर्क अधिकारी आनंद कुमरे यांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रपूर तालुक्यात उच्चदाबाचे १८ खांब तर ४५ लघुदाबाचे वीज खांब वाकले व तुटले आहेत. चार किलोमीटरपर्यंतची वीज वाहिनी तुटली आहे. यात चार लाख ७८ हजारांचे महावितरणचे नुकसान झाले आहे. बल्लारपूर तालुक्यात उच्चदाबाचे ४३ खांब व लघुदाबाचे ७६ खांब वाकले वा तुटले आहेत. १४ किमीपर्यंतची वीज वाहिनी तुटली असून सहा रोहित्रे नादुरुस्त झाले आहेत. यातून सात लाखांचे नुकसान झाले आहे. वरोरा तालुक्यात उच्चदाबाचा एक खांब व लघुदाबाचे नऊ खांब तुटले आहेत. तीन रोहित्रे नादुरुस्त झाली असून एक किमीपर्यंतची वीज वाहिनीही तुटली आहे. यात ८५ हजारांचे नुकसान झाले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यात लघुदाबाबे ४२ खांब तुटले असून सहा किमीपर्यंतची वीज वाहिनीही तुटली आहे. या तालुक्यातही तीन रोहित्रे नादुरुस्त झाले आहे. (शहर प्रतिनिधी)