शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

वादळाचा वीज वितरणला जबर फटका

By admin | Updated: May 1, 2016 00:28 IST

बुधवारी आणि गुरुवारी लागोपाठ दोन दिवस जिल्ह्यातील काही भागाला वादळाने चांगलेच झोडपले.

अनेक गावे ४८ तास अंधारात : खांब वाकले, वीज वाहिन्या तुटल्या, रोहित्रही बिघडलेचंद्रपूर : बुधवारी आणि गुरुवारी लागोपाठ दोन दिवस जिल्ह्यातील काही भागाला वादळाने चांगलेच झोडपले. या वादळामुळे घरे क्षतिग्रस्त होऊन नागरिकांचे अतोनात नुकसान झालेच; सोबत वीज वितरण कंपनीला वादळाचा जबर फटका सहन करावा लागला. केवळ चार तालुक्यातच वीज वितरणचे १४ लाखांहून अधिक नुकसान झाले आहे. अर्थातच याचा फटका नागरिकांनाही सहन करावा लागला. अनेक गावे ४८ तास अंधारात होती. अद्यापही काही गावांचा वीज पुरवठा पूर्ववत झाला नसल्याची माहिती आहे.बुधवारी रात्री जिल्ह्यात अनेक ठिकाणी चक्रीवादळासह पावसाने हजेरी लावली. तर गुरूवारीही चंद्रपूर शहरासह अनेक गावांना चक्रीवादळाचा तडाखा बसला. गुरूवारी रात्रीच्या सुमारास अनेक ठिकाणी चक्रीवादळासह पाऊस झाला. त्यामुळे अनेकांच्या घरांचे छप्परे उडाली. तर वीज कंपनीच्या खांबावर झाडे पडल्याने अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटल्या. अनेक गावातील वीज रात्रभर गूल होती. या वादळाचा सर्वाधिक फटका चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा, राजुरा व ब्रह्मपुरी तालुक्याला बसला. या पाचही तालुक्यातील अनेक गावातील कुटुंबांचे अतोनात नुकसान झाले. राजुरा तालुुक्यातील गोवरी येथे चक्रीवादळाने गावातील बहुतांश घरांचे छप्पर उडाले. अनेक मोठमोठी झाडे उन्मळून पडली. विजेचे खांब तुटल्याने राजुरा-गोवरी मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. गोवरी येथील बंडू बोरकुटे, भास्कर गंधमवार, शंकर गंधमवार, भाऊराव जुनघरी यांचा घरांची छप्परे उडाली तर प्रभाकर जुनघरी, डॉ. वासुदेव लोहे, पैकन बल्की, नवनाथ पाचभाई, रुपेश पाचभाई यांच्या गोठ्यातील टिनाचे पत्रे वाऱ्याच्या जबरदस्त तडाख्यात उडून गेली. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की घराच्या छप्परांचा सांगाडाच ५०० फुटापर्यंत दूर फेकल्या गेला होता. यात अनेकांच्या घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. दोन दिवस झालेल्या वादळाचा नागरिकांना तर फटका बसलाच; शिवाय वीज वितरण कंपनीलाही मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागले. वीज वितरण कंपनीचे जनसंपर्क अधिकारी आनंद कुमरे यांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रपूर तालुक्यात उच्चदाबाचे १८ खांब तर ४५ लघुदाबाचे वीज खांब वाकले व तुटले आहेत. चार किलोमीटरपर्यंतची वीज वाहिनी तुटली आहे. यात चार लाख ७८ हजारांचे महावितरणचे नुकसान झाले आहे. बल्लारपूर तालुक्यात उच्चदाबाचे ४३ खांब व लघुदाबाचे ७६ खांब वाकले वा तुटले आहेत. १४ किमीपर्यंतची वीज वाहिनी तुटली असून सहा रोहित्रे नादुरुस्त झाले आहेत. यातून सात लाखांचे नुकसान झाले आहे. वरोरा तालुक्यात उच्चदाबाचा एक खांब व लघुदाबाचे नऊ खांब तुटले आहेत. तीन रोहित्रे नादुरुस्त झाली असून एक किमीपर्यंतची वीज वाहिनीही तुटली आहे. यात ८५ हजारांचे नुकसान झाले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यात लघुदाबाबे ४२ खांब तुटले असून सहा किमीपर्यंतची वीज वाहिनीही तुटली आहे. या तालुक्यातही तीन रोहित्रे नादुरुस्त झाले आहे. (शहर प्रतिनिधी)