शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
2
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
3
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
4
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
5
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
6
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
7
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
8
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
9
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
10
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
11
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
12
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
13
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
14
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
15
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
16
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
17
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
18
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
19
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
20
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू

वादळाचा वीज वितरणला जबर फटका

By admin | Updated: May 1, 2016 00:28 IST

बुधवारी आणि गुरुवारी लागोपाठ दोन दिवस जिल्ह्यातील काही भागाला वादळाने चांगलेच झोडपले.

अनेक गावे ४८ तास अंधारात : खांब वाकले, वीज वाहिन्या तुटल्या, रोहित्रही बिघडलेचंद्रपूर : बुधवारी आणि गुरुवारी लागोपाठ दोन दिवस जिल्ह्यातील काही भागाला वादळाने चांगलेच झोडपले. या वादळामुळे घरे क्षतिग्रस्त होऊन नागरिकांचे अतोनात नुकसान झालेच; सोबत वीज वितरण कंपनीला वादळाचा जबर फटका सहन करावा लागला. केवळ चार तालुक्यातच वीज वितरणचे १४ लाखांहून अधिक नुकसान झाले आहे. अर्थातच याचा फटका नागरिकांनाही सहन करावा लागला. अनेक गावे ४८ तास अंधारात होती. अद्यापही काही गावांचा वीज पुरवठा पूर्ववत झाला नसल्याची माहिती आहे.बुधवारी रात्री जिल्ह्यात अनेक ठिकाणी चक्रीवादळासह पावसाने हजेरी लावली. तर गुरूवारीही चंद्रपूर शहरासह अनेक गावांना चक्रीवादळाचा तडाखा बसला. गुरूवारी रात्रीच्या सुमारास अनेक ठिकाणी चक्रीवादळासह पाऊस झाला. त्यामुळे अनेकांच्या घरांचे छप्परे उडाली. तर वीज कंपनीच्या खांबावर झाडे पडल्याने अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटल्या. अनेक गावातील वीज रात्रभर गूल होती. या वादळाचा सर्वाधिक फटका चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा, राजुरा व ब्रह्मपुरी तालुक्याला बसला. या पाचही तालुक्यातील अनेक गावातील कुटुंबांचे अतोनात नुकसान झाले. राजुरा तालुुक्यातील गोवरी येथे चक्रीवादळाने गावातील बहुतांश घरांचे छप्पर उडाले. अनेक मोठमोठी झाडे उन्मळून पडली. विजेचे खांब तुटल्याने राजुरा-गोवरी मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. गोवरी येथील बंडू बोरकुटे, भास्कर गंधमवार, शंकर गंधमवार, भाऊराव जुनघरी यांचा घरांची छप्परे उडाली तर प्रभाकर जुनघरी, डॉ. वासुदेव लोहे, पैकन बल्की, नवनाथ पाचभाई, रुपेश पाचभाई यांच्या गोठ्यातील टिनाचे पत्रे वाऱ्याच्या जबरदस्त तडाख्यात उडून गेली. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की घराच्या छप्परांचा सांगाडाच ५०० फुटापर्यंत दूर फेकल्या गेला होता. यात अनेकांच्या घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. दोन दिवस झालेल्या वादळाचा नागरिकांना तर फटका बसलाच; शिवाय वीज वितरण कंपनीलाही मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागले. वीज वितरण कंपनीचे जनसंपर्क अधिकारी आनंद कुमरे यांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रपूर तालुक्यात उच्चदाबाचे १८ खांब तर ४५ लघुदाबाचे वीज खांब वाकले व तुटले आहेत. चार किलोमीटरपर्यंतची वीज वाहिनी तुटली आहे. यात चार लाख ७८ हजारांचे महावितरणचे नुकसान झाले आहे. बल्लारपूर तालुक्यात उच्चदाबाचे ४३ खांब व लघुदाबाचे ७६ खांब वाकले वा तुटले आहेत. १४ किमीपर्यंतची वीज वाहिनी तुटली असून सहा रोहित्रे नादुरुस्त झाले आहेत. यातून सात लाखांचे नुकसान झाले आहे. वरोरा तालुक्यात उच्चदाबाचा एक खांब व लघुदाबाचे नऊ खांब तुटले आहेत. तीन रोहित्रे नादुरुस्त झाली असून एक किमीपर्यंतची वीज वाहिनीही तुटली आहे. यात ८५ हजारांचे नुकसान झाले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यात लघुदाबाबे ४२ खांब तुटले असून सहा किमीपर्यंतची वीज वाहिनीही तुटली आहे. या तालुक्यातही तीन रोहित्रे नादुरुस्त झाले आहे. (शहर प्रतिनिधी)