शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

वादळाने ३९५ वीज खांब कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2016 00:42 IST

गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात चक्रीवादळासह अवकाळी पाऊस सुरू आहे.

चक्रीवादळाचा फटका : महावितरण कंपनीचे २० लाखांचे नुकसानचंद्रपूर : गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात चक्रीवादळासह अवकाळी पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक नागरिकांचे नुकसान झाले असून या वादळाचा सर्वाधिक फटका महावितरण कंपनीला बसला आहे. चक्रीवादळाने चंद्रपूर, ब्रह्मपुरी, बल्लारपूर, वरोरा या चार विभागात उच्च दाब व लघु दाबाचे तब्बल ३९५ वीज खांब कोसळले. त्यामुळे अंदाजे २० लाखांचे नुकसान झाल्याची माहिती महाविरण कंपनीने दिली आहे. यावर्षीच्या सुरूवातीपासूनच अवकाळी पाऊस सुरू आहे. फेब्रुवारी व मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने रबी पिकांना फटका बसला होता. तर एप्रिल व आता मे महिन्यातही अवकाळी पाऊस सुरूच आहे. चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर अनेकांच्या घरांचे छप्परे उडाली. त्यामुळे अनेक नागरिकांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. महावितरण कंपनीच्या चंद्रपूर विभागात उच्च दाबाचे ३५ खांब, लघु दाबाचे ८५ खांब कोसळले तर ९ वीज वाहिन्यांच्या तारा तुटल्या. बल्लारपूर विभागात उच्च दाबाचे २७, लघु दाबाचे ९५ तर १२ वीज वाहिन्यांचे तारा तुटले. वरोरा विभागात उच्च दाबाचे १० खांब व लघु दाबाचे १०१ खांब कोसळले. तर २ रोहित्रांचे नुकसान झाले.ब्रह्मपुरी विभागात लघु दाबाचे ४२ वीज खांब कोसळले तर ६ रोहित्रांचे नुकसान झाले आहे. यात अंदाजे २० लाख रूपयाचे नुकसान झाले आहे. वादळामुळे अनेक गावातील वीज पुरवठा खंडीत झाला असून काही गावातील वीज पुरवठा अद्यापही सुरू झालेला नाही. (स्थानिक प्रतिनिधी)