शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

वादळाने ३९५ वीज खांब कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2016 00:42 IST

गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात चक्रीवादळासह अवकाळी पाऊस सुरू आहे.

चक्रीवादळाचा फटका : महावितरण कंपनीचे २० लाखांचे नुकसानचंद्रपूर : गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात चक्रीवादळासह अवकाळी पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक नागरिकांचे नुकसान झाले असून या वादळाचा सर्वाधिक फटका महावितरण कंपनीला बसला आहे. चक्रीवादळाने चंद्रपूर, ब्रह्मपुरी, बल्लारपूर, वरोरा या चार विभागात उच्च दाब व लघु दाबाचे तब्बल ३९५ वीज खांब कोसळले. त्यामुळे अंदाजे २० लाखांचे नुकसान झाल्याची माहिती महाविरण कंपनीने दिली आहे. यावर्षीच्या सुरूवातीपासूनच अवकाळी पाऊस सुरू आहे. फेब्रुवारी व मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने रबी पिकांना फटका बसला होता. तर एप्रिल व आता मे महिन्यातही अवकाळी पाऊस सुरूच आहे. चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर अनेकांच्या घरांचे छप्परे उडाली. त्यामुळे अनेक नागरिकांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. महावितरण कंपनीच्या चंद्रपूर विभागात उच्च दाबाचे ३५ खांब, लघु दाबाचे ८५ खांब कोसळले तर ९ वीज वाहिन्यांच्या तारा तुटल्या. बल्लारपूर विभागात उच्च दाबाचे २७, लघु दाबाचे ९५ तर १२ वीज वाहिन्यांचे तारा तुटले. वरोरा विभागात उच्च दाबाचे १० खांब व लघु दाबाचे १०१ खांब कोसळले. तर २ रोहित्रांचे नुकसान झाले.ब्रह्मपुरी विभागात लघु दाबाचे ४२ वीज खांब कोसळले तर ६ रोहित्रांचे नुकसान झाले आहे. यात अंदाजे २० लाख रूपयाचे नुकसान झाले आहे. वादळामुळे अनेक गावातील वीज पुरवठा खंडीत झाला असून काही गावातील वीज पुरवठा अद्यापही सुरू झालेला नाही. (स्थानिक प्रतिनिधी)