शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
5
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
6
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
7
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
8
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
9
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
10
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
11
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
12
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
13
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
14
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
15
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
16
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
17
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
18
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
19
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
20
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटातील आदिवासींवरील अन्याय थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 23:18 IST

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हजारो पुनर्वसीत आदिवासी समाज बांधव आपल्या न्यायासाठी संविधानिक मार्गाने धरणे आंदोलन करीत होते. परंतु, निमलष्करी दलाच्या पथकाने आदिवासींना अटक केली. आदिवासी महिला, मुले, वृद्धांना बळजबरीने पकडून बाजूच्या प्रादेशिक जंगलात नेऊन सोडण्यात आले. ही घटना अत्यंत निंदणीय असून, मानवाधिकाराचे उल्लंघन आहे. प्रशासनाकडून आदिवासी बांधवांवर होेणारा अन्याय थांबविण्याची मागणी आॅल इंडिया आदिवासी एम्प्लॉज फेडरेशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देआॅल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हजारो पुनर्वसीत आदिवासी समाज बांधव आपल्या न्यायासाठी संविधानिक मार्गाने धरणे आंदोलन करीत होते. परंतु, निमलष्करी दलाच्या पथकाने आदिवासींना अटक केली. आदिवासी महिला, मुले, वृद्धांना बळजबरीने पकडून बाजूच्या प्रादेशिक जंगलात नेऊन सोडण्यात आले. ही घटना अत्यंत निंदणीय असून, मानवाधिकाराचे उल्लंघन आहे. प्रशासनाकडून आदिवासी बांधवांवर होेणारा अन्याय थांबविण्याची मागणी आॅल इंडिया आदिवासी एम्प्लॉज फेडरेशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.मेळघाट व्याघ्र प्रकल्पात असलेल्या अमोना, वारूरेडा, धारगड, सोमठाणा, सोमठाणा खुर्द, गुल्लरघाट, तेलपानी, नागरतास गावातील आदिवासी बांधवांचे पुनर्वसन करण्यात आलेले आहे. त्यांच्याकडील एकूण २५०० एकर जमीन, घरेदारे, विहिरी, इत्यादींचा समर्पणनामा करून घेण्यात आला.पाच लाख रुपये किंमतीच्या जमिनी अत्यंत कमी किंमतीत खरेदी केल्या. सन २०१२ मध्ये त्यांच्याकडून जमिनी, घरे, विहिरी या स्थावर मालमत्तेचा समर्पणानामा करून घेण्यात आला. विस्थापित आदिवासींना पुनर्वसन झाल्यानंतर मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. तसेच भूमिहीन झालेल्यांना पर्यायी शेती दिलेली नाही. याबाबत आंदोलन करताना आदिवासींना अटक करण्यात आली. आदिवासींवर प्रशासनांकडून वारंवार अन्याय करण्यात येतो. हा अन्याय थांबविण्याची मागणी आॅल इंडिया आदिवासी एम्प्लाईज फेडरेशनच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्यपाल यांना पाठिवलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.निवेदन देणाºया शिष्टमंडळात आॅल इंडिया आदिवासी एम्प्लाईज फेडरेशनचे जिल्हा सचिव प्रा. धिरज शेडमाके, कार्याध्यक्ष विजय तोडासे, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिल्हाध्यक्ष मनोज आत्राम, चंद्रपूर, गोंडवाना विद्यार्थी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सारंग कुमरे, जागतिक गोंड सभा मांदीचे गणेश आत्राम, प्रशांत गावंडे, श्रीहरी सिडाम, जगन येलके, फुलचंद मडावी, दिनेश गेडाम उपस्थित होते.