शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

दीक्षाभूमीचे व्यापारीकरण थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2016 00:39 IST

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स असोसिएशनच्या वतीने दीक्षाभूमीचे व्यापारीकरण थांबविण्यासंबंधी चंद्रपूर येथील ५८ वकिलांच्या स्वाक्षरीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

वकिलांचे निवेदन : इतिहासाचे माहात्म्य जपाचंद्रपूर: येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स असोसिएशनच्या वतीने दीक्षाभूमीचे व्यापारीकरण थांबविण्यासंबंधी चंद्रपूर येथील ५८ वकिलांच्या स्वाक्षरीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चंद्रपूर येथील दीक्षाभूमीवर १६ आॅक्टोबर १९५६ ला लाखो शोषित व वंचित घटकातील लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. तेव्हापासून दीक्षाभूमी ही संपूर्ण महाराष्ट्रातील व देशातील बौद्ध बांधवाचे श्रद्धास्थान आहे. दीक्षाभूमीवरील व्यवस्थापन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटी, चंद्रपूरकडे आहे. गेल्या काही वर्षांपासून व्यवस्थापन कमिटीने दीक्षाभूमीची पवित्र जागा क्रॉफ्ट मेलासाठी देऊन दीक्षाभूमीचे व्यापारीकण करणे सुरु केले. त्यावर चंद्रपूर शहरातील बौद्ध समाजाने आपला विरोधसुद्धा दर्शविला होता. परंतु व्यवस्थापन कमिटीने यावर्षीसुद्धा बौद्ध समाजाचा व त्यांच्या भावनेचा कोणताही विचार न करता दीक्षाभूमीची पवित्र जागा क्राफ्ट मेलासाठी देऊन दीक्षाभूमीचे व्यापारीकरण करुन त्याचा फक्त नफा कमविण्याचे साधन म्हणून वापर करीत आहे. त्यामुळे चंद्रपूर शहरातील बौद्ध समाजाच्या भावनेला हरताळ फासला जात आहे. नागपूर शहरानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा देण्याकरिता चंद्रपूर शहराची निवड केली. ही संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील बौद्ध समाजाकरिता अभिमानाची गोष्ट आहे. सोबतच त्याचे पावित्र्य राखून ठेवण्याची जबाबदारी जितकी बौद्ध समाजाची आहे तितकीच प्रशासनाचीसुद्धा आहे.प्रशासनाद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी, चंद्रपूर यांना चंद्रपूर दीक्षाभूमीवर असलेला क्राफ्ट मेला त्वरित खाली करण्याची समज देण्यात यावी. तसेच क्राफ्ट मेलाच्या प्रशासकालासुद्धा दीक्षाभूमीवरुन क्राफ्ट मेला त्वरित बंद करुन दीक्षाभूमीची जागा मोकळी करुन देण्यात निर्देश देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. निवेदन देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स असोसिएशन चंद्रपूरचे अध्यक्ष अ‍ॅड. एन. बी. रामटेके, सचिव अ‍ॅड. पूनमचंद वाकडे, कोषाध्यक्ष अ‍ॅड. एम. पी. तेलंग, वरिष्ठ अधिवक्ता अ‍ॅड. मिलिंद लोहकरे, तसेच अ‍ॅड. ज. वि. खोब्रागडे, अ‍ॅड. ए. जे. आघात, अ‍ॅड. वावरे, अ‍ॅड. गायकवाड, अ‍ॅड. जिलेकर, अ‍ॅड. वैशाली कवाडे, अ‍ॅड. कवाडे, अ‍ॅड. गोंगले, अ‍ॅड. काकडे व पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)