शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
4
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
5
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
6
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
7
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!
8
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
9
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
10
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
11
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
12
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
13
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
14
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
15
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
16
Gold Rate Today 15 May: एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
17
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
18
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
19
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
20
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं

मनपाच्या अग्निशमन दलाचे स्टेअरिंग कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हातात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:53 IST

चंद्रपूर : नगरपरिषदेचे महानगरपालिकेत रूपांतर होऊनही येथील अग्निशमन दल विभागात अद्यापही स्थायी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली नाही. परिणामी कंत्राटी ...

चंद्रपूर : नगरपरिषदेचे महानगरपालिकेत रूपांतर होऊनही येथील अग्निशमन दल विभागात अद्यापही स्थायी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली नाही. परिणामी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर मनपा अग्निशमन विभागाची धुरा आहे. त्यामुळे कुठेही मोठी आग लागल्यास या कर्मचाऱ्यांची मोठी तारांबळ उडते.

मागील आठवड्यात चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राला आग लागली होती. उन्हाळ्यात अशा घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात. चंद्रपूर येथे नगरपरिषद असल्यापासून अग्निशमन विभाग कार्यरत आहे. नगर परिषदेचे रूपांतर मनपामध्ये झाल्यानंतरही येथील अग्निशमन विभागात स्थायी कर्मचाऱ्यांची भरणा करण्यात आली नाही. केवळ ३० च्या जवळपास कंत्राटी कर्मचारी आहेत. त्यातही तज्ज्ञ कर्मचारी नाही. सन २०१३ च्या आकृतिबंध ९६ पदांचा प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यानंतर ५३ पदे वाढवून १४९ पदांचा आकृतिबंध पाठविण्यात आला. मात्र, दोन्ही प्रस्तावाला अद्यापही मंजुरी मिळाली नाही. परिणामी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरवशावरच अग्निशमन विभागाचा कारभार सुरू आहे.

बॉक्स

प्रस्तावात पाठविलेली पदे

मुख्य अग्निशमन अधिकारी १

उपमुख्य अग्निशमन अधिकारी १

विभागीय अग्निशमन अधिकारी

सहायक विभागीय अधिकारी १

अग्निशमन केंद्र अधिकारी १

सहायक अग्निशमन केंद्र अधिकारी ३

उप अग्निशमन अधिकारी ४

प्रमुख अग्निशमन विमोचक ५

चालक यंत्रचालक २०

वाहनचालक अग्निशमन ३५

अग्निशमन विमोचक फायरमन ७५

कोट

स्थायी कर्मचाऱ्यांसंदर्भात भरतीचा प्रस्ताव पाठविला आहे. तो प्रस्ताव मंजुरीच्या प्रक्रियेत आहे. सद्य:स्थितीत ३० च्या जवळपास कर्मचारी कार्यरत आहेत. नियमित फायर ऑफिसरचे पद रिक्त असल्याने तांत्रिक अडचणी जाणवत असतात.

विशाल वाघ, उपायुक्त मनपा, चंद्रपूर

बॉक्स

- जिल्हा नियोजन समितीतून निधी

मनपा अग्निशमन दलाला जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून दिला जातो. त्याचवेळी महापालिकेच्या करामध्ये वसूल केलेल्या अग्निशमन कर आणि नाहरकत प्रमाणपत्रासाठी आकारलेल्या शुल्कातून निधी उपलब्ध होता.

बॉक्स

दोनदा पाठविला प्रस्ताव

-मनपा अग्निशमन विभागातील ९६ पदांच्या आकृतिबंधाचा प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यानंतर ५३ पदांची वाढ करून १४९ पदांचा सुधारित आकृतिबंध पाठविण्यात आला. मात्र, अद्यापही त्याला मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे सद्य:स्थितीत कार्यरत ३० कंत्राटी कर्मचारी विभागाचा डोलारा सांभाळत आहेत.

-उन्हाळ्यांमध्ये आगीच्या घटना नेहमीच घडत असतात. मात्र, अपुरे मनुष्यबळ व स्थायी कर्मचाऱ्यांअभावी मोठी तारांबळ उडत असते.