शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या अग्निशमन दलाचे स्टेअरिंग कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हातात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:53 IST

चंद्रपूर : नगरपरिषदेचे महानगरपालिकेत रूपांतर होऊनही येथील अग्निशमन दल विभागात अद्यापही स्थायी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली नाही. परिणामी कंत्राटी ...

चंद्रपूर : नगरपरिषदेचे महानगरपालिकेत रूपांतर होऊनही येथील अग्निशमन दल विभागात अद्यापही स्थायी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली नाही. परिणामी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर मनपा अग्निशमन विभागाची धुरा आहे. त्यामुळे कुठेही मोठी आग लागल्यास या कर्मचाऱ्यांची मोठी तारांबळ उडते.

मागील आठवड्यात चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राला आग लागली होती. उन्हाळ्यात अशा घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात. चंद्रपूर येथे नगरपरिषद असल्यापासून अग्निशमन विभाग कार्यरत आहे. नगर परिषदेचे रूपांतर मनपामध्ये झाल्यानंतरही येथील अग्निशमन विभागात स्थायी कर्मचाऱ्यांची भरणा करण्यात आली नाही. केवळ ३० च्या जवळपास कंत्राटी कर्मचारी आहेत. त्यातही तज्ज्ञ कर्मचारी नाही. सन २०१३ च्या आकृतिबंध ९६ पदांचा प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यानंतर ५३ पदे वाढवून १४९ पदांचा आकृतिबंध पाठविण्यात आला. मात्र, दोन्ही प्रस्तावाला अद्यापही मंजुरी मिळाली नाही. परिणामी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरवशावरच अग्निशमन विभागाचा कारभार सुरू आहे.

बॉक्स

प्रस्तावात पाठविलेली पदे

मुख्य अग्निशमन अधिकारी १

उपमुख्य अग्निशमन अधिकारी १

विभागीय अग्निशमन अधिकारी

सहायक विभागीय अधिकारी १

अग्निशमन केंद्र अधिकारी १

सहायक अग्निशमन केंद्र अधिकारी ३

उप अग्निशमन अधिकारी ४

प्रमुख अग्निशमन विमोचक ५

चालक यंत्रचालक २०

वाहनचालक अग्निशमन ३५

अग्निशमन विमोचक फायरमन ७५

कोट

स्थायी कर्मचाऱ्यांसंदर्भात भरतीचा प्रस्ताव पाठविला आहे. तो प्रस्ताव मंजुरीच्या प्रक्रियेत आहे. सद्य:स्थितीत ३० च्या जवळपास कर्मचारी कार्यरत आहेत. नियमित फायर ऑफिसरचे पद रिक्त असल्याने तांत्रिक अडचणी जाणवत असतात.

विशाल वाघ, उपायुक्त मनपा, चंद्रपूर

बॉक्स

- जिल्हा नियोजन समितीतून निधी

मनपा अग्निशमन दलाला जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून दिला जातो. त्याचवेळी महापालिकेच्या करामध्ये वसूल केलेल्या अग्निशमन कर आणि नाहरकत प्रमाणपत्रासाठी आकारलेल्या शुल्कातून निधी उपलब्ध होता.

बॉक्स

दोनदा पाठविला प्रस्ताव

-मनपा अग्निशमन विभागातील ९६ पदांच्या आकृतिबंधाचा प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यानंतर ५३ पदांची वाढ करून १४९ पदांचा सुधारित आकृतिबंध पाठविण्यात आला. मात्र, अद्यापही त्याला मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे सद्य:स्थितीत कार्यरत ३० कंत्राटी कर्मचारी विभागाचा डोलारा सांभाळत आहेत.

-उन्हाळ्यांमध्ये आगीच्या घटना नेहमीच घडत असतात. मात्र, अपुरे मनुष्यबळ व स्थायी कर्मचाऱ्यांअभावी मोठी तारांबळ उडत असते.