शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
2
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
3
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
4
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सतारा टोल रोड प्रोजेक्ट
5
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
6
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
7
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!
8
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
9
Tarot Card: पुढच्या आठवड्यात येणार गणपती बाप्पा, कुठल्याही परिस्थितीत, तोच दाखवेल मार्ग सोप्पा
10
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
11
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
12
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
13
'माझ्या जीवाला धोका, अनुचित प्रकार घडल्यास सपा जबाबदार' महिला आमदाराचं अखिलेश यादव यांना पत्र
14
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
15
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
16
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
17
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
18
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
19
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
20
‘बेस्ट पतपेढी’ अपयशानंतर सामंतांनी दिला राजीनामा; पराभव का झाला ते कारणही सांगितलं

मनपाच्या अग्निशमन दलाचे स्टेअरिंग कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हातात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:53 IST

चंद्रपूर : नगरपरिषदेचे महानगरपालिकेत रूपांतर होऊनही येथील अग्निशमन दल विभागात अद्यापही स्थायी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली नाही. परिणामी कंत्राटी ...

चंद्रपूर : नगरपरिषदेचे महानगरपालिकेत रूपांतर होऊनही येथील अग्निशमन दल विभागात अद्यापही स्थायी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली नाही. परिणामी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर मनपा अग्निशमन विभागाची धुरा आहे. त्यामुळे कुठेही मोठी आग लागल्यास या कर्मचाऱ्यांची मोठी तारांबळ उडते.

मागील आठवड्यात चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राला आग लागली होती. उन्हाळ्यात अशा घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात. चंद्रपूर येथे नगरपरिषद असल्यापासून अग्निशमन विभाग कार्यरत आहे. नगर परिषदेचे रूपांतर मनपामध्ये झाल्यानंतरही येथील अग्निशमन विभागात स्थायी कर्मचाऱ्यांची भरणा करण्यात आली नाही. केवळ ३० च्या जवळपास कंत्राटी कर्मचारी आहेत. त्यातही तज्ज्ञ कर्मचारी नाही. सन २०१३ च्या आकृतिबंध ९६ पदांचा प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यानंतर ५३ पदे वाढवून १४९ पदांचा आकृतिबंध पाठविण्यात आला. मात्र, दोन्ही प्रस्तावाला अद्यापही मंजुरी मिळाली नाही. परिणामी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरवशावरच अग्निशमन विभागाचा कारभार सुरू आहे.

बॉक्स

प्रस्तावात पाठविलेली पदे

मुख्य अग्निशमन अधिकारी १

उपमुख्य अग्निशमन अधिकारी १

विभागीय अग्निशमन अधिकारी

सहायक विभागीय अधिकारी १

अग्निशमन केंद्र अधिकारी १

सहायक अग्निशमन केंद्र अधिकारी ३

उप अग्निशमन अधिकारी ४

प्रमुख अग्निशमन विमोचक ५

चालक यंत्रचालक २०

वाहनचालक अग्निशमन ३५

अग्निशमन विमोचक फायरमन ७५

कोट

स्थायी कर्मचाऱ्यांसंदर्भात भरतीचा प्रस्ताव पाठविला आहे. तो प्रस्ताव मंजुरीच्या प्रक्रियेत आहे. सद्य:स्थितीत ३० च्या जवळपास कर्मचारी कार्यरत आहेत. नियमित फायर ऑफिसरचे पद रिक्त असल्याने तांत्रिक अडचणी जाणवत असतात.

विशाल वाघ, उपायुक्त मनपा, चंद्रपूर

बॉक्स

- जिल्हा नियोजन समितीतून निधी

मनपा अग्निशमन दलाला जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून दिला जातो. त्याचवेळी महापालिकेच्या करामध्ये वसूल केलेल्या अग्निशमन कर आणि नाहरकत प्रमाणपत्रासाठी आकारलेल्या शुल्कातून निधी उपलब्ध होता.

बॉक्स

दोनदा पाठविला प्रस्ताव

-मनपा अग्निशमन विभागातील ९६ पदांच्या आकृतिबंधाचा प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यानंतर ५३ पदांची वाढ करून १४९ पदांचा सुधारित आकृतिबंध पाठविण्यात आला. मात्र, अद्यापही त्याला मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे सद्य:स्थितीत कार्यरत ३० कंत्राटी कर्मचारी विभागाचा डोलारा सांभाळत आहेत.

-उन्हाळ्यांमध्ये आगीच्या घटना नेहमीच घडत असतात. मात्र, अपुरे मनुष्यबळ व स्थायी कर्मचाऱ्यांअभावी मोठी तारांबळ उडत असते.