शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

परीक्षेतील यशासाठी तणावमुक्त राहा - रवींद्र क्षीरसागर

By admin | Updated: April 16, 2017 00:26 IST

आयुष्याचा प्रवास यशासाठी असतो. त्यासाठी परीक्षा द्याव्याच लागतात. मात्र या परीक्षांतील यशासाठी तणावमुक्त राहा, असा मोलाचा सल्ला डॉ. रविंद्र क्षिरसागर यांनी दिला.

लोकमत व गायडन्स पॉर्इंटचा उपक्रम : विद्यार्थ्यांसाठी पार पडला सेमिनार व शिष्यवृत्ती परीक्षा चंद्रपूर : आयुष्याचा प्रवास यशासाठी असतो. त्यासाठी परीक्षा द्याव्याच लागतात. मात्र या परीक्षांतील यशासाठी तणावमुक्त राहा, असा मोलाचा सल्ला डॉ. रविंद्र क्षिरसागर यांनी दिला.लोकमत व गायडन्स पार्इंटद्वारे स्थानिक लक्ष्मीनारायण मंदिर सभागृहात सेमिनार व शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन १५ एप्रिलला पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. रविंद्र क्षिरसागर यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी लोकमत परिवारातील जेष्ठ सदस्य अशोक बोथरा होते. प्रमुख पाहुणे म्हणून गाईडन्स पॉर्इंटचे संचालक संजय कर्माकर, आपरेशन इंचार्ज रितेश लोहकरे, कार्यकारी संचालक सिद्धार्थ वाहने, इन्फोसीसचे व्यवस्थापक मनिष नेमा, लोकमत जिल्हा कार्यालयाचे सहाय्यक शाखा व्यवस्थापक विनोद बुले, लोकमत जिल्हा प्रतिनिधी गोपालकृष्ण मांडवकर उपस्थित होते. डॉ. रवींद्र क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सेमिनारमध्ये देशातील प्रमुख इंजिनिअरिंग कॉलेजची माहिती दिली. त्याच बरोबर जेईई मेन, जेईई अ‍ॅडव्हान्स व ‘नीट’ परीक्षेचे बदलते स्वरूप यासंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच जेईई मेन, अ‍ॅडव्हान्स व नीटची तयारी विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे करावी, त्यात पालकांनी आपल्या पाल्याला कशाप्रकारे मार्गदर्शन करावे, याबाबत सविस्तर माहिती दिली.दरम्यान, उपस्थित विद्यार्थ्यांनी डॉ. रवींद्र क्षीरसागर यांना विविध प्रश्न विचारून शंकांचे निराकरण केले. गाईडन्स पॉर्इंटचे संचालक संजय कर्माकर, आॅपरेशन इंचार्ज रितेश लोहकरे, इन्फोसीसचे व्यवस्थापक मनिष नेमा यांनीसुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचा उत्साह वाखण्याजोगे होता. सेमिनारमध्ये ४०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सेमिनारनंतर लगेचच शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली.यात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना गाईडन्स पॉर्इंटतर्फे शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा इव्हेंट प्रमुख अमोल कडूकर यांनी तर आभार लोकमत सखी मंच सयोजिका पूजा ठाकरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी झिनत पठाण, प्रियंका वरघने, सोनाली मडावी यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)