शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

राजुऱ्याचे रेल्वेगेट ठरत आहे डोकेदुखी

By admin | Updated: January 7, 2016 01:31 IST

राजुरा-आसिफाबाद रोडवरील रेल्वे गेट विद्यार्थी व नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

वाहतूक ठप्प : दिवसातून १५ वेळा गेट बंदराजुरा : राजुरा-आसिफाबाद रोडवरील रेल्वे गेट विद्यार्थी व नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.रेल्वेगेटच्या बाहेर शिवाजी महाविद्यालय, आदर्श मराठी प्राथमिक शाळा, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, न्यु एरा इंग्लिश कॉन्व्हेंट आहे. यामध्ये जवळपास १० हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. नेमके शाळेत जायच्या वेळेलाच गेट बंद पडते. दिवसातून १०-१५ वेळा गेट बंद पडत असून अर्धा- अर्धा तास गेट बंद असते. त्यामुळे विद्यार्थी व पालकांची मोठी रांगच उभी होते.या रेल्वे गेटचा फायदा सामान्य नागरिकांना मुळीच नाही. केवळ उद्योगांमध्ये निर्मित सिमेंटच्या वाहतुकीसाठी रेल्वेगेट तयार झाला. वर्षाला कोट्यवधीचा नफा कमविणाऱ्या या कंपन्यानी याठिकाणी उड्डाण पूल तयार करुन देणे गरजेचे आहे. या रेल्वेगेटजवळ मोठमोठे खड्डे पडले आहे. दोन महिन्यांपूर्वी तयार केलेला रस्ता निकृष्ट कामामुळे उखडून गेला आहे. त्यामुळे अनेकवेळा अपघाताच्याही घटना घडल्या आहेत. सिमेंट कंपन्या झाल्या, हे ठिक झाले. परंतु राजुरा शहरातील नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार संतापदायक आहे. या रेल्वेगेटजवळ डिवायडर नसल्यामुळे गाडी गेल्यानंतर नेहमी गर्दी होत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अपघातसुद्धा होऊ शकतो. या गेटवर उड्डान पूल न बांधल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. (शहर प्रतिनिधी)