शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

इलेक्ट्रिक साहित्य दुरुस्तीच्या कामाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:20 IST

पीककर्ज रकमेची मर्यादा वाढवा चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक गावांत शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे उपजीविकेचे साधन ...

पीककर्ज रकमेची मर्यादा वाढवा

चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक गावांत शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे उपजीविकेचे साधन शेतीवर अवलंबून आहे. शेतीतून खरीप व रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे पीककर्ज रकमेची मर्यादा वाढविण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

वीज खांबामुळे अपघाताचा धोका

चंद्रपूर : येथील अनेक वॉर्डातील रस्त्यालगत असलेले विद्युत खांब गंजले आहेत. हा खांब कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा खांब बदलविण्याची मागणी होत आहे. यापूर्वी अनेकदा हा खांब बदलविण्याची मागणी नागरिकांकडून झाली आहे; परंतु याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे धोका होण्याची शक्यता आहे.

ग्रामीण भागात शौचालयांचा गैरवापर

चंद्रपूर : परिसरातील अनेक गावात गोवऱ्या, सरपणाची लाकडे, निरुपयोगी वस्तू नागरिक शौचालयात भरून ठेवत आहे. त्यामुळे या गावांमध्ये जनजागृती करून शौचालयाचा वापर करण्यासंदर्भात नागरिकांना सांगणे गरजेचे आहे.

रस्त्याच्या बाजूला असलेला कचरा उचलावा

चंद्रपूर : शहरातील प्रत्येक वार्डात स्वच्छता कर्मचारी दैनंदिन स्वच्छता करीत आहेत. मात्र, अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला बांधकाम साहित्य व वाहने ठेवण्याच्या प्रकार मोठ्या प्रमाणात आहे. परिणामी नागरिक त्याच ठिकाणी कचरा टाकतात. याकडे महानगरपालिकेने स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दुकानात सोशल डिस्टन्सचा फज्जा

चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स ठेवणे गरजेचे आहे. यासंदर्भात प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना केल्या जात आहे. असे असतानाही काही किराणा दुकानांमध्ये सोशल डिस्टन्स न पाळता जीवनावश्यक साहित्याची खरेदी केली जात आहे. त्यामुळे वेळीच आळा घालणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, गोल बाजारातील बहुतांश दुकानदार याकडे दुर्लक्ष करीत आहे.

जडवाहतुकीवर निर्बंध घाला

चंद्रपूर : शहरातील काही रस्त्यांची क्षमता कमी असतानाही जास्त वजन असलेल्या वाहनांद्वारे साहित्य आणण्यात येत असल्याने रस्त्याची दुरवस्था आहे. सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे रस्त्यावर ट्रक फसण्याच्या घटना सातत्याने घडत आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक हैराण

चंद्रपूर : शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. रात्री घराबाहेर निघणे कठीण झाले. शहरातील अनेक वॉर्ड आणि मुख्य चौकात मोकाट कुत्र्यांचा संचार वाढला.

उद्योग नसल्याने बेरोजगारी वाढली

चंद्रपूर : जिल्ह्यातील काही तालुक्यांत कोणताही उद्योग नसल्यामुळे या तालुक्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे उद्योगांची निर्मिती करून रोजगार मिळवून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी

चंद्रपूर : तालुक्यातील अनेक गावातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यामुळे प्रवास करताना विविध अडचणी येतात. याकडे लक्ष देऊन रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचून राहते. त्यामुळे अपघाताच्या घटना सातत्याने वाढल्या आहे.

नळयोजना सुरू कराव्या

चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक गावांत नळयोजनेअंतर्गत लाखो रुपये खर्च करून पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या. परंतु, या टाक्या शोभेच्या वास्तू ठरत आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे अनेक गावांत नळयोजनेचे पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे बंद असलेल्या नळ योजना प्रशासनाने सुरू करण्याची मागणी केली जात आहे.

नाल्यांना झुडपांचा वेढा

चंद्रपूर : शहरातील काही नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात झुडपे वाढली आहे. त्यामुळे नाल्यातील पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे स्वच्छता करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

रस्त्याची स्वच्छता करण्याची मागणी

चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील काही रस्त्यांवर केरकचरा, तसेच रेती साचली असून, यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेने रस्त्याची स्वच्छता करून दिलासा द्यावा, अशी मागणी शहरातील वाहनधारकांसह नागरिकांकडून केली जात आहे.

रस्त्यावरील सांडपाण्याने आरोग्य धोक्यात

चंद्रपूर : तालुक्यातील अनेक गावांमध्ये स्वच्छता मोहीम रखडली आहे. दरम्यान, सध्या कोसळत असलेल्या पावसात नाल्या सांडपाण्याने भरल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. समस्या दूर करण्याची मागणी केली जात आहे.

पथदिवे दुरुस्त करण्याची मागणी

चंद्रपूर : शहरातील नागपूर रोडवरील अनेक पथदिवे बंद असल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने पथदिवे दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी मनपाकडे केली आहे.