शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

पऱ्हे टाकण्याऐवजी केली धानाची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:22 IST

वासेरा : धान शेतीवर हवामान बदलाचा फार मोठा परिणाम दिसून येतो. सुरुवातीला चिखलणी योग्य पाऊस न झाल्यामुळे धान रोपांचे ...

वासेरा : धान शेतीवर हवामान बदलाचा फार मोठा परिणाम दिसून येतो. सुरुवातीला चिखलणी योग्य पाऊस न झाल्यामुळे धान रोपांचे पऱ्हे अवस्थेमध्येच वय वाढत जाते. तसेच वेळेवर मजूर उपलब्ध होत नाही. त्यामुळे तीस दिवसांपेक्षा जास्त वयाच्या धानाच्या रोपांची लागवड केल्यामुळे उत्पादनामध्ये घट येते. अशावेळी पेरीव धान एक उत्तम पर्याय पुढे आला आहे.

याकरिता शेतकऱ्यांना प्रभारी तालुका कृषी अधिकारी ए. आर. महाले, कृषी पर्यवेक्षक व्ही. जी. निमगडे, कृषी सहाय्यक आर. एस. धुडे, शिवणी, कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाहीचे शास्त्रज्ञ डॉ. नागदेवते, कृषी अभियांत्रिकी विभाग प्रमुख वेलादी यांचे मार्गदर्शन लाभले.

बाॅक्स

हा खर्च होतो कमी

पेरीव धान पेरणीमुळे रोपे खोदणे, पेंड्या पसरविणे, नर्सरी पोसणे, चिखली व रोवणी करणे इत्यादी कामावरील खर्च कमी करता येतो. तसेच पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत पीक आठ ते दहा दिवस लवकर काढणीला येते. त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामाकरिता जमीन लवकर उपलब्ध होते. शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर करावा याच पार्श्वभूमीवर मौजा शिवनी येथील १८ ते २० शेतकरीबांधवांनी यावर्षी जवळपास ६० एकर क्षेत्रावर पेरीव पद्धतीने धानाची लागवड केली आहे.

बाॅक्स

या शेतकऱ्यांना केली पेरीव धानाची लागवड

यात शिवनी येथील शेतकरी प्रेम जीवन गभणे, जगजीवन गभणे, मोरेश्वर बोरकर, प्रभाकर जहाने, अनिल गव्हाणे, सुनील बोरकर, गुरुदास बोरकर, प्रमोद बोरकर, वसंत बोरकर, अजबराव कुंकूलवार, श्रावण बोरकर, मुरलीधर बोरकर या २० शेतकऱ्यांनी पेरीव धानाची लागवड केलेली आहे

160721\img-20210710-wa0103.jpg

धान पेरणी लागवड करताना शेतकरी