वासेरा : धान शेतीवर हवामान बदलाचा फार मोठा परिणाम दिसून येतो. सुरुवातीला चिखलणी योग्य पाऊस न झाल्यामुळे धान रोपांचे पऱ्हे अवस्थेमध्येच वय वाढत जाते. तसेच वेळेवर मजूर उपलब्ध होत नाही. त्यामुळे तीस दिवसांपेक्षा जास्त वयाच्या धानाच्या रोपांची लागवड केल्यामुळे उत्पादनामध्ये घट येते. अशावेळी पेरीव धान एक उत्तम पर्याय पुढे आला आहे.
याकरिता शेतकऱ्यांना प्रभारी तालुका कृषी अधिकारी ए. आर. महाले, कृषी पर्यवेक्षक व्ही. जी. निमगडे, कृषी सहाय्यक आर. एस. धुडे, शिवणी, कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाहीचे शास्त्रज्ञ डॉ. नागदेवते, कृषी अभियांत्रिकी विभाग प्रमुख वेलादी यांचे मार्गदर्शन लाभले.
बाॅक्स
हा खर्च होतो कमी
पेरीव धान पेरणीमुळे रोपे खोदणे, पेंड्या पसरविणे, नर्सरी पोसणे, चिखली व रोवणी करणे इत्यादी कामावरील खर्च कमी करता येतो. तसेच पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत पीक आठ ते दहा दिवस लवकर काढणीला येते. त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामाकरिता जमीन लवकर उपलब्ध होते. शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर करावा याच पार्श्वभूमीवर मौजा शिवनी येथील १८ ते २० शेतकरीबांधवांनी यावर्षी जवळपास ६० एकर क्षेत्रावर पेरीव पद्धतीने धानाची लागवड केली आहे.
बाॅक्स
या शेतकऱ्यांना केली पेरीव धानाची लागवड
यात शिवनी येथील शेतकरी प्रेम जीवन गभणे, जगजीवन गभणे, मोरेश्वर बोरकर, प्रभाकर जहाने, अनिल गव्हाणे, सुनील बोरकर, गुरुदास बोरकर, प्रमोद बोरकर, वसंत बोरकर, अजबराव कुंकूलवार, श्रावण बोरकर, मुरलीधर बोरकर या २० शेतकऱ्यांनी पेरीव धानाची लागवड केलेली आहे
160721\img-20210710-wa0103.jpg
धान पेरणी लागवड करताना शेतकरी