शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

ज्वारीची श्रीमंती वाढली; गव्हापेक्षाही जास्त भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:32 IST

बॉक्स भाकरीच परवडायची म्हणून खायचो आमच्या बालपणात गहू कमी प्रमाणात मिळत होते. त्याउलट ज्वारी मुबलक मिळायची. त्यामुळे जेवणात भाकरीचा ...

बॉक्स

भाकरीच परवडायची म्हणून खायचो

आमच्या बालपणात गहू कमी प्रमाणात मिळत होते. त्याउलट ज्वारी मुबलक मिळायची. त्यामुळे जेवणात भाकरीचा समावेश असायचा.

-पांडुरंग गेडाम

----

पूर्वीच्या काळात ज्वारीला प्रमुख पीक म्हणून ओळखले जायचे. जेवणात ज्वारीच्या भाकरी खाल्ल्या जात होत्या. त्या आर्थिकदृष्ट्या परवडत होत्या.

तुकाराम रायपुरे

बॉक्स

आता चपातीच परवडते

ज्वारीचे सेवन आरोग्यासाठी हितकारक असले तरी गव्हापेक्षा ज्वारीचे दर अधिक आहेत. एखाद्या वेळेस भाकरी खाणे चांगले वाटते. परंतु, दररोज खाणे शक्य नाही. मला पोळीच आवडते.

-ऋषी कोडापे

----

मागील काही वर्षांपासून ज्वारीच्या किमतीमध्ये वाढ होत आहे. मागील वर्षी ज्वारी ३० रुपये किलो तर गहू २५ रुपये किलो होते. परंतु, आता ज्वारीचे दर ३५ रुपये किलो तर गहू २८ रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.

-मोंटू मानकर, व्यापारी गोलबाजार

बॉक्स

आपल्या आरोग्याची श्रीमंती ज्वारीतच...

ज्वारीची भाकरी पचायला हलकी असते. यामुळे नागरिक सध्या ज्वारीच्या खाद्यपदार्थाला पसंती देत आहेत.

ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे शरीराला पटकन ऊर्जा मिळते. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते.

ज्वारीमध्ये मुबलक प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात. त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. ज्यांना ॲसिडिटीचा त्रास होतो त्यांनी चपातीऐवजी आहारात ज्वारीचा समावेश करावा, असे आहारतज्ज्ञ सांगतात.

मधुमेहाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या रुग्णांची प्रकृती चांगली राहावी, यासाठी भाताऐवजी ज्वारीच्या कण्या किंवा भाकरी खाण्याला प्राधान्य देण्यात येत आहे.

बॉक्स

जिल्ह्यात ज्वारीचे उत्पादन घटले

पूर्वी खरीप व रब्बी हंगामात वरोरा, राजुरा, कोरपना, जिवती, घुग्घुस आदी तालुक्यात ज्वारीचे उत्पादन घेण्यात येत होते. मात्र आता उत्पादनात घट झाली आहे. याउलट सोयाबीन, कापूस आदी पिकांच्या पेऱ्यांमध्ये वाढ होत आहे. रब्बी हंगामात काही प्रमाणात ज्वारीचे उत्पादन घेतले जाते. तर खरीप हंगामात ज्वारीचे उत्पादन नाहीच्या प्रमाणात आहे.