शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
2
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
3
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
4
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
5
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
6
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
7
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
8
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
9
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
10
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
11
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
12
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
13
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
14
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
15
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
16
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
17
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
18
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
19
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
20
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी

‘कुछ तो लोग कहेंगे’ उत्साहात

By admin | Updated: December 6, 2014 22:46 IST

शहरात अनेक कार्यक्रम असतानाही रसिकांच्या उल्लेखनिय अशा उपस्थितीत सृजनचा सलग ६७ वा कार्यक्रम, ‘कुछ तो लोग कहेंगे’ उत्साहाच्या वातावरणात गुरूवारी पार पडला. मुरलीमनोहर व्यास आणि संध्या

सृजनचे आयोजन : शेरो-शायरीची उधळण करीत रंगला कार्यक्रमचंद्रपूर : शहरात अनेक कार्यक्रम असतानाही रसिकांच्या उल्लेखनिय अशा उपस्थितीत सृजनचा सलग ६७ वा कार्यक्रम, ‘कुछ तो लोग कहेंगे’ उत्साहाच्या वातावरणात गुरूवारी पार पडला. मुरलीमनोहर व्यास आणि संध्या विरमलवार हे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. रामायण-महाभारतातील दाखले देत, शेरो शायरीची उधळण करीत व्यासांनी अनेक किस्से सांगत लोकांच्या दुटप्पी मानसिकतेवर बोट ठेवले. कोणी काहीही म्हटले तरी सद्सद्विवेक बुध्दीचा कौल प्रमाण मानत आयुष्यात वाटचाल सुरू ठेवावी, असे सांगत व्यासांनी नवोदिता संस्थेच्या प्रारंभिक दिवसाबद्दल माहिती दिली. त्यावेळी त्यांना आलेले कटू अनुभवही कथन केले. लोक काही ना काही बोलणारच असतात. ‘हाथी चलता है कुत्ते भोंकते है’ या सर्वपरिचित वाक्याचा मथितार्थ त्यांनी यावेळी उलगडवून दाखवला. जग ‘हायवे’ ने जाणारे असते. त्यामुळे ‘मायवे’ ने जाणाऱ्यांना उपेक्षीची वागणूक मिळत असते, असे सांगत संध्या विरमलवारांनी शेवटी ‘मायवे’ ने जाणारेच काहीतरी चारचौघांपेक्षा आगळेवेगळे करून जात असतात, असे सांगितले. मानसशास्त्राचे विविध कंगोरे उलगडवून दाखवित त्यांनी टिका ही अभ्यासपूर्ण असते आणि निंदा ही उथळ आणि बिनबुडाची असते असे सांगत काहीही केले तरी दूषणे देण्याची प्रवृत्ती प्राचीन असल्याचेही सांगितले. चुगली करण्याची प्रवृत्ती अत्यंत घातक असल्याचे सांगत त्यांनी निसर्गाचे आदर्श उदाहरण देत कोणाची उणीदुणी काढणे थांबायला हवे असेही सांगितले. विलास घडसे यांनी यावेळी, कुछ तो लोग कहेंगे हे अमरप्रेममधील किशोरकुमारने गायिलेले गीत गावून वातावरण निर्मिती केली. छबू वैरागडे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन केले. या कार्यक्रमात लोकांच्या विकृत मानसिकतेचे अनेक पैलू उलगडण्यात आलेत. (प्रतिनिधी)