शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

विनाअनुदानित शिक्षणसंस्थेच्या समस्या सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:20 IST

बाबासाहेब वासाडे : उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांना दिले निवेदन चंद्रपूर : कोरोना संकटामुळे सर्वच शिक्षणसंस्थांचे मोठे हाल होत आहेत. ...

बाबासाहेब वासाडे : उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांना दिले निवेदन

चंद्रपूर : कोरोना संकटामुळे सर्वच शिक्षणसंस्थांचे मोठे हाल होत आहेत. संस्था चालविणे तसेच संस्थेसाठी घेतलेले कर्ज भरणेही कठीण झाले आहे. एवढेच नाही तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाचाही प्रश्न आहे. त्यामुळे राज्य शासनाने विनाअनुदानित संस्थांच्या समस्या सोडवून दिलासा द्यावा, अशी मागणी बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीचे अध्यक्ष, कृषी जीवन विकास प्रतिष्ठान येनबोडीचे अध्यक्ष ॲड. बाबासाहेब वासाडे यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना दिले आहे.

कोरोना संकटामुळे मागील वर्षी तसेच यावर्षी लाॅकडाऊन करण्यात आले. परिणामी विनाअनुदानित असलेल्या संस्थांना चालविणे कठीण झाले आहे. विनाअनुदानित संस्था शिष्यवृत्तीच्या स्वरूपात शासनातर्फे प्राप्त होणाऱ्या अनुदानावरच अवलंबून राहाते; परंतु शासनाने अनुदान प्राप्त होईपर्यंत इतर सर्व आर्थिक कामे पूर्ण करण्याकरिता बॅंकेकडून कर्ज घेतले आहे. सध्याच्या कोरोनाकाळात विद्यार्थ्यांचे संपूर्ण शिक्षण, परीक्षा ऑनलाइनच्या माध्यमातून होत आहेत. कोरोनामुळे अनेकांचे रोजगार बुडाले आहेत. त्यामुळे आर्थिक स्थिती हलाखीची झाली आहे. त्यातच शैक्षणिक सत्र २०२०-२१ची शिष्यवृत्ती आजतागायत विद्यार्थ्यांना मिळाली नसल्याने विद्यार्थीही हतबल झाले आहेत. त्यामुळे महाविद्यालयाचे शुल्क भरण्यासही सक्ती करता येत नाही. परिणामी महाविद्यालयाला कोणताही आर्थिक आधार नसल्याचेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

सर्वच विनाअनुदानित शिक्षणसंस्थांच्या समस्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहचवाव्या, अशी विनंतीही त्यांनी निवेदनातून केली आहे.