शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

पर्यायी मोटार हाच ‘तपाळ’ वरील उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2017 00:47 IST

गेल्या आठ दिवसांपासून नागभीडला पाणीपुरवठा करणारी तपाळ पाणीपुरवठा योजना बंद आहे.

घनश्याम नवघडे। लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : गेल्या आठ दिवसांपासून नागभीडला पाणीपुरवठा करणारी तपाळ पाणीपुरवठा योजना बंद आहे. तरी तपाळ योजना चालविणारा जि.प.चा पाणीपुरवठा विभाग कुंभकर्णी झोपेतच आहे. जि.प.च्या या वेळकाढू धोरणाबद्दल नागभीडमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या ठिकाणी नियमित पर्यायी मोटर ठेवावी, असेही बोलले जात असून पाणी पुरवठा खंडीत होऊ नये यासाठी हाच पर्याय योग्य आहे. वैनगंगेच्या काठावरील तपाळ गावात ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. म्हणूनच या योजनेला तपाळ हे नाव देण्यात आले. तपाळ ते नागभीड हे अंतर जवळपास ३० किमीचे आहे. मधल्या काळात पाईप लाईनमध्ये समस्या उद्भवत असल्याने पाणीपुरवठा प्रभावीत व्हायचा. पण गेल्या वर्षभरात ही समस्या उद्भवल्याचे ऐकिवात नसले तरी केवळ एका मोटारीमुळे नागभीड व या योजनेतील समाविष्ट गावांना वारंवार पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे, हे वास्तव आहे. दोन महिन्या अगोदर ही योजना अशीच पंधरा दिवस बंद होती. तेव्हा संतप्त नागभीडकरांनी नगर परिषदेवर हल्लाबोल आंदोलन केले होते. एका मोटारीमुळे ही योजना नेहमीच बंद राहते. म्हणून दुसरी एक राखीव मोटार ठेवावी. जेणेकरून एक मोटार बंद पडली की, लगेच दुसरी मोटर लावता येईल व पाणीपुरवठा सुरळीत राहील, अशी आंदोलकांची मागणी होती. उल्लेखनीय बाब ही की, तसे या योजनेत प्रावधानही आहे.यावेळी अतिशय कडेकोट पोलीस बंदोबस्तात नगर परिषदेत आलेल्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी आंदोलकांची ही मागणी मान्य केली होती, अशी माहिती आहे. पण दोन महिन्यानंतरही दुसऱ्या मोटारची व्यवस्था करण्यात आली नाही आणि नागभीड व या योजनेत समाविष्ट गावांना परत त्याच समस्येला सामोरे जावे लागले आहे. आता ऐन उन्हाळ्याच्या दिवसात गेल्या आठ दिवसांपासून लोकांना पाणी मिळत नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत असला तरी जि.प.चा पाणीपुरवठा विभाग साखर झोपेतच आहे. जेव्हा जेव्हा योजना बंद पडत गेली, तेव्हा तेव्हा सदर प्रतिनिधीने जि.प. च्या पाणीपुरवठा विभागाशी चर्चा केली. मात्र नागभीड नगर परिषदेकडून पाणीपट्टी कराची वसुली नियमित येत नसल्याने आम्ही कामे कशी करायची, असा युक्तीवाद करण्यात येतो. या गोष्टीत तथ्य असले तरी नागभीड नगर परिषदेनेही ज्यांची पाणीपट्टी थकीत असेल त्यांच्यावर कारवाई करावी व पाणीकर भरून जि.प.च्या पाणीपुरवठा विभागाला सहकार्य करावे. अन्यथा ही समस्या उद्भवतच राहील.