शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

पर्यायी मोटार हाच ‘तपाळ’ वरील उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2017 00:47 IST

गेल्या आठ दिवसांपासून नागभीडला पाणीपुरवठा करणारी तपाळ पाणीपुरवठा योजना बंद आहे.

घनश्याम नवघडे। लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : गेल्या आठ दिवसांपासून नागभीडला पाणीपुरवठा करणारी तपाळ पाणीपुरवठा योजना बंद आहे. तरी तपाळ योजना चालविणारा जि.प.चा पाणीपुरवठा विभाग कुंभकर्णी झोपेतच आहे. जि.प.च्या या वेळकाढू धोरणाबद्दल नागभीडमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या ठिकाणी नियमित पर्यायी मोटर ठेवावी, असेही बोलले जात असून पाणी पुरवठा खंडीत होऊ नये यासाठी हाच पर्याय योग्य आहे. वैनगंगेच्या काठावरील तपाळ गावात ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. म्हणूनच या योजनेला तपाळ हे नाव देण्यात आले. तपाळ ते नागभीड हे अंतर जवळपास ३० किमीचे आहे. मधल्या काळात पाईप लाईनमध्ये समस्या उद्भवत असल्याने पाणीपुरवठा प्रभावीत व्हायचा. पण गेल्या वर्षभरात ही समस्या उद्भवल्याचे ऐकिवात नसले तरी केवळ एका मोटारीमुळे नागभीड व या योजनेतील समाविष्ट गावांना वारंवार पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे, हे वास्तव आहे. दोन महिन्या अगोदर ही योजना अशीच पंधरा दिवस बंद होती. तेव्हा संतप्त नागभीडकरांनी नगर परिषदेवर हल्लाबोल आंदोलन केले होते. एका मोटारीमुळे ही योजना नेहमीच बंद राहते. म्हणून दुसरी एक राखीव मोटार ठेवावी. जेणेकरून एक मोटार बंद पडली की, लगेच दुसरी मोटर लावता येईल व पाणीपुरवठा सुरळीत राहील, अशी आंदोलकांची मागणी होती. उल्लेखनीय बाब ही की, तसे या योजनेत प्रावधानही आहे.यावेळी अतिशय कडेकोट पोलीस बंदोबस्तात नगर परिषदेत आलेल्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी आंदोलकांची ही मागणी मान्य केली होती, अशी माहिती आहे. पण दोन महिन्यानंतरही दुसऱ्या मोटारची व्यवस्था करण्यात आली नाही आणि नागभीड व या योजनेत समाविष्ट गावांना परत त्याच समस्येला सामोरे जावे लागले आहे. आता ऐन उन्हाळ्याच्या दिवसात गेल्या आठ दिवसांपासून लोकांना पाणी मिळत नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत असला तरी जि.प.चा पाणीपुरवठा विभाग साखर झोपेतच आहे. जेव्हा जेव्हा योजना बंद पडत गेली, तेव्हा तेव्हा सदर प्रतिनिधीने जि.प. च्या पाणीपुरवठा विभागाशी चर्चा केली. मात्र नागभीड नगर परिषदेकडून पाणीपट्टी कराची वसुली नियमित येत नसल्याने आम्ही कामे कशी करायची, असा युक्तीवाद करण्यात येतो. या गोष्टीत तथ्य असले तरी नागभीड नगर परिषदेनेही ज्यांची पाणीपट्टी थकीत असेल त्यांच्यावर कारवाई करावी व पाणीकर भरून जि.प.च्या पाणीपुरवठा विभागाला सहकार्य करावे. अन्यथा ही समस्या उद्भवतच राहील.