शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

पर्यायी मोटार हाच ‘तपाळ’ वरील उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2017 00:47 IST

गेल्या आठ दिवसांपासून नागभीडला पाणीपुरवठा करणारी तपाळ पाणीपुरवठा योजना बंद आहे.

घनश्याम नवघडे। लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : गेल्या आठ दिवसांपासून नागभीडला पाणीपुरवठा करणारी तपाळ पाणीपुरवठा योजना बंद आहे. तरी तपाळ योजना चालविणारा जि.प.चा पाणीपुरवठा विभाग कुंभकर्णी झोपेतच आहे. जि.प.च्या या वेळकाढू धोरणाबद्दल नागभीडमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या ठिकाणी नियमित पर्यायी मोटर ठेवावी, असेही बोलले जात असून पाणी पुरवठा खंडीत होऊ नये यासाठी हाच पर्याय योग्य आहे. वैनगंगेच्या काठावरील तपाळ गावात ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. म्हणूनच या योजनेला तपाळ हे नाव देण्यात आले. तपाळ ते नागभीड हे अंतर जवळपास ३० किमीचे आहे. मधल्या काळात पाईप लाईनमध्ये समस्या उद्भवत असल्याने पाणीपुरवठा प्रभावीत व्हायचा. पण गेल्या वर्षभरात ही समस्या उद्भवल्याचे ऐकिवात नसले तरी केवळ एका मोटारीमुळे नागभीड व या योजनेतील समाविष्ट गावांना वारंवार पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे, हे वास्तव आहे. दोन महिन्या अगोदर ही योजना अशीच पंधरा दिवस बंद होती. तेव्हा संतप्त नागभीडकरांनी नगर परिषदेवर हल्लाबोल आंदोलन केले होते. एका मोटारीमुळे ही योजना नेहमीच बंद राहते. म्हणून दुसरी एक राखीव मोटार ठेवावी. जेणेकरून एक मोटार बंद पडली की, लगेच दुसरी मोटर लावता येईल व पाणीपुरवठा सुरळीत राहील, अशी आंदोलकांची मागणी होती. उल्लेखनीय बाब ही की, तसे या योजनेत प्रावधानही आहे.यावेळी अतिशय कडेकोट पोलीस बंदोबस्तात नगर परिषदेत आलेल्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी आंदोलकांची ही मागणी मान्य केली होती, अशी माहिती आहे. पण दोन महिन्यानंतरही दुसऱ्या मोटारची व्यवस्था करण्यात आली नाही आणि नागभीड व या योजनेत समाविष्ट गावांना परत त्याच समस्येला सामोरे जावे लागले आहे. आता ऐन उन्हाळ्याच्या दिवसात गेल्या आठ दिवसांपासून लोकांना पाणी मिळत नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत असला तरी जि.प.चा पाणीपुरवठा विभाग साखर झोपेतच आहे. जेव्हा जेव्हा योजना बंद पडत गेली, तेव्हा तेव्हा सदर प्रतिनिधीने जि.प. च्या पाणीपुरवठा विभागाशी चर्चा केली. मात्र नागभीड नगर परिषदेकडून पाणीपट्टी कराची वसुली नियमित येत नसल्याने आम्ही कामे कशी करायची, असा युक्तीवाद करण्यात येतो. या गोष्टीत तथ्य असले तरी नागभीड नगर परिषदेनेही ज्यांची पाणीपट्टी थकीत असेल त्यांच्यावर कारवाई करावी व पाणीकर भरून जि.प.च्या पाणीपुरवठा विभागाला सहकार्य करावे. अन्यथा ही समस्या उद्भवतच राहील.