शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.८ रिक्टर स्केलची नोंद
2
"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक
3
"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी
4
कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना
5
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
6
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
7
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
8
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
9
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  
10
Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही
11
Bengaluru stampede: बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
12
Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; ११ जण ठार, ३३ जखमी!
13
₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'
14
Mumbai Fire: शॉर्ट सर्किटमुळे झेप्टोच्या गोदामात भीषण आग, सर्व सामान जळून खाक! 
15
एकतर्फी प्रेमात वेडसर झाला युवक; युवतीच्या हत्येनंतर प्रायव्हेट पार्टसह शरीरावर ४५ चाकूचे वार
16
कुटुंबासह अयोध्येत पोहोचले इलॉन मस्क यांचे वडील, प्रभू श्रीराम यांच्या नावानं दुमदुमलं विमानतळ
17
याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा
18
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
19
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
20
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष

जातीमुळेच झाली देशाची माती

By admin | Updated: April 25, 2016 00:46 IST

आपल्या देशामध्ये हजारो वर्षांपासून जाती व्यवस्था टिकून असल्यामुळे माणूस माणसापासून दुरावला गेला.

दिलीप सोळंके : गडचांदुरात व्याख्यानमालागडचांदूर : आपल्या देशामध्ये हजारो वर्षांपासून जाती व्यवस्था टिकून असल्यामुळे माणूस माणसापासून दुरावला गेला. या दुराव्यामुळे देशाच्या प्रगतीमध्ये फार मोठा अडथळा निर्माण झाला. याचा माणसाच्या वैचारिक, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक बाबींवर फार मोटा विपरीत परिणाम झाला. त्यामुळे ही जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले संपुर्ण आयुष्य खर्ची घातले आणि भारतीय संविधानाच्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुतेचा विचार मांडून फार मोठी सामाजिक क्रांती केली. तसेच देशामध्ये बहुजनांची सत्ता आणावयाची असेल तर राजकिय संघटनापेक्षा सामाजिक संघटन अधिक मजबूत करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन अंनिसचे महाराष्ट्र संघटक दिलीप सोळंके यांनी येथे केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रजत जयंती निमित्य गडचांदूर येथे २१ एप्रिल रोजी आयोजित व्याख्यानमालेच्या कार्यक्रमात व्यक्त केले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंनिसचे जिल्हा संघटक अनिल दहेगावकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. हेमचंद दुधगवळी यांनी मार्गदर्शन केले. नगराध्यक्ष विद्या कांबळे, अंनिसचे जिल्हा सचिव धनंजय तावाडे, दशरथ डांगे, कवडू सोनडवले, सोमेश्वर सोनकांबळे, महेंद्र ताकसांडे, कीर्तीकुमार करमनकर, कविकर निरंजने, बापुराव चुनारकर, मारोती लोखंडे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे संचालन रवी ताकसांडे, प्रास्ताविक किशोर नगराळे तर आभार प्रा. प्रशांत खैरे यांनी मानले.याप्रसंगी अं.नि.स. गडचांदूर शहर कार्यकारणी स्थापन करण्यात येऊन नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. व्याख्यानमालेच्या कार्यक्रमानंतर भीमशाहीर बाबुराव गाडेकर आणि संच यांनी सामाजिक परिवर्तनवादी प्रबोधनाचा संगीतमय बहारदार कार्यक्रम सादर केला.या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती गडचांदूर आणि भिमसेना बहुउद्देशिय संस्था गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ललेंद्र गेडाम, विक्की मुन, सुरज ताडे, समाधान सोनकांबळे, सचिन सोनटक्के, राहुल उमरे, प्रफुल रामटेके, प्रकाश ताडे, देवानंद मून, पंकज गावंडे, प्रज्ञापाल मुन, प्रकाश मून, दिलीप खैरे, शाकेश उमरे, शैलेश चांदेकर, पंडीत डोंगरे आणि इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)