शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

चंद्रपूरच्या प्लास्टिकमुक्तीसाठी सामाजिक संघटना सरसावल्या

By admin | Updated: June 16, 2014 23:24 IST

चंद्रपूर शहराच्या आणि जिल्ह्याच्या प्लास्टिकमुक्तीचा ध्यास घेतलेल्या चंद्रपुरातील सामाजिक संघटनांनी वर्षभर उपक्रम राबविण्यासाठी कंबर कसली आहे. याच उपक्रमातील पहिले पाऊल म्हणून काल १५ जूनला स्थानिक

चंद्रपूर : चंद्रपूर शहराच्या आणि जिल्ह्याच्या प्लास्टिकमुक्तीचा ध्यास घेतलेल्या चंद्रपुरातील सामाजिक संघटनांनी वर्षभर उपक्रम राबविण्यासाठी कंबर कसली आहे. याच उपक्रमातील पहिले पाऊल म्हणून काल १५ जूनला स्थानिक आयएमए सभागृहात पर्यावरण दिन पार पडला. त्यात लोकसहभागावर भर देवून महानगरपालिका आणि स्थानिक प्रशासनाच्यावतीने या कामी पुढाकार घेण्याची तयारी उपस्थित लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांनी आणि सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी दर्शविली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर होते. उद्घाटन पर्यावरण मंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते झाले. आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार विजय वडेट्टीवार, आमदार नाना श्यामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष कुंभरे, मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी डॉ. अनंत हर्षवर्धन, मनपा आयुक्त राजेश मोहीते मुख्य पाहुणे होते. मुख्य मार्गदर्शक म्हणून केझ नगरपालिकेचे (जि. बिड) मुख्याधिकारी रामदास कोकरे होते. प्लॅस्टिकमुक्त दापोली शहराचे जनक अशी ओळख असलेल्या रामदास कोकरे यांनी पॉवर पार्इंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून दापोली शहरात राबविलेल्या प्लॅस्टीकमुक्तीच्या मोहीमेतील यश सांगितले. प्लॅस्टिक निर्मूलन मोहीमेत नागरिकांची जनजागृती, त्यांना प्लॅस्टिकला पर्याय उपलब्ध करुन देणे आणि लोकसहभाग व कायदेशीर सक्ती हे तीन महत्वाचे टप्पे या कामी आल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या भाषणात पर्यावरणमंत्री संजय देवतळे म्हणाले, पर्यावरणाशी विविध विभागांचा संबंध आहे. भविष्यात त्या दृष्टीने उपाययोजना कराव्या लागणार आहेत. मुंबईतील भरतीदरम्यान समुद्राचे पाणी शहरात घुसल्याचे उदाहरणही त्यांनी यासाठी दिले. आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, कायदे करून परिस्थिती पालटत नाही. लोकसहभाग व लोकचळवळीशिवाय प्रश्न सुटत नाहीत. राज्यात ३५० पेक्षा अधिक कायदे याच स्थितील अडकले आहेत. एखादी चळवळ व्यक्तीची न राहता समाजाची होते, तेव्हाच ती यशस्वी ठरते. जिल्हाधिकारी डॉ. म्हैसेकर म्हणाले, प्लॅस्टिक निर्मूलनावर एक वेगळी कार्यशाळा व्हावी. त्यातून जनतेचा सहभाग वाढावा, यासाठी आपण प्रयत्न करू. लोकचळवळीतून या कामी यश मिळेल, त्यासाठी प्रशासन सोबत असल्याची ग्वाही त्यांनी दिली. प्रारंभी दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमादरम्यान, नगरसदेवक संजय वैद्य यांच्या ‘पर्यावरणाचा शत्रू : घनकचरा’ या विषयावरील पुस्तकाचे आणि जेसीसच्या वतीने तयार करण्यात आलेल्या भीत्तीपत्रकाचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.प्रास्ताविक डॉ. अनंत हर्षवर्धन यांनी केले. संचालन डॉ. मंगेश गुलवाडे तर आभार प्रा. योगेश दुधपचारे यांनी मानले. प्लॅस्टीक पिशव्या टाळा असा संदेश देत कार्यक्रमाअखेर सर्वांना कापडी पिशव्या भेट देण्यात आल्या. . (जिल्हा प्रतिनिधी)