शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
2
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
3
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
4
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
5
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
6
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
7
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
8
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
9
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
10
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
11
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
12
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
13
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
14
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
15
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
16
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
17
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
18
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
19
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
20
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या

तर साहित्य संमेलन होऊ देणार नाही

By admin | Updated: January 30, 2016 01:22 IST

चंद्रपूर येथे शुक्रवारपासून सुरू झालेल्या विदर्भ साहित्य संमेलनात विदर्भ राज्याचा ठराव पारित करण्यात यावा, अन्यथा साहित्य संमेलन होऊ देणार नाही,

विदर्भ मुक्ती मोर्चाचा इशारा : विदर्भ राज्याचा ठराव पारित करण्याची मागणीचंद्रपूर: चंद्रपूर येथे शुक्रवारपासून सुरू झालेल्या विदर्भ साहित्य संमेलनात विदर्भ राज्याचा ठराव पारित करण्यात यावा, अन्यथा साहित्य संमेलन होऊ देणार नाही, असा इशारा विदर्भ मुक्ती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिला. विदर्भ मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष किशोर पोतनवार म्हणाले, येथे प्रारंभ झालेल्या साहित्य संमेलनात स्वतंत्र विदर्भावर एकही चर्चासत्र किंवा परिसंवाद ठेवण्यात आलेला नाही. साहित्य संमेलन विदर्भात आहे. त्यातही त्याचे आयोजन चंद्रपूरसारख्या ऐतिहासिक नगरीत होत आहे. मात्र या साहित्य संमेलनात स्वतंत्र विदर्भावर एकही चर्चासत्र किंवा परिसंवाद ठेवण्यात आलेला नाही. विदर्भ साहित्य संघाच्या नावातच विदर्भ असून विदर्भातील जनतेच्या पैशावर होत आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या संमेलनासाठी जिल्ह्याच्या नियोजनातून पाच लाख रुपयांचा निधी दिला. ते आणखी पाच लाख रुपये देणार आहेत. म्हणजेच विदर्भातील जनतेच्या विकासाचा पैसा खर्च करून होणाऱ्या साहित्य संमेलनात स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मुद्याला आयोजकांनी स्पर्शसुद्धा केला नाही. असे पोतनवार म्हणाले. विदर्भाचे स्वतंत्र राज्य करावे, असा ठराव साहित्य संमेलनात पारित करावा, धानाच्या विविध वाणांचा शोध लावणारे विदर्भातील शेतकरी दादाजी खोब्रागडे, पुरस्कार परत करणारे शेतकरी झाडे व शेंद्रे यांचा सत्कार करण्यात यावा, अशी मागणी असल्याचे पोतनवार यावेळी म्हणाले. (प्रतिनिधी)