शहरं
Join us  
Trending Stories
1
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
2
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
3
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
4
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
5
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
6
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
7
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
8
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
9
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
10
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
11
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
12
Nitin Nabin: चार वेळा आमदार, बिहारमध्ये मंत्री; भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नबीन कोण आहेत?
13
सिडनी येथे जगप्रसिद्ध बॉन्डी बीचवर अंदाधुंद गोळीबार; दोन हल्लेखोर ताब्यात, १० पर्यटकांचा जीव घेतला
14
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
15
IND vs SA T20I : टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हममधून जसप्रीत बुमराह OUT; कारण...
16
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
17
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
18
पीएम सूर्य घर : मोफत वीज योजनेसाठी कसा करायचा ऑनलाईन अर्ज? सोपी आहे पद्धत, एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
19
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
20
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

नागपंचमीला सापाला पूजले जाते; मग इतर दिवशी का मारले जाते ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 05:00 IST

चंद्रपूर जिल्ह्यात आढळणाऱ्या सुमारे ३२ सापांपैकी केवळ ६ प्रकारचे साप विषारी आहेत, अशी माहिती वन विभागाच्या अहवालात नमुद आहे. ग्रामीणच नव्हे तर शहरी भागातील नागरिकांतही सापांविषयी अज्ञान असल्याने बऱ्याच बिनविषारी सापांना विनाकारण मारून टाकण्याच्या घटना घडत आहेत. बिनविषारी, निमविषारी व विषारी अशा प्रकारे सापांचे वर्गीकरण केले जाते. 

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : श्रावण महिन्यातील नागपंचमी सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. इतरवेळी साप दिसला तर लगेच ठेचून मारणारे नागपंचमीलासापाची मनोभावे पूजा करतात. नवैद्य दाखवितात. मात्र, शास्त्रीय माहितीचा अभाव व गैरसमजांमुळे सापांच्या विविध प्रजाती नष्ट होत आहे. यंदाच्या नागपंचमीपासून तरी मानवाच्या या मित्राला वाचविण्याचा सर्वांनी संकल्प करावा, असे आवाहन सर्पमित्रांनी केले आहे.चंद्रपूर जिल्ह्यात आढळणाऱ्या सुमारे ३२ सापांपैकी केवळ ६ प्रकारचे साप विषारी आहेत, अशी माहिती वन विभागाच्या अहवालात नमुद आहे. ग्रामीणच नव्हे तर शहरी भागातील नागरिकांतही सापांविषयी अज्ञान असल्याने बऱ्याच बिनविषारी सापांना विनाकारण मारून टाकण्याच्या घटना घडत आहेत. बिनविषारी, निमविषारी व विषारी अशा प्रकारे सापांचे वर्गीकरण केले जाते. बिनविषारी साप चावला तर कोणताही धोका संभवत नाही. निमविषारी साप हे विषारीच असतात; परंतु त्यांच्या दंशामुळे जीव जाईल इतका धोका नसतो. मात्र, विषारी साप प्राणघातक असतो. वन्यजीव संरक्षण संस्था, आरोग्य विभाग व वन विभागाच्या वतीने नागरिकांमध्ये जागृती कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र, नागरिकांच्या मनातील गैरसमज अजुनही पूर्णत: दूर झाले नाहीत. शहरी भागातील हा प्रकार घडत असल्याचे अनेक घटनावरून सिध्द झाले आहे. त्यासाठी प्रबोधनाचा रेटा वाढविणे हाच पर्याय असल्याचे सर्पमित्रांचे म्हणणे आहे.

जिल्ह्यात आढणारे सापांचे प्रकार

विषारी : नाग, घोणस, मण्यार, फुरसे, पोवळा, चापडा.बिनविषारी : अजगर, धामण, तस्कर, गवत्या, दिवड, नानेटी, धुळ नागीण, पहाडी तस्कर, कवड्या, पट्टेरी कवड्या, कुकरी, व्हेरिगेटेड कुकरी, वाळा, चंचू वाळा, डुरक्या घोणस, मांडुळ, रूका, खापर खवल्या, ब्लॅक हेडेड (काळतोंड्या).

साप हा तर शेतकऱ्यांचा मित्रसाप हे उंदीर, घूस अशा धान्याचे नुकसान करणाऱ्या प्राण्यांना खातात. त्यामुळे सापाला शेतकऱ्यांचा मित्र म्हटले जाते. सापाला न मारता सर्पमित्रांना बोलावून त्याला जीवदान द्यावे. निसर्गातील अन्नसाखळी कायम ठेवण्यासाठी सापांचे अस्तित्व टिकले पाहिजे.

सर्पमित्र काय म्हणतात...

कोणताही साप जाणीवपूर्वक दंश करीत नाही. स्वत:चा जीव वाचविण्यासाठी साप प्रतिकार करतो. डुख धरणे यासारख्या कल्पना चुकीच्या व अशास्त्रीय आहेत. सापाबद्दल असलेल्या भीतीचा फटका बिनविषारी सापांना बसतो. नागपंचमीनिमित्त सापांची पूजा करण्यापेक्षा त्यांच्याबद्दल शास्त्रीय माहिती घेऊन त्यांना वाचविण्याचा संकल्प केल्यास हा सण अधिक आनंददायी होईल, असे मत चंद्रपूर येथील सर्पमित्र प्रविण कडू यांनी व्यक्त केले.

साप आढळला तर...- साप आढळला तर ठार न मारता सर्पमित्राला तत्काळ बोलवावे. मांत्रिक व अंधश्रद्धेला बळी पडू नये. सर्पमित्र सापाला पकडून त्याच्या मूळ अधिवासात सुरक्षित सोडतात. दंश केलाच तर मानसिकदृष्ट्या खचू नये. त्या व्यक्तीला धीर द्यावा, स्वच्छ आवळपट्टी दंश झालेल्या जागेपासून एक फूट अंतरावर बांधावी. रूग्णाला तात्काळ उपचारासाठी न्यावे. शासकीय रुग्णालयात यावर उपचार मोफत होतो. सर्पदंशावर परिणामकारक औषध फक्त प्रतीसर्पविषच (एएसव्ही) आहे, हे लक्षात ठेवावे, अशी माहिती सर्पमित्र प्रविण कडू यांनी दिली.

 

टॅग्स :snakeसापNag Panchamiनागपंचमी