शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

सहा हजार पालकांनी दाखविला समजूतदारपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:29 IST

साईनाथ कुचनकार चंद्रपूर : समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी शासनाकडून मोफत पाठ्यपुस्कांचे वितरण केले जाते. मात्र, ...

साईनाथ कुचनकार

चंद्रपूर : समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी शासनाकडून मोफत पाठ्यपुस्कांचे वितरण केले जाते. मात्र, दरवर्षीच अभ्यासक्रम बदलत नसल्यामुळे जुन्या पुस्तकांचा पुनर्वापर करता येऊ शकतो. यासाठी शिक्षण विभागाने पालकांनी विनंती केल्यानुसार जिल्ह्यातील तब्बल सहा हजार विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिक्षण विभागाकडे मागील वर्षीची पुस्तके परत करीत समजूतदारपणा दाखविला आहे. जिल्ह्यातील अन्य पालकांनीही पर्यावरण संवर्धनासाठी असाच समजूतदारपणा दाखविला तर काही प्रमाणात का, होईना शासनाचा खर्च वाचणार असून पर्यावरण संवर्धनासाठीही हातभार लागणार आहे.

मागील वर्षी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये १ लाख ६९ हजार विद्यार्थ्यांना समग्र शिक्षण अभियानांतर्गत पुस्तकांचे मोफत वितरण करण्यात आले होेते. दरम्यान, कोरोनाच्या संकटामुळे प्राथमिक विभागाची वर्षभर शाळा भरलीच नाही. तर ५ ते ८ वीपर्यंतची २७ जानेवारीपासून शाळा सुरू करण्यात आली. मात्र, त्यांचेही वर्ग काही दिवसच भरले. त्यामुळे मागील वर्षी विद्यार्थ्यांना वितरित केलेले पुस्तकांचा पाहिजे तसा वापरच झाला नसल्याने पुस्तके जशीच्या तशीच होती. त्यामुळे शिक्षण विभागाने पालकांना मागील वर्षीची पुस्तके परत करण्याची विनंती केली होती. त्यानुसार जिल्ह्यातील ६ हजार पालकांनी पुस्तके परत करून आपले कर्तव्य बजावले आहे. त्यामुळे यावर्षी शिक्षण विभागाने १ लाख ६३ हजार विद्यार्थ्यांसाठीच पुस्तकांची मागणी शासनाकडे नोंदविली आहे.

बाॅक्स

पुनर्वापर केल्यास कागदाची होणार बचत

पुस्तकांचा पुनर्वापर केल्यास मोठ्या प्रमाणात कागदांची बचत होणार असून या माध्यमातून होणारा खर्चही वाचणार आहे. विशेष म्हणजे, पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लागू शकतो.

बाॅक्स

मागील वर्षीची मागणी

१ लाख ६९ हजार (पुस्तक संच)

या वर्षीची मागणी

१ लाख ६३ हजार( पुस्तक संच)

बाॅक्स

जनजागृतीची गरज

पुस्तकाच्या पुनर्वापरासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. दरवर्षी फुकट पुस्तक मिळत असल्यामुळे काही पालक डोक्याला ताप लावून घेण्याच्या भानगडीत पडत नाहीत. त्यामुळे शिक्षण विभागाने पुस्तकाच्या पुनर्वापरासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्यास याचा बऱ्यापैकी फायदा होण्यास मदत होईल.

बाॅक्स

विद्यार्थ्यांना लागणार सवय

पुस्तकांच्या पुनर्वापरासाठी जनजागृती केल्यास तसेच विद्यार्थ्यांना त्या प्रकारे समजावून सांगितल्यास दरवर्षी मोठ्या प्रमाणात मोफत दिलेली पुस्तके शिक्षण विभागाकडे गोळा होऊ शकतात. दरम्यान विद्यार्थ्यांना नीटनेटकेपणा तसेच पर्यावरण संवर्धनाचे महत्त्वही या माध्यमातून कळू शकेल.

कोट

पुस्तकांच्या पुनर्वापराबाबत पालकांना विनंती करण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यातील काही पालकांनी मागील वर्षीचे पुस्तक शाळांमध्ये जमा केले आहे. पर्यावरण संवर्धन आणि खर्च वाचविण्यासाठी पुस्तकांचा पुनर्वापर करण्यासंदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे.

-दीपेंद्र लोखंडे

शिक्षणाधिकारी, प्राथमिक

बाॅकस्

अशी आहे विद्यार्थी संख्या

पहिली- २८८२४

दुसरी- ३१२७२

तिसरी- ३१७८४

चौथी- ३३७१९

पाचवी- ३२८४५

सहावी- ३२३५३

सातवी- ३३१६१

आठवी- ३३४४१