शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

साहेब! शैक्षणिक धडे शिकवायला गुरुजी येणार का ?

By admin | Updated: July 7, 2015 01:07 IST

मागील वर्षी संत्र संपले. पण शिक्षकांची रिक्त पदे भरण्याचे सौजन्य शिक्षण विभागाने दाखविले नाही...

विद्यार्थी कसे घडतील ? : गुरुजी न आल्यास अनेक शाळांना लागणार कुलूपजिवती: मागील वर्षी संत्र संपले. पण शिक्षकांची रिक्त पदे भरण्याचे सौजन्य शिक्षण विभागाने दाखविले नाही आणि यावर्षीचे सत्र सुरु होऊन आठवडा लोटला तरी पहाडावरील अनेक शाळेला गुरुजी मिळाले नाही. नवीन गुरुजी देण्याच्या शिक्षण विभागाकडून काही हालचालीसुद्धा दिसत नसल्याने पहाडावरील विद्यार्थ्यांना सांभाळताना कार्यरत तुटपुंज्या शिक्षकांना कसरत करावी लागत आहे. असाच एकोप्याने धडे घेण्याचा गंभीर प्रकार काही दिवस चालल्यास पहाडावरील अनेक शाळांना कुलूप लावण्याची वेळ येईल, असे पालकांकडून बोलले जात आहे.ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी विभाग जनजागृती करताना दिसत आहे. मात्र शाळेत नियमित येणाऱ्या विद्यार्थ्यांना अजूनही विषयानुसार शिकवायला गुरुजी मिळाला नाही. याकडे मात्र शिक्षण विभागाचा कानाडोळाच झाल्याचे दिसत आहे. लोकमत प्रतिनिधीने पहाडावरील काही शाळांना भेटी दिल्या असता गंभीर प्रकार पहायला मिळाला. कुठे वर्ग ५ तर कुठे वर्ग ७ आणि विविध विषयांना शिकवणारे गुरुजी मात्र दोनच असल्याने शाळेतील गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळली जात असल्याचा प्रकार दिसत आहे. असे असतानाही शिक्षण विभागाला जाग आली नाही. ज्या शाळेतून गुणवत्ताधारक विद्यार्थी घडत होते. आज त्याच शाळेतील वाढती विद्यार्थी संख्या आणि शिक्षकाची रिक्त पदे यामुळे कार्यरत गुरुजींना गुणवत्ताधारक विद्यार्थी घडविताना अपयशी ठरावे लागत आहे. विद्यार्थ्यांना शिकविण्याबरोबरच शिक्षकांना जनगणना, मतदानाचे काम, शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा सर्वे इत्यादी कामामुळे शिक्षकांवर ताण पडत असल्याने शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे.तालुक्यातील देवलागुडा, येल्लारपूर (खु.), मरकलमेंढा, गुडसेला, रायपूर, परमडोली, कमलापूर, आदी गावातील जि.प. शाळेला अद्यापही शैक्षणिक धडे शिकवायला गुरुजी मिळाले नाही. मागील वर्षी अनेक वेळा शिक्षण विभागाकडे गुरुजी द्या, अशी लेखी, तोंडी मागणी केली. मात्र दखल घ्यायला कुणालाही वेळ मिळाला नाही. यावर्षीही सत्राचा आठवडा संपला. मात्र गुरुजींचा पत्ता नाही. शिक्षण विभाग अजून किती दिवस हा तमाशाचा फड चालविणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून ऐकायला मिळत आहे. शहरातील विद्यार्थ्यांचा कल दिवसेंदिवस इंग्रजी माध्यमात शिकण्याकडे जात असून ग्रामीण भागात मात्र इंग्रजी माध्यम तर सोडाच पण मराठीचे धडे शिकवायलाही गुरुजी मिळत नसल्याने जिल्हा परिषद शाळेची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालल्याचे दिसत आहे. (तालुका प्रतिनिधी)