शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

साहेब! शैक्षणिक धडे शिकवायला गुरुजी येणार का ?

By admin | Updated: July 7, 2015 01:07 IST

मागील वर्षी संत्र संपले. पण शिक्षकांची रिक्त पदे भरण्याचे सौजन्य शिक्षण विभागाने दाखविले नाही...

विद्यार्थी कसे घडतील ? : गुरुजी न आल्यास अनेक शाळांना लागणार कुलूपजिवती: मागील वर्षी संत्र संपले. पण शिक्षकांची रिक्त पदे भरण्याचे सौजन्य शिक्षण विभागाने दाखविले नाही आणि यावर्षीचे सत्र सुरु होऊन आठवडा लोटला तरी पहाडावरील अनेक शाळेला गुरुजी मिळाले नाही. नवीन गुरुजी देण्याच्या शिक्षण विभागाकडून काही हालचालीसुद्धा दिसत नसल्याने पहाडावरील विद्यार्थ्यांना सांभाळताना कार्यरत तुटपुंज्या शिक्षकांना कसरत करावी लागत आहे. असाच एकोप्याने धडे घेण्याचा गंभीर प्रकार काही दिवस चालल्यास पहाडावरील अनेक शाळांना कुलूप लावण्याची वेळ येईल, असे पालकांकडून बोलले जात आहे.ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी विभाग जनजागृती करताना दिसत आहे. मात्र शाळेत नियमित येणाऱ्या विद्यार्थ्यांना अजूनही विषयानुसार शिकवायला गुरुजी मिळाला नाही. याकडे मात्र शिक्षण विभागाचा कानाडोळाच झाल्याचे दिसत आहे. लोकमत प्रतिनिधीने पहाडावरील काही शाळांना भेटी दिल्या असता गंभीर प्रकार पहायला मिळाला. कुठे वर्ग ५ तर कुठे वर्ग ७ आणि विविध विषयांना शिकवणारे गुरुजी मात्र दोनच असल्याने शाळेतील गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळली जात असल्याचा प्रकार दिसत आहे. असे असतानाही शिक्षण विभागाला जाग आली नाही. ज्या शाळेतून गुणवत्ताधारक विद्यार्थी घडत होते. आज त्याच शाळेतील वाढती विद्यार्थी संख्या आणि शिक्षकाची रिक्त पदे यामुळे कार्यरत गुरुजींना गुणवत्ताधारक विद्यार्थी घडविताना अपयशी ठरावे लागत आहे. विद्यार्थ्यांना शिकविण्याबरोबरच शिक्षकांना जनगणना, मतदानाचे काम, शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा सर्वे इत्यादी कामामुळे शिक्षकांवर ताण पडत असल्याने शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे.तालुक्यातील देवलागुडा, येल्लारपूर (खु.), मरकलमेंढा, गुडसेला, रायपूर, परमडोली, कमलापूर, आदी गावातील जि.प. शाळेला अद्यापही शैक्षणिक धडे शिकवायला गुरुजी मिळाले नाही. मागील वर्षी अनेक वेळा शिक्षण विभागाकडे गुरुजी द्या, अशी लेखी, तोंडी मागणी केली. मात्र दखल घ्यायला कुणालाही वेळ मिळाला नाही. यावर्षीही सत्राचा आठवडा संपला. मात्र गुरुजींचा पत्ता नाही. शिक्षण विभाग अजून किती दिवस हा तमाशाचा फड चालविणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून ऐकायला मिळत आहे. शहरातील विद्यार्थ्यांचा कल दिवसेंदिवस इंग्रजी माध्यमात शिकण्याकडे जात असून ग्रामीण भागात मात्र इंग्रजी माध्यम तर सोडाच पण मराठीचे धडे शिकवायलाही गुरुजी मिळत नसल्याने जिल्हा परिषद शाळेची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालल्याचे दिसत आहे. (तालुका प्रतिनिधी)