शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

जिल्ह्यात ‘सिंघम’ अवतरणार; दहाव्या मिनिटाला पोलीस मदत मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:27 IST

दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर केंद्र पातळीवर एक हेल्पलाईन स्थापित करण्याची मागणी होत होती. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांनुसार आपत्कालीन प्रतिसाद साहाय्य प्रणाली ...

दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर केंद्र पातळीवर एक हेल्पलाईन स्थापित करण्याची मागणी होत होती. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांनुसार आपत्कालीन प्रतिसाद साहाय्य प्रणाली (ईआरएसएस) निर्मितीचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार कोणत्याही व्यक्तीला आपत्कालीन परिस्थितीमध्ये तत्काळ मदत हवी असल्यास ११२ नंबरची हेल्पलाईन कार्यान्वित करण्यात आली. यासंदर्भातील सर्व प्रणाली पोलीस कंट्रोल रूममध्ये जोडण्यात आली आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत असलेल्या व्यक्तीने फोन लावल्यावर अवघ्या काही सेकंदात हा फोन कुठून आला, हे कळणार आहे. त्यानंतर तेथील पोलीस नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल, महिला हेल्पलाईन, चाईल्ड हेल्पलाईन यांना एकाच वेळी सदर कॉलची माहिती दिली जाणार आहे. त्यानुसार घटनेचे गंभीर्य लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल होऊन आपत्कालीन परिस्थितीत असलेल्या व्यक्तीला मदत करू शकतील.

जिल्ह्यात एकूण......पोलीस ठाणे आहेत. त्यात १९४ पोलीस अधिकारी व १३९८ अंमलदार कार्यरत आहेत. यापैकी ...... पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यांच्या दिमतीला जिल्हा नियोजनाच्या विकास निधीतून १५ अद्यावत वाहने देण्यात आली आहेत. यासोबत निधी आल्यानंतर पुन्हा काही चारचाकी व दुकाही वाहने खरेदी करण्यात येणार आहेत. ही वाहने प्रत्येक तालुका मुख्यालयी राहणार असून ११२ नंबरवर कॉल येताच वेळीच घटनास्थळ गाठून मदत करणार आहेत. त्यामुळे ही हेल्पलाईन वरदान ठरणार आहे.

बॉक्स

कॉल येताच कळणार लोकेशन

आपत्तीमध्ये मदत मागणाऱ्याने ११२ वर कॉल केल्यावर तो कॉल राज्यातील कॉल सेंटरला जाईल. त्यानंतर तेथून संबंधित जिल्ह्यातील म्हणजे महसूल, पोलीस फायद ब्रिगेड आदींशी संबंधित असल्यास पोलीस विभागाकडून त्या परिसरातील बिट मार्शलकडे जाईल. नंतर कर्मचारी घटनास्थळी पोहोचल्यावर जीपीएसवर नोंद होईल आणि तक्रारीचे निवारण करण्यात येईल.

बॉक्स

पोलिसांची मदत हवी असल्यास ११२ डायल करा

जिल्ह्यातील कुठल्याही गावातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ पोलिसांची मदत हवी असल्यास त्यांनी ११२ नंबर डायल करायचा आहे. त्यापुढच्या अवघ्या १० मिनिटांमध्ये पोलीस मदतीला धावून येतील, असे नियोजन करण्यात येत आहे. नवा हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करण्याची प्रक्रिया जवळपास लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. लवकरच ही सुविधा जिल्हाभरात पुरविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळाली.

बॉक्स

१५ चारचाकी वाहने दाखल

आपत्तीमध्ये सापडलेल्यांपर्यंत तातडीने पोहोचता यावे, यासाठी जिल्हा नियोजनाच्या विकास निधीतून १५ अद्यावत वाहने जिल्हा नियोजनाच्या विकास निधीतून १५ अद्यावत वाहने खरेदी करण्यात आली आहेत. मागील काही दिवसांपूर्वी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत ही वाहने पोलीस विभागाकडे सुपूर्द करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे निधीची तरतूद झाल्यानंतर पुन्हा आणखी काही वाहने तसेच दुचाकी खरेदी करण्यात येण्याची माहिती आहे.

बॉक्स

पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

‘सेंट्रलाईज कंट्रोल रूम’ला फोन आल्यावर कसा प्रतिसाद द्यायचा, कंटोल रूमला फोन आल्यावर काय प्रक्रिया करायची, आपत्तीमध्ये कशी मदत करायची याबाबत प्रशिक्षण जिल्ह्यातील ...... पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे.

कोट

आपत्कालीन परिस्थितीमध्ये अडकलेल्यांना पोलिसांची मदत घेता यावी, यासाठी ११२ क्रमांकाची हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. याबाबतची प्रणाली पोलीस कंट्रोल रूमला जोडण्यात आली आहे. हेल्पलाईनवर तक्रार आल्यानंतर तत्काळ दखल घेतली जाणार आहे. या प्रणालीमुळे नागरिकांना तक्रारींना जलद प्रतिसाद देता येईल आणि लोकाभिमुख काम करण्यास पोलिसांना मदत होईल.

- अरविंद साळवे, जिल्हा पोलीस अधीक्षक, चंद्रपूर