शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

वीज कंपनीच्या उपकार्यकारी अभियंत्याला घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 23:19 IST

पावसाळा सुरू झाला असला तरी पाहिजे त्या प्रमाणात पाऊस झाला नाही. मागील दहा दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे चिमूर तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : पावसाळा सुरू झाला असला तरी पाहिजे त्या प्रमाणात पाऊस झाला नाही. मागील दहा दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे चिमूर तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात आणखी भर म्हणजे वीज वितरण कंपनीचे भारनियमन. शेतकऱ्याने पेरलेले सोयाबीन, कापूस व धानाचे पऱ्हे कसे जगवायचे, या चिंतेत आहे. भारनियमनामुळे त्रस्त शेतकऱ्यांनी सोमवारला चक्क वीज वितरण कंपनीचे कार्यालय गाठून उपकार्यकारी अभियंता यांना घेराव घातला व नंतर भारनियमन बंद करण्याबाबत निवेदन देण्यात आले.चिमूर तालुक्यातील विद्युत विभागांतर्गत येत असलेल्या सर्व सबस्टेशनमधून लोडशेडिंग सुरू आहे. या भागात कमी पावसामुळे दुष्काळसदृश्य परस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांची धान, कापूस, सोयाबीन व इतर पिके संकटात आली आहेत. सिंचनाची सोय असलेले शेतकरीही आपले पीक वाचवू शकत नाही. कारण वीज कंपनी मार्फत सुरू असलेल्या लोडशेडिंगमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. तालुक्यातील जवराबोडी येथील शेतकऱ्यांनी वारंवार तक्रारी करूनसुद्धा कार्यालयांकडून त्यांना न्याय मिळाला नाही. व सौर पंपाची सक्ती न करता कृषिपंपासाठी अर्ज करण्याऱ्यां शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा करण्यासाठी डिमांड द्यावे, यासह सुरू असलेले भारनियमन बंद करावे. यासह आदी मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी भैयासाहेब बेहरे व तहसीलदार संजय नागतीलक यांना देण्यात आले. यावेळी जि.प. सदस्य सतीश वारजुकर, माधव बिरजे, राम राऊत, संजय डोंगरे, विजय गावंडे, राजू चौधरी आदी उपस्थित होते.