शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

मासळ बु येथे पिण्याच्या पाण्याची टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:28 IST

छायाचित्र : मागील तीन वर्षांपासून बंद अवस्थेतील जलशुध्दीकरण सयंत्र. मासळ बु : चिमूर तालुक्यापासून ११ किलोमीटरवरील ताडोबा अंधारी व्याघ्र ...

छायाचित्र : मागील तीन वर्षांपासून बंद अवस्थेतील जलशुध्दीकरण सयंत्र.

मासळ बु : चिमूर तालुक्यापासून ११ किलोमीटरवरील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी वसलेल्या आदर्श ग्रामपंचायत मासळ बु. येथील दोन्ही जलशुद्धीकरण संयंत्र निष्क्रिय झाल्याने गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयोगातून सन २०१४-१५ मध्ये मासळ येथील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे म्हणून स्थानिक ग्रामपंचायतच्या पटांगणात जलशुद्धीकरण संयंत्र बसविले. विधान परिषद सदस्य माजी आमदार मितेश भांगडिया यांच्या स्थानिक विकास निधीतून सन २०१४- १५ ला गावालगत नंदारा रोडवरील अंगणवाडी क्र. ३ जवळ दुसरे जलशुद्धीकरण सयंत्र बसविले. मात्र, हे जलशुद्धीकरण सयंत्र मागील ३ वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने या सयंत्राला दुरुस्त करण्याची प्रक्रिया राबविली नाही. ग्रामपंचायत पटांगणातील जलशुद्धीकरण सयंत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीने एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच तळ गाठल्याने गावात पाणीटंचाई निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

दोन्ही जलशुद्धीकरण सयंत्र बंद अवस्थेत आहेत. ग्रामपंचायतीच्या ढिसाळ नियोजनामुळे गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. गावकरी गावाबाहेरील करबडा फाटा, कोलारा फाटा येथून हातपंपाचे पाणी मोटारसायकलने आणताना दिसत आहेत. गावकऱ्यांमध्ये ग्रामपंचायत प्रशासनाप्रति रोष निर्माण झाला आहे. नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून तात्काळ दोन्ही जलशुध्दीकरण सयंत्र दुरुस्त करावे, अशी मागणी होत आहे.

ग्रामपंचायत मासळ बु.च्या मालकीचे पाण्याचे स्त्रोत

१२ हातपंप असून एकही हातपंप पिण्यायोग्य पाण्याचा नाही. ५ विहिरी असून फक्त एकच विहीर पिण्याचे पाणी वापरण्यायोग्य आहे. गावात पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत कमी आहेत. त्यातच उन्हाळा लागण्यापूर्वी गावातील विहिरीने तळ गाठल्याने गावात मोठे जलसंकट निर्माण होईल.

गावात नळयोजना असून मागील अनेक दिवसांपासून नळयोजनेचे पाणी एक दिवसाआड मिळत आहे. तेही पाणी पिण्यायोग्य नाही.

गावालगत ग्रामपंचायतची मालकी जागा उपलब्ध नसल्याने गावालगत ६ खासगी विहिरी आहेत. त्या विहिरीचे पाणी गावातील काही नागरिक आणत असतात.

सोबत दोन फोटो.. १. पहिला फोटो.

जाहीर मुनारी दिल्यानंतर जलशुद्धीकरण यंत्रावर उसळलेली गर्दी २. दुसरे छायाचित्र

मागील तीन वर्षांपासून बंद अवस्थेत असलेले जलशुध्दीकरण सयंत्र.