शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

मासळ बु येथे पिण्याच्या पाण्याची टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:28 IST

छायाचित्र : मागील तीन वर्षांपासून बंद अवस्थेतील जलशुध्दीकरण सयंत्र. मासळ बु : चिमूर तालुक्यापासून ११ किलोमीटरवरील ताडोबा अंधारी व्याघ्र ...

छायाचित्र : मागील तीन वर्षांपासून बंद अवस्थेतील जलशुध्दीकरण सयंत्र.

मासळ बु : चिमूर तालुक्यापासून ११ किलोमीटरवरील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी वसलेल्या आदर्श ग्रामपंचायत मासळ बु. येथील दोन्ही जलशुद्धीकरण संयंत्र निष्क्रिय झाल्याने गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयोगातून सन २०१४-१५ मध्ये मासळ येथील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे म्हणून स्थानिक ग्रामपंचायतच्या पटांगणात जलशुद्धीकरण संयंत्र बसविले. विधान परिषद सदस्य माजी आमदार मितेश भांगडिया यांच्या स्थानिक विकास निधीतून सन २०१४- १५ ला गावालगत नंदारा रोडवरील अंगणवाडी क्र. ३ जवळ दुसरे जलशुद्धीकरण सयंत्र बसविले. मात्र, हे जलशुद्धीकरण सयंत्र मागील ३ वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने या सयंत्राला दुरुस्त करण्याची प्रक्रिया राबविली नाही. ग्रामपंचायत पटांगणातील जलशुद्धीकरण सयंत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीने एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच तळ गाठल्याने गावात पाणीटंचाई निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

दोन्ही जलशुद्धीकरण सयंत्र बंद अवस्थेत आहेत. ग्रामपंचायतीच्या ढिसाळ नियोजनामुळे गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. गावकरी गावाबाहेरील करबडा फाटा, कोलारा फाटा येथून हातपंपाचे पाणी मोटारसायकलने आणताना दिसत आहेत. गावकऱ्यांमध्ये ग्रामपंचायत प्रशासनाप्रति रोष निर्माण झाला आहे. नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून तात्काळ दोन्ही जलशुध्दीकरण सयंत्र दुरुस्त करावे, अशी मागणी होत आहे.

ग्रामपंचायत मासळ बु.च्या मालकीचे पाण्याचे स्त्रोत

१२ हातपंप असून एकही हातपंप पिण्यायोग्य पाण्याचा नाही. ५ विहिरी असून फक्त एकच विहीर पिण्याचे पाणी वापरण्यायोग्य आहे. गावात पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत कमी आहेत. त्यातच उन्हाळा लागण्यापूर्वी गावातील विहिरीने तळ गाठल्याने गावात मोठे जलसंकट निर्माण होईल.

गावात नळयोजना असून मागील अनेक दिवसांपासून नळयोजनेचे पाणी एक दिवसाआड मिळत आहे. तेही पाणी पिण्यायोग्य नाही.

गावालगत ग्रामपंचायतची मालकी जागा उपलब्ध नसल्याने गावालगत ६ खासगी विहिरी आहेत. त्या विहिरीचे पाणी गावातील काही नागरिक आणत असतात.

सोबत दोन फोटो.. १. पहिला फोटो.

जाहीर मुनारी दिल्यानंतर जलशुद्धीकरण यंत्रावर उसळलेली गर्दी २. दुसरे छायाचित्र

मागील तीन वर्षांपासून बंद अवस्थेत असलेले जलशुध्दीकरण सयंत्र.