शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
2
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
3
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
5
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
6
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
7
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
8
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
9
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
10
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
11
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
12
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
13
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
14
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
15
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
16
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेचा इंटरेस्टिंग किस्सा, आबांच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर म्हणाले...
17
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
18
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
19
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
20
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video

धक्कादायक! डोक्यावर मैला वाहून नेण्यात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 12:58 IST

सांडपाणी व मैला डोक्यावर वाहून नेण्याची प्रथा बंद करण्यासाठी अनेक योजना सुरू असल्याचा दावा सरकारकडून केला जात असला तरी १ मार्च ते १० सप्टेंबर २०१८ दरम्यान केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आला आहे.

ठळक मुद्देकेंद्रीय न्याय विभागाचा अहवाल विकास योजनांवर प्रश्नचिन्ह

राजेश मडावीचंद्रपूर : सांडपाणी व मैला डोक्यावर वाहून नेण्याची अमानुष प्रथा बंद करण्यासाठी अनेक योजना सुरू असल्याचा दावा सरकारकडून केला जात असला तरी केंद्रीय सामाजिक न्याय विभागाने १ मार्च ते १० सप्टेंबर २०१८ दरम्यान केलेल्या सर्वेक्षणात उत्तर प्रदेशनंतर पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आला आहे. राज्यात ५ हजार २६९ व्यक्ती आजही डोक्यावरून मैला वाहून नेत असल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे. डिसेंबर २०१८ पर्यंत हे सर्वेक्षण सुरू राहणार असल्याने अशा व्यक्तींची संख्या पुन्हा वाढू शकते.जातीशी निगडीत व्यवसायांना मुठमाती देण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकार मंत्रालयातर्फे अनेक योजना राबविल्या जातात. याच मंत्रालयाच्या अधिनस्थ नॅशनल सफाई कर्मचारी फायनान्स अ‍ॅन्ड डेव्हलपमेंट कार्पोरेशन (एनएसकेएफडीसी) च्या वतीने मार्च २०१८ पासून देशभरातील सर्व राज्यांमध्ये किती व्यक्ती डोक्यावर मैला वाहून नेतात, याबाबत सर्व्हेक्षण केले जात आहे. सद्यस्थितीत १० सप्टेंबर २०१८ पर्यंतचा अहवाल जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. या राज्यात सर्वाधिक ६ हजार १२६ व्यक्तींची नोंद झाली. तर फुले, शाहू, आंबेडकरांचा जयघोष करणारा महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. एनएसकेएफडीसीच्या माहितीनुसार महाराष्ट्रात ५ हजार २६९ व्यक्तींची नोंद झाली. आंध्र प्रदेश १ हजार ७२१ तर तेलंगणा राज्यात शून्य नोंद झाली आहे. बिहार, हरियाणा आणि जम्मू काश्मिर राज्यात एकही व्यक्ती आढळली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये १०८ व्यक्तींची नोंद झाली आहे.देशभरात २० हजार व्यक्तींची नोंदडोक्यावर मैला वाहून नेण्याची पद्धत बंद व्हावी, याकरिता १९९३ मध्ये कायदा करण्यात आला. २०१३ च्या सुधारित कायद्यातही अनेक तरतुदी करून अशा व्यक्तींच्या आर्थिक सक्षमतेसाठी सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. यापूर्वी २०१३ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात देशभरात १३ हजार व्यक्तींची नोंद झाली. नव्याने सुरू असलेल्या सर्वेक्षणात २० हजार ५९६ व्यक्तींची नोंद झाली आहे. यामुळे कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

टॅग्स :Governmentसरकार