शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

कृषी कर्जाचा सातबारा एक लाखापर्यंत मुक्त

By admin | Updated: May 4, 2016 02:21 IST

शेतकऱ्यांचे मातीशी आपुलकीचे नाते जडले आहे. तो खरिपाच्या हंगामासाठी काबाडकष्ट करुन मशागतीला लागला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय : बोजा नोंदणीतून सुटका, शेतकऱ्यांना मिळाला दिलासाचंद्रपूर: शेतकऱ्यांचे मातीशी आपुलकीचे नाते जडले आहे. तो खरिपाच्या हंगामासाठी काबाडकष्ट करुन मशागतीला लागला आहे. शेतीसाठी बी-बियाणे व देखभालीच्या खर्चासाठी तजवीज करीत आहे. शेतकऱ्यांची परवड थांबविण्यासाठी राष्ट्रीयकृत बँका व सहकारी संस्थांतून कृषी कर्जाची शेतकऱ्यांनी उचल केल्यास, शेतकऱ्यांचा सातबारा एक लाख रुपयापर्यंत मुक्त राहणार आहे. यामुळे बोझ्याची नोंद करण्यासाठी शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयाचा उंबरठा आता झिजवावा लागणा नाही. झिजवावा लागणार नाही. हा निर्णय चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी घेतला आहे.ग्रामीण अर्थ व्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. पूर्वीच्या काळात उपजीविकेसाठी शेती व्यवसाय सर्वोत्तम मानला जात असे. व्यापार मध्यम तर नोकरी कनिष्ठ समजली जात होती. आजघडीला शेतीचे चक्र उलटे फिरल्याचे दिसून येते. बी-बियाणे, खते, मजुरी व अन्य लागवडीचा खर्च दिवसागणिक वाढत आहे. निसर्गाच्या प्रकोपामुळे शेतातील उत्पादन घटत आहे. परिणामी शेतकऱ्यांना पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँका अथवा सहकारी सेवा संस्थेच्या माध्यमातून कर्जाची उचल कृषी व्यवसायासाठी करावी लागतो. कृषी कर्जाची उचल केल्यानंतर शेतकऱ्याला कर्जाची नोंद सातबारा उताऱ्यावर करावी लागते. यासाठी तलाठी कार्यालयात वारंवार चकरा माराव्या लागत. आता मात्र कोणत्याही बँकेतून पीक कर्ज घेतल्यास एक लाख रुपयांच्या कृषी कर्जाची नोंद सातबारावर करण्यातून त्यांची सुटका करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैेसकर यांनी रिझर्व्ह बँकेच्या २०१२ च्या धोरणात्मक निर्णयाला अनुसरुन ३० एप्रिल रोजी आदेश निर्गमित केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयाचे काटेकोर पालन करण्याचे निर्देशही त्यांनी सर्व बँक व्यवस्थापकांना दिले आहेत.या निर्णयामुळे नापिकी, अतिवृष्टी कर्जाच्या ओझ्याखाली दडपणात आलेल्या शेतकऱ्यांना काहीसा सुखावणारा व दिलासादायक वाटत आहे. काही प्रमाणात त्याच्या घामाच्या धारा कमी होतील. याच अनुषंगाने बल्लारपूरचे तहसीलदार विकास अहीर यांनी तालुक्यातील सर्व बँक व्यवस्थापकाची सोमवारी सभो बोलावली.रिझर्व बँकेच्या धोरणाला अनुसरुन एक लाख रुपयापर्यंतच्या कृषी कर्जाची नोंद सातबारा उताऱ्यावर करण्याची सक्ती शेतकऱ्यांना करण्यास भाग पाडू नये, असे बजावून सांगितले. कृषी कर्जासाठी शेती बँकेकडे गहाण ठेवण्याचा प्रकार या निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे थांबणार आहे. या कर्जाची मर्यादा एक लाख रुपयांपर्यंत आहे. ऐन खरीप हंगामाच्या उंबठ्यावरील निर्णयामुळे शेतकरी वर्ग काहीसा सुखावला आहे. (प्रतिनिधी) ५० पैशापेक्षा कमी पैसेवारीची कर्ज वसुली नाहीराज्य सरकारने शासन निर्णय काढून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. सन २०१५-१६ यावर्षात खरीप हंगामासाठी अंतीम पैसेवारी जाहीर केली आहे. ज्या गावातील आणेवारी ५० पैशापेक्षा कमी आहे. त्या गावातील शेतकऱ्यांच्या शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीला स्थगिती दिली आहे. त्याचप्रमाणे सहकारी पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक कर्ज काढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याची अंमलबजावणी योग्य प्रकारे सहकारी संस्था व संबंधित बँकांनी करण्याचे निर्देशही शासनस्तरावरुन देण्यात आले आहे.