शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

सत्र संपत आले, गुरुजीचा पत्ताच नाही !

By admin | Updated: January 31, 2015 23:18 IST

ग्रामीण भागातील शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा कांगावा अधिकारी करीत असले तरी प्रत्यक्षात पहाडावरील शाळांची अवस्था वाईट आहे. देवलीगुडा, येल्लापूर(खु),

जिवती : ग्रामीण भागातील शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा कांगावा अधिकारी करीत असले तरी प्रत्यक्षात पहाडावरील शाळांची अवस्था वाईट आहे. देवलीगुडा, येल्लापूर(खु), मरकलमेंढा, गुडसेला, रायपूर, कमलापूर, परमडोली, धर्मारम शाळेत शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शाळेचे सत्र संपत आले. मात्र शाळेला अद्यापही ‘गुरुजी’ मिळाले नाहीत. त्यामुळे कुठे एका शिक्षकाला तर कुठे पाच वर्गाला दोन शिक्षकांना शिकविण्याची कसरत करावी लागत आहे.शिक्षण विभागाच्या अध्यादेशानुसार काही शाळांला पाच वर्गाची बढती मिळाली, तर काही शाळेतील शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. मात्र त्या ठिकाणी दुसरा शिक्षक देण्याचे सौजन्य शिक्षण विभागाने दाखविले नाही. त्यामुळे आहे त्या शिक्षकांवरच अधिक ताण पडत आहे. शालेय सभा, डाक पोहचविणे इत्यादी शालेय कामकाजामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे. एकाच शिक्षकावर शाळेचा भार असल्याने पहाडावरील शाळांतील शिक्षणाचा खेळखंडोबाच होत असल्याचा प्रकार प्रस्तुत प्रतिनिधीने शाळा भेटी दिल्यानंतर समोर आला आहे. देवलागुडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक ते पाच वर्ग असून ७४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या ठिकाणी मात्र दोनच शिक्षक आहे. येल्लापूर (खु.) वर्ग चार, शिक्षक-एक, विद्यार्थी २५, मरकलमेंढा वर्ग आठ शिक्षक-चार, विद्यार्थी ११४, गुडसेला वर्ग चार शिक्षक एक, विद्यार्थी ६१; रायपूर वर्ग चार, शिक्षक एक, विद्यार्थी सात; परमडोली वर्ग आठ, शिक्षक चार, विद्यार्थी ४०; धर्मारम वर्ग चार, शिक्षक-एक, विद्यार्थी १६; कमलापूर वर्ग चार, शिक्षक एक, विद्यार्थी सात अशी या शाळांची पटसंख्या आहे. येथील मुख्याध्यापकांना शिक्षण विभागासोबत पत्रव्यवहार, बैठका व इतर शालेय कामासोबतच चारही वर्ग शिकविण्याची मोठी जबाबदारी पार पाडावी लागत आहे. एका वर्गाला शिकविताना दुसऱ्या वर्गातील विद्यार्थ्यांना मात्र स्वयंअध्ययन केल्याशिवाय पर्याय राहात नाही. त्यामुळे दिवसभरात या विद्यार्थ्यांच्या नशिबी एक किंवा दोन तास येतात. याबाबत संबंधीत विद्यार्थ्यांच्या पालकांनी अनेकवेळा शासन प्रशासनाकडे शिक्षकाची भरती करावी, अशी विनवणी केली व पाठपुरावाही करतात. मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात येत नाही. पालकांना आश्वासने मिळाली; पण सत्र संपत आले तरी गुरुजी मिळाले नाहीत. प्रशासनाला ग्रामीण भागातील शिक्षणाशी काही देणे-घेणे नाही, हे यावरुन स्पष्ट होते. एकीकडे केंद्र व राज्य शासनाकडून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी नवनवीन उपक्रम अंमलात आणले जातात. मात्र पहाडावरील शाळांची अवस्था अतिशय बिकट झाल्याचे वास्तव आहे. (तालुका प्रतिनिधी)