शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

खाद्य पदार्थांची उघड्यावर विक्री

By admin | Updated: June 15, 2014 23:26 IST

उघड्यावर खाद्य पदार्थाची विक्री करू नये, यासाठी कठोर कायदा तयार करण्यात आला असला तरी चंद्रपूर शहरात मात्र उघड्यावर अन्न पर्दार्थाची विक्री केली जात आहे. वळवाच्या पावसाला सुरूवात झाली

नियमांचा फज्जा : पावसाळ्यात गंभीर आजार बळावण्याची शक्यताचंद्रपूर: उघड्यावर खाद्य पदार्थाची विक्री करू नये, यासाठी कठोर कायदा तयार करण्यात आला असला तरी चंद्रपूर शहरात मात्र उघड्यावर अन्न पर्दार्थाची विक्री केली जात आहे. वळवाच्या पावसाला सुरूवात झाली असून मान्सूनच्या पावसाला लवकरच प्रारंभ होणार आहे. या पाश्वभूमीवर उघड्यावर होणारी खाद्य पदार्थाची विक्री नागरिकांचे आरोग्य बिघडविण्यास कारणीभूत ठरणार आहे. असे असले अन्न व औषध प्रशासनाने याविरुद्ध अद्याप आपले पाऊल उचलले नाही. यंदाच्या उन्हाळ्यात शहरात मोठ्या प्रमाणावर कार्बाईडने पिकविलेल्या आंब्याची विक्री झाली. मोसमाच्या शेवटी-शेवटी अन्न व औषध प्रशासनाने केवळ दोन ठिकाणी धाडी टाकून कायदेशीर कारवाई केली. नंतर मात्र कुणाविरुद्धही कारवाई करण्यासाठी कायद्याचे हत्यार उपसल्या गेले नाही. खाद्य पदार्थांची विक्री करताना अनेक नियम पाळावे लागतात. ज्या ठिकाणी स्टॉल आहे, तेथे सांडपाणी वाहूून नेणारी नाली नसावी अथवा एखाद्या गटाराच्या काठावर स्टॉल लावू नये, असा नियम आहे. मात्र शहरातील अनेक खाद्य पदार्थ विक्रेत्यांना या नियमाला बगल दिली आहे. अनेक स्टॉल सांडपाणी वाहून नेणाऱ्या नालीच्या काठावरच असून त्या ठिकाणावरून सर्रास खाद्य पदार्थांची विक्री केली जात आहे. ज्या दुकानातून खाद्य पदार्थांची विक्री केली जाते, त्या दुकानात स्वच्छता ठेवण्याचा नियम आहे. मात्र शहरातील काही हॉटेल्सना प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी केली असता, काही ठराविक हॉटेल्समध्येच ही स्वच्छता पाळली जात असल्याचे दिसून आले. खाद्य पदार्थांवर जाळीसारखे आवरण झाकले पाहिजे, असाही नियम आहे. परंतु मुख्य मार्गावरील अनेक दुकानांमध्ये खाद्य पदार्थ उघड्यावर ठेवले जातात. रस्त्यावरून वाहनांचे आवागमन सुरू राहत असल्याने या पदार्थांवर मोठ्या प्रमाणावर धूळ बसते. त्यामुळे हे पदार्थ दूषित होतात. त्यापासून आरोग्याला बाधा पोहचते. परंतु असे असतानाही धुळीने माखलेले खाद्य पदार्थ ग्राहकांच्या माथी मारले जात आहेत. याविरुद्ध मात्र अद्यापही अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करण्यासाठी कोणतेही पाऊल उचलले नाही.लवकरच पाऊस सुरू होण्याची चिन्हे आहेत. अकाली पाऊस अधून-मधून बरसत आहे. त्यामुळे उघड्यावरील पदार्थ खाणे, नागरिकांच्या आरोग्यावर बेतणारे ठरणार आहे.शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या लहान हॉटेलमध्ये हा प्रकार सर्वाधिक सुरू आहे. पावसाच्या दिवसांत उघड्यावरील पदार्थ खाल्ल्यामुळे पोटाचे विकार बळावू शकतात. त्यामुळे असे पदार्थ खाणे नागरिकांनी टाळावे, तसेच खाद्य पदार्थ विक्रेत्यांनीदेखील सर्व नियमांचे कठोर पालन करून आपला व्यवसाय करावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त जी.बी. गोरे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)