शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

खाद्य पदार्थांची उघड्यावर विक्री

By admin | Updated: June 15, 2014 23:26 IST

उघड्यावर खाद्य पदार्थाची विक्री करू नये, यासाठी कठोर कायदा तयार करण्यात आला असला तरी चंद्रपूर शहरात मात्र उघड्यावर अन्न पर्दार्थाची विक्री केली जात आहे. वळवाच्या पावसाला सुरूवात झाली

नियमांचा फज्जा : पावसाळ्यात गंभीर आजार बळावण्याची शक्यताचंद्रपूर: उघड्यावर खाद्य पदार्थाची विक्री करू नये, यासाठी कठोर कायदा तयार करण्यात आला असला तरी चंद्रपूर शहरात मात्र उघड्यावर अन्न पर्दार्थाची विक्री केली जात आहे. वळवाच्या पावसाला सुरूवात झाली असून मान्सूनच्या पावसाला लवकरच प्रारंभ होणार आहे. या पाश्वभूमीवर उघड्यावर होणारी खाद्य पदार्थाची विक्री नागरिकांचे आरोग्य बिघडविण्यास कारणीभूत ठरणार आहे. असे असले अन्न व औषध प्रशासनाने याविरुद्ध अद्याप आपले पाऊल उचलले नाही. यंदाच्या उन्हाळ्यात शहरात मोठ्या प्रमाणावर कार्बाईडने पिकविलेल्या आंब्याची विक्री झाली. मोसमाच्या शेवटी-शेवटी अन्न व औषध प्रशासनाने केवळ दोन ठिकाणी धाडी टाकून कायदेशीर कारवाई केली. नंतर मात्र कुणाविरुद्धही कारवाई करण्यासाठी कायद्याचे हत्यार उपसल्या गेले नाही. खाद्य पदार्थांची विक्री करताना अनेक नियम पाळावे लागतात. ज्या ठिकाणी स्टॉल आहे, तेथे सांडपाणी वाहूून नेणारी नाली नसावी अथवा एखाद्या गटाराच्या काठावर स्टॉल लावू नये, असा नियम आहे. मात्र शहरातील अनेक खाद्य पदार्थ विक्रेत्यांना या नियमाला बगल दिली आहे. अनेक स्टॉल सांडपाणी वाहून नेणाऱ्या नालीच्या काठावरच असून त्या ठिकाणावरून सर्रास खाद्य पदार्थांची विक्री केली जात आहे. ज्या दुकानातून खाद्य पदार्थांची विक्री केली जाते, त्या दुकानात स्वच्छता ठेवण्याचा नियम आहे. मात्र शहरातील काही हॉटेल्सना प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी केली असता, काही ठराविक हॉटेल्समध्येच ही स्वच्छता पाळली जात असल्याचे दिसून आले. खाद्य पदार्थांवर जाळीसारखे आवरण झाकले पाहिजे, असाही नियम आहे. परंतु मुख्य मार्गावरील अनेक दुकानांमध्ये खाद्य पदार्थ उघड्यावर ठेवले जातात. रस्त्यावरून वाहनांचे आवागमन सुरू राहत असल्याने या पदार्थांवर मोठ्या प्रमाणावर धूळ बसते. त्यामुळे हे पदार्थ दूषित होतात. त्यापासून आरोग्याला बाधा पोहचते. परंतु असे असतानाही धुळीने माखलेले खाद्य पदार्थ ग्राहकांच्या माथी मारले जात आहेत. याविरुद्ध मात्र अद्यापही अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करण्यासाठी कोणतेही पाऊल उचलले नाही.लवकरच पाऊस सुरू होण्याची चिन्हे आहेत. अकाली पाऊस अधून-मधून बरसत आहे. त्यामुळे उघड्यावरील पदार्थ खाणे, नागरिकांच्या आरोग्यावर बेतणारे ठरणार आहे.शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या लहान हॉटेलमध्ये हा प्रकार सर्वाधिक सुरू आहे. पावसाच्या दिवसांत उघड्यावरील पदार्थ खाल्ल्यामुळे पोटाचे विकार बळावू शकतात. त्यामुळे असे पदार्थ खाणे नागरिकांनी टाळावे, तसेच खाद्य पदार्थ विक्रेत्यांनीदेखील सर्व नियमांचे कठोर पालन करून आपला व्यवसाय करावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त जी.बी. गोरे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)