शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
2
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
3
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
4
Stock Market Today: शेअर बाजाराचं फ्लॅट ओपनिंग, १११ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; फार्मा-रियल्टी शेअर्स आपटले
5
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
6
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
7
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
8
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
9
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
10
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
11
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
12
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
13
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
15
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
16
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
17
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
18
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
19
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
20
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा

धानाची कवडीमोल भावात विक्री

By admin | Updated: January 10, 2017 00:45 IST

पोंभुर्णा तालुक्यामध्ये धान मळणी करुन अनेक शेतकरी आर्थिक अडचणीमुळे कवडीमोल भावात म्हणजे १७०० ते १८०० रुपयांमध्ये धानाची विक्री करीत आहे.

नोटाबंदीचा परिणाम : धान उत्पादक शेतकरी चिंतेतपोंभुर्णा : पोंभुर्णा तालुक्यामध्ये धान मळणी करुन अनेक शेतकरी आर्थिक अडचणीमुळे कवडीमोल भावात म्हणजे १७०० ते १८०० रुपयांमध्ये धानाची विक्री करीत आहे. नोटबंदीच्या नावाखाली अनेक शेतकऱ्यांची व्यापाराकडून लुट केली जात आहे. भाजपा सरकारने सत्तेत येण्यापूर्वी शेतकरी व सामान्य नागरिकांना अनेक आमिष दाखविले होते. मात्र कष्ट करुन पिकविलेल्या शेतमालाची कवडीमोल भावाने खरेदी होत असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. त्यामुळे भाजपा सरकारचे हेच का ‘अच्छे दिन’ असा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे.पोंभुर्णा तालुका हा आदिवासी बहुल मागास असलेला व उद्योग विरहित असलेला तालुका आहे. या ठिकाणी केवळ धानाचे उत्पादन घेतले जाते. सद्यस्थितीत परिसरातील ९० टक्के शेतकऱ्यांचे धान उत्पादन झाले असून कुटुंबातील आर्थिक चणचण भागविण्याकरिता नोटाबंदीच्या नावाखाली व्यापाऱ्यांकडून कवडीमोल म्हणजेच १७०० ते १८०० रुपयाने धानाची खरेदी करुन परिसरातील शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. मात्र स्थानिक परिसरातील लोकप्रतिनिधी हे चित्र उघड्या डोळ्यांनी पाहून येणाऱ्या आगामी जि.प. व पं.स. निवडणुकीत व्यस्त असल्याचे वास्तव या परिसरामध्ये दिसून येत आहे. मागील वर्षी २५०० ते ३००० रुपयांपर्यंत धानाचे दर वाढले होते. मात्र यावर्षी पावसाचे प्रमाण योग्य झाल्याने धानपिकाला पोषक वातावरण मिळाल्याने गत पाच वर्षाच्यो तुलनेत उत्पादनात काही प्रमाणात भर पडली आहे. मात्र योग्य भाव मिळत नसल्याने परिसरातील धान उत्पादक शेतकरी पूर्णत: खचला जात आहे.मात्र परिसरातील लोकप्रतिनिधी व नेतेमंडळी आगामी जि.प. व पं.स. निवडणुकीच्या व्युहरचनेत गुंतले असल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन कधी येणार, असा प्रश्न केला जात आहे. शेतकरी हा जगाचा पोशींदा आहे, शेतकरी सुखी तर जग सुखी असे म्हटल्या जाते. मात्र आजच्या स्थितीत धान उत्पादक शेतकऱ्याचे वास्तव्य बघितले तर जगाचा पोशींदा खरोखरच सुखी आहे काय, असा प्रश्न निर्माण होतो. शेतकऱ्यांसारखा कर्जबाजारी या देशात कुणीच नाही. शेतकरी कर्जाच्या दलदलीत जन्मतो व कर्जाच्या दलदलीत मरतो, हे वास्तव आहे. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ, कधी दुबार पेरणी तर कधी तिबार पेरणी, दरवर्षी बि-बियानाचे व रासायनिक खताचे तसेच किटकनाशक औषधांचे भाव गगणाला भिडले असते. उत्पादनात सातत्याने होणारी घट व नापिकीही याला कारणीभूत आहे. कधी उभ्या पिकामध्ये वन्यप्राण्यांचा हैदोस तर कधी विविध रोगांचे आक्रमण या सर्व प्रकारच्या काळचक्रावर मात करुन धान उत्पादक शेतकरी आपला भविष्यकाळ सुखी करण्यासाठी शेतामध्ये दिवसरात्र राबतो. पण त्याच्या नशिबी सुखी दिवस कधीच येताना दिसत नाही. उलट दु:खाचे व कष्टाचे दिवसच त्याला काढावे लागते. सध्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचे डोंगर उभे आहे. निसर्गावर मात करुन शेतकऱ्यांनी जे काही उत्पादन घेतले आहे, त्याला उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य तो भाव मिळत नाही. व्यापारी वर्गाकडूनही मोठ्या प्रमाणात लुट सुरु आहे. विपणन व्यवस्था व पैशाची गरज असल्याने कवडीमोल दराने धान पिकावे लागत आहे. भाव मिळेपर्यंत गरीब शेतकऱ्याकडे धान्य साठवणूक करुन ठेवण्याची व्यवस्था नसते. उत्पादन हाती येताच वर्षभराचे बजेट ठरवावे लागते. उसनवारीने घेतलेले कर्ज फेडावे लागते. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्याचे सातत्याने शोषण होत आहे. याकडे संबंधित लोकप्रतिनिधींनी लक्ष घालणे काळाची गरज आहे.(वार्ताहर)