शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

धानाची कवडीमोल भावात विक्री

By admin | Updated: January 10, 2017 00:45 IST

पोंभुर्णा तालुक्यामध्ये धान मळणी करुन अनेक शेतकरी आर्थिक अडचणीमुळे कवडीमोल भावात म्हणजे १७०० ते १८०० रुपयांमध्ये धानाची विक्री करीत आहे.

नोटाबंदीचा परिणाम : धान उत्पादक शेतकरी चिंतेतपोंभुर्णा : पोंभुर्णा तालुक्यामध्ये धान मळणी करुन अनेक शेतकरी आर्थिक अडचणीमुळे कवडीमोल भावात म्हणजे १७०० ते १८०० रुपयांमध्ये धानाची विक्री करीत आहे. नोटबंदीच्या नावाखाली अनेक शेतकऱ्यांची व्यापाराकडून लुट केली जात आहे. भाजपा सरकारने सत्तेत येण्यापूर्वी शेतकरी व सामान्य नागरिकांना अनेक आमिष दाखविले होते. मात्र कष्ट करुन पिकविलेल्या शेतमालाची कवडीमोल भावाने खरेदी होत असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. त्यामुळे भाजपा सरकारचे हेच का ‘अच्छे दिन’ असा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे.पोंभुर्णा तालुका हा आदिवासी बहुल मागास असलेला व उद्योग विरहित असलेला तालुका आहे. या ठिकाणी केवळ धानाचे उत्पादन घेतले जाते. सद्यस्थितीत परिसरातील ९० टक्के शेतकऱ्यांचे धान उत्पादन झाले असून कुटुंबातील आर्थिक चणचण भागविण्याकरिता नोटाबंदीच्या नावाखाली व्यापाऱ्यांकडून कवडीमोल म्हणजेच १७०० ते १८०० रुपयाने धानाची खरेदी करुन परिसरातील शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. मात्र स्थानिक परिसरातील लोकप्रतिनिधी हे चित्र उघड्या डोळ्यांनी पाहून येणाऱ्या आगामी जि.प. व पं.स. निवडणुकीत व्यस्त असल्याचे वास्तव या परिसरामध्ये दिसून येत आहे. मागील वर्षी २५०० ते ३००० रुपयांपर्यंत धानाचे दर वाढले होते. मात्र यावर्षी पावसाचे प्रमाण योग्य झाल्याने धानपिकाला पोषक वातावरण मिळाल्याने गत पाच वर्षाच्यो तुलनेत उत्पादनात काही प्रमाणात भर पडली आहे. मात्र योग्य भाव मिळत नसल्याने परिसरातील धान उत्पादक शेतकरी पूर्णत: खचला जात आहे.मात्र परिसरातील लोकप्रतिनिधी व नेतेमंडळी आगामी जि.प. व पं.स. निवडणुकीच्या व्युहरचनेत गुंतले असल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन कधी येणार, असा प्रश्न केला जात आहे. शेतकरी हा जगाचा पोशींदा आहे, शेतकरी सुखी तर जग सुखी असे म्हटल्या जाते. मात्र आजच्या स्थितीत धान उत्पादक शेतकऱ्याचे वास्तव्य बघितले तर जगाचा पोशींदा खरोखरच सुखी आहे काय, असा प्रश्न निर्माण होतो. शेतकऱ्यांसारखा कर्जबाजारी या देशात कुणीच नाही. शेतकरी कर्जाच्या दलदलीत जन्मतो व कर्जाच्या दलदलीत मरतो, हे वास्तव आहे. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ, कधी दुबार पेरणी तर कधी तिबार पेरणी, दरवर्षी बि-बियानाचे व रासायनिक खताचे तसेच किटकनाशक औषधांचे भाव गगणाला भिडले असते. उत्पादनात सातत्याने होणारी घट व नापिकीही याला कारणीभूत आहे. कधी उभ्या पिकामध्ये वन्यप्राण्यांचा हैदोस तर कधी विविध रोगांचे आक्रमण या सर्व प्रकारच्या काळचक्रावर मात करुन धान उत्पादक शेतकरी आपला भविष्यकाळ सुखी करण्यासाठी शेतामध्ये दिवसरात्र राबतो. पण त्याच्या नशिबी सुखी दिवस कधीच येताना दिसत नाही. उलट दु:खाचे व कष्टाचे दिवसच त्याला काढावे लागते. सध्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचे डोंगर उभे आहे. निसर्गावर मात करुन शेतकऱ्यांनी जे काही उत्पादन घेतले आहे, त्याला उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य तो भाव मिळत नाही. व्यापारी वर्गाकडूनही मोठ्या प्रमाणात लुट सुरु आहे. विपणन व्यवस्था व पैशाची गरज असल्याने कवडीमोल दराने धान पिकावे लागत आहे. भाव मिळेपर्यंत गरीब शेतकऱ्याकडे धान्य साठवणूक करुन ठेवण्याची व्यवस्था नसते. उत्पादन हाती येताच वर्षभराचे बजेट ठरवावे लागते. उसनवारीने घेतलेले कर्ज फेडावे लागते. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्याचे सातत्याने शोषण होत आहे. याकडे संबंधित लोकप्रतिनिधींनी लक्ष घालणे काळाची गरज आहे.(वार्ताहर)