शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

स्व. कन्नमवारजी, आम्हाला माफ करा..!

By admin | Updated: January 14, 2016 01:37 IST

ज्या मा.सा. उपाख्य दादासाहेब कन्नमवार यांनी आपली संपूर्ण हयात अखील समाजासाठी घालविली, देशाच्या स्वातंत्र्यासाठी ...

गोपालकृष्ण मांडवकर चंद्रपूरज्या मा.सा. उपाख्य दादासाहेब कन्नमवार यांनी आपली संपूर्ण हयात अखील समाजासाठी घालविली, देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वत: कारागृह आणि हालअपेष्टा भोगून इतिहासात स्वत:चे नाव कोंदले, स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्रिपद भूषविले, सह्याद्रीने हिमालयाला साद घातली आणि हिमालय धावून गेला असा सन्माननीय उल्लेख ज्यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल होतो. त्या महाराष्ट्रभूषण यशवंतराव चव्हाण यांच्या हाकेला ओ देत हा विदर्भपूत्र धावून गेला. त्या दादासाहेबांचे कार्य मोठे असले तरी आम्ही ते ओळखू शकलो नाही. माफ करा दादासाहेब...दादासाहेबांच्या कार्याची जाणीव चंद्रपूरकरांना सदोदित व्हावी, यासाठी तत्कालीन जिल्हा परिषदेने २४ नोव्हेंबर १९७० मध्ये वसंत भवन समोर पुतळा उभारला. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते आणि तत्कालीन ग्राम विकास मंत्री नरेंद्र तिडके यांच्या उपस्थितीत त्यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. पण दुर्देवाने तोच पुतळा आज कचऱ्यात आणि झुडूपात उभा आहे. माफ करा मा.सा. साहेब, आम्ही आपणास ओळखू शकलो नाही.हा देश इंग्रजांच्या तावडीत होता, परसत्तेच्या आक्रमणाखाली सारी जनता पिचून चालली होती. दिल्ली, मुंबईत काय घडत आहे हे टोकावर राहणाऱ्या चंद्रपुरातील जनतेला कळत नव्हते, तेव्हा आपणच चंद्रपुरातील गांधी चौकामध्ये रोज फळयावर घटनांच्या हेडलाईन्स आणि माहिती लिहून जनजागरणाचे कार्य केले. काँग्रेस भवनामध्ये कितीतरी वेळा रात्र रात्र जागून कार्यकर्त्यांंच्या बैठका घेतल्या. झोपायचीही सोय नसायची, तेथीलच बेंचवर अंगाचे मुळकुटे करून रात्रीची झोप घेतली, सकाळी लवकर उठून कामाला लागता यावे म्हणून ! इंग्रज सत्तेविरूद्ध संघटन उभारले. काँग्रेसच्या संघटन बांधणित मोलाची भूमिका बजावली. उत्तम संघटक, कार्यकर्ता आणि समाजसेवक कसा असावा, याचा परिपाठ आपण आपल्या कृतीतून उतरविला. दादासाहेब, आपल्यासारख्या थोरामोठ्यांच्या त्यागातून आणि कठोर परिश्रमातूनच आम्हाला सत्तेची फळे चाखायला मिळत आहेत. स्वातंत्र्यासाठी आपण खस्ता खल्ल्या म्हणून आम्ही सत्तेची पदे उपभोगत आहोत. पण माफ करा, दादासाहेब, आम्ही आपला त्याग विसरलो.चंद्रपुरातील आपला पुतळा कशा अवस्थेत उभा आहे, हे कदाचित आपण वरून बघत असालही. त्याबद्दल आपणास दु:खही होत असेल. पण माफ करा दादासाहेब. आपला पुतळा कुणाच्या कक्षेत येतो हे आम्हाला आधी ठरवू द्या, नंतरच स्वच्छतेचे काय ते बघू. पुतळा जिल्हा परिषदेने उभारला. जबाबदारी त्यांची आहे की, महानगरपालिकेच्या हद्दीत असल्याने मनपाची आहे, हा वाद आधी दूर होऊ द्या. पत्र आल्याशिवाय आणि विचारल्याशिवाय स्वच्छता करायची नाही, असा महापौरांचा दंडक आहे, बरे का. अर्ज द्याल तर आपला ले-आऊटही महापौर स्वच्छ करून देणार आहेत. पण अर्ज लागेलच. दादासाहेब, आता आपणच पृथ्वीवर या आणि महानगर पालिकेत जावून स्वत:च्या पुतळ्याच्या स्वच्छतेसाठी अर्ज द्या. त्याशिवाय आम्ही हलणार नाही. कारण आम्ही सत्ता आणि पदात धुंद आहोत. आपल्या मोठेपणाशी आम्हाला देणेघेणे नाही. दादासाहेब, माफ करा, सवड मिळाली तर स्वच्छतेचे पाहू.