शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षेविनाच सुरू आहे मुलींच्या वसतिगृहाचा कारभार

By admin | Updated: March 18, 2017 00:42 IST

गडचांदूर येथील आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील गृहपाल मुख्यालयी राहत नसल्यामुळे विद्यार्थिनीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

गृहपाल प्रभारी: विविध समस्यांकडेही प्रशासनाचे दुर्लक्षकोरपना : गडचांदूर येथील आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील गृहपाल मुख्यालयी राहत नसल्यामुळे विद्यार्थिनीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असून प्रकल्प अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर अंतर्गत गडचांदूर येथे आदिवासी मुलींचे वसतीगृह चालविण्यात येते. यामध्ये आठवी ते बीए अंतिम वर्षापर्यंत शिक्षण घेणाऱ्या ५५ विद्यार्थिनी राहतात. वसतिगृह विद्यार्थिनीची देखभाल तसेच सुरक्षा करण्यासाठी गृहपाल आणि महिला शिपाईची नियुक्ती केली गेली. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून गृहपालाचे पद रिक्त आहे. याचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला. प्रभारी गृहपाल हे ९० किलोमीटरहून ये-जा करतात. ते वसतिगृहात येऊन मुलींच्या अडचणींबाबत विचारणा करीत नाहीत. कार्यालयात येणे आणि परस्पर निघून जाणे हा त्यांचा नित्याचा दिनक्रम ठरला आहे. यामुळे वसतिगृहात अनेक समस्यांनी घर केले आहे. मात्र, याकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाही. ग्रामीण भागातील आदिवासी मुलींना शिक्षणाची समान संधी मिळावी, या उद्देशातून आदिवासी वसतिगृह चालविले जाते. मात्र, प्रशासन आणि अव्यवस्थापनाच्या कमालीच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थिनींची सुरक्षाच धोक्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)वेळेपूर्वीच निघून जातात कर्मचारीआदिवासी मुलीच्या वसतिगृहात रात्रीच्या वेळी गृहपाल तसेच शिपाई यांची उपस्थिती असणे गरजेचे आहे. मात्र, त्यापूर्वीच हे दोघेही निघून जातात. त्यामुळे नशिबाच्या भरवशावरच सुरक्षेचा खेळ सध्या सुरु आहे.विद्यावेतनही मिळाले नाहीआदिवासी प्रकल्प कार्यालयाकडून विद्यार्थिनीना प्रत्येकी ६०० रुपये एवढे विद्यावेतन दिले जाते. मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या मुलीना जून २०१६ पासून विद्यावेतन मिळालेले नाही. त्यामुळे मुलीसमोर आर्थिक संकटही उभे आहे.