शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सचिवाने केली रकमेची अफरातफर

By admin | Updated: July 9, 2015 00:52 IST

येथील विविध कार्यकारी संस्थेच्या सचिवांनी सभासद रकमेची अफरातफर केली असल्यामुळे अजूनही शेतकऱ्यांना कर्ज वाटप झाले नाही.

शेतकरी आर्थिक अडचणीत : शंकरपूर सोसायटीचे अजूनही कर्ज वाटप नाहीशंकरपूर : येथील विविध कार्यकारी संस्थेच्या सचिवांनी सभासद रकमेची अफरातफर केली असल्यामुळे अजूनही शेतकऱ्यांना कर्ज वाटप झाले नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्या सचिवावर फौजदारी कार्यवाही करून निलंबित करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.शंकरपूर विविध कार्यकारी संस्थेत १२४ सभासद आहेत. त्यापैकी ११० सदस्यांना कर्ज वाटप करायचे आहे. परंतु या संस्थेचे सचिव वाय.एम. सिडाम यांनी सभासदाकडून मागील वर्षीचे कर्जभरणा संस्थेकडे केला. तशी रितसर पावती सभासदांना देण्यात आली. परंतु संस्थेचे सचिव सिडाम यांनी सभासदांनी भरलेले तीन लाख ४५ हजार रुपये चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत भरलेले नाही. ती रक्कम त्यांनी स्वत:जवळच ठेवली आहे. त्यामुळे त्या शेतकऱ्यांना अजूनही कर्ज वाटप होऊ शकले नाही.शासनाच्या निर्णयानुसार ३१ मार्च पूर्वी कर्ज भरल्यास पुन्हा नव्याने बिनव्याजी कर्ज उचलता येते. नवीन आर्थिक वर्षात १ एप्रिलपासून कर्ज वाटप करण्यात येते. १५ मेपर्यंत पहिल्या हप्त्याचे वाटप करण्याचे शासनाचे आदेश आहे. परंतु सचिवांनी या पैशाची अफरातफर केल्याने सभासदांना कर्ज वेळेवर मिळू शकले नाही. या संस्थेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. प्रशासक म्हणून गावंडे यांची नेमणूक करण्यात आली. सभासद नवीन कर्जासाठी बँकेकडे येत असल्याने गावंडे यांनी चौकशी केली असता रकमेची अफरातफर झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. यासंदर्भात प्रशासक यांनी चंद्रपूर जिल्हा सुपरव्हिजन सहकारी संस्था व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था चंद्रपूर यांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे. परंतु साडेतीन लाख रुपयांची अफरातफर होऊन अजूनही सचिवांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरुन हे प्रकरण दडपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हंगामाला सुरुवात झाली आहे. मागील वर्षीही शेती पिकली नसल्यामुळे शेतकऱ्यांनी घरचे साहित्य गहाण ठेवून व उसनवारी करून पैशे काढले व ते पैसे सचिवाकडे दिले. बिनव्याजी कर्ज मिळत असल्याने व संस्थेचे वाटप लवकर होत असल्याने शेतकऱ्यांनी ही रकम जमा केली. आधीच शेतकरी हतबल झाला असून अस्मानी संकटाला तोंड देत आहे. यातच त्यांच्या घामाच्या पैशाची अफरातफर केल्याने शेतकऱ्यात निराशेचे वातावरण तयार झाले आहे. (वार्ताहर)