शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
3
Sonam Raghuvanshi : "सोनम धाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
4
हनिमूनसाठी कौशलेंद्र-अंकिता सिक्कीमला गेले अन् नको ते घडलं; दोन आठवड्यांपासून थांगपत्ता नाही
5
१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?
6
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
7
नशीब पहिला मुलगाच झाला! प्रेग्नंसीनंतर नातेवाईकाच्या बोलण्याने दुखावलेल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या...
8
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
9
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
10
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
11
"आम्ही कधीच चांगले मित्र नव्हतो, पण...", सोनाली बेंद्रेचा सलमान खानविषयी खुलासा, म्हणाली...
12
Vat Purnima 2025: आयुष्यात एकदा तरी 'या' पाच पुरातन वटवृक्षाला आवर्जून फेऱ्या मारा; मिळेल सिद्धी-संपत्ती!
13
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
14
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
15
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
16
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
17
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
18
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
19
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
20
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...

शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 23:27 IST

केंद्र व राज्य शासनाने शालेय पोषण आहार कर्मचाºयांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे १८ हजार रुपये वेतन द्यावे, वित्तमंत्री अरुण जेटली व कामगार मंत्री बंडारु दत्तात्रय यांनी जाहीर केल्यानुसार प्रतीदिन ३५० रुपये वेतन, आरोग्य विमा व भविष्य निर्वाह निधी, सामाजिक सुरक्षा देण्याबाबत शासन आदेश त्वरित काढण्यात यावा. तर शिक्षणमंत्री यांनी मासिक पाच हजार रु. मानधन देण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करावे, या मागणीसह इतर अनेक मागण्यांच्या पूर्ततेकरिता आयटकच्या नेतृत्वात सोमवारी जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देआयटकची मागणी : १८ हजार रुपये वेतन लागू करा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र व राज्य शासनाने शालेय पोषण आहार कर्मचाºयांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे १८ हजार रुपये वेतन द्यावे, वित्तमंत्री अरुण जेटली व कामगार मंत्री बंडारु दत्तात्रय यांनी जाहीर केल्यानुसार प्रतीदिन ३५० रुपये वेतन, आरोग्य विमा व भविष्य निर्वाह निधी, सामाजिक सुरक्षा देण्याबाबत शासन आदेश त्वरित काढण्यात यावा. तर शिक्षणमंत्री यांनी मासिक पाच हजार रु. मानधन देण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करावे, या मागणीसह इतर अनेक मागण्यांच्या पूर्ततेकरिता आयटकच्या नेतृत्वात सोमवारी जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी सरकारच्या विरोधात तीव्र नारेबाजी केली. संघटनेचे राज्य महासचिव विनोद झोडगे, जिल्हाध्यक्ष संतोष दास, जिल्हा संघटक श्रीधर वाढई, छाया मोहितकर, कल्पना रायपुरे, कुंदा कोहपरे, सुलोचना उराडे, संभाजी रायवाड, मधुकर वनकर, रेखा नंदूरकर यांच्या शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी पापळकर यांना निवेदन देऊन त्यांच्या मार्फत मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री व अर्थमंत्री यांना विविध मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले आणि स्थानिक मागण्याविषयी चर्चा करण्यात आली.आयटकच्या नेतृत्वात अनेक शालेय पोषण आहार कर्मचाºयांच्या मानधन वाढीसाठी अनेक मोर्चे काढले व आपली मागणी शासनापुढे परत-परत मांडली होती. त्यामुळे पुणेच्या शिक्षण संचालकांनी २३ नोव्हेंबर २०१६ रोजी मासिक पाच हजार रुपये मानधन वाढीचा प्रस्ताव शासनाला सादर केला होता. त्या अनुषंगाने शिक्षणमंत्री यांच्या निर्देशानसुार २० मार्च २०१७ ना. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई मंत्रालयात संघटनेसोबत बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये मासिक पाच हजार मानधन देण्याचे ठरले होते. परंतु त्याची पूर्तता झालेली नाही. तसेच शापोआ कर्मचाºयांना पांडेचेरी १४ हजार, केरळ १० हजार, तामिळनाडू ७८०० तर इतर राज्यात पाच हजार रुपये मानधन दिल्या जात असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यासंबंधी चर्चा करुन तसा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. परंतु त्याचीही अंमलबजावणी झालेली नाही. शापोआ कर्मचाºयांना मिळणारे मासिक एक हजार रुपये मानधन व इंधन बीलसुद्धा मागील फेब्रुवारी महिन्यापासून मिळाले नाही. त्यामुळे स्वंयपाकी महिलाच्या इंधन बिलाची रक्कम मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळे संचालकांनी सदर महिन्याचे बील आॅफलाईन पद्धतीने काढण्याची परवानगी द्यावी, शापोआ कर्मचाºयांकडून दरवर्षी करारनामा करण्याची पद्धत बंद करण्यात यावी, त्याऐवजी कामावर लागलेल्या दिवसापासून नियुक्त पत्र देण्यात यावे व हजेरीपट ठेवण्यात यावे आदी अनेक मागण्या यावेळी लावून धरण्यात आल्या.