शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

शाळा आमच्या नशिबी नाही!

By admin | Updated: June 21, 2015 01:46 IST

सोशल मिडीया आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहायाने तरुण पिढी संपूर्ण जग कवेत घेण्याच्या प्रयत्न करीत आहे.

शाहु नारनवरे विरुर (स्टे.)सोशल मिडीया आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहायाने तरुण पिढी संपूर्ण जग कवेत घेण्याच्या प्रयत्न करीत आहे. असे असताना, विट भट्टीवर काम करणारी व मेंढर चारणारी मुलं मात्र अद्यापही शाळा, मास्तर अन् अभ्यास या गोष्टीपासून कोसो दूर आहेत. या मुलांना अद्याप शिक्षणाचा गंध लाभला नाही.क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणाची ज्योत पेटविली. त्यामुळे शिक्षणाची गंगा घरोघरी पोहचली. मात्र पुरोगामी महाराष्ट्रात अजुनही लाखो मुलं शिक्षणापासून वंचित असल्याचे वास्तव आहे. उदरनिर्वाहासाठी स्थलांतर करणाऱ्या कुटुंबाची संख्या महाराष्ट्रात मोठी आहे. या कुटुंबातील मुलांच्या नशिबी शिक्षण नाहीत. शेकडो कुटुंब मेंढर चारण्यासाठी सध्या चंद्रपूर जिल्ह्यात आली आहेत. शेतामध्ये ती आपली मेंढर चारतात. शेतातच त्यांचा डेरा असून तेथेच त्यांनी संसार थाटला आहे. त्यांच्यासोबत एक वर्षांपासून ते पंधरा वर्षांपर्यंतची अनेक मुलं आहेत. दसऱ्यानंतर शेतातील कामे व चारा संपल्यामुळे ही कुटुंब मेंढारासाठी व आपल्या पोटासाठी भटकंतीला निघाली. आता पावसाळा सुरू झाल्यानंतरच ती आपल्या गावी परत जाणार आहेत. त्यामुळे शिक्षणापासून त्याची मुलं कोसो दूर आहेत. यांपैकी काहींची नावे शाळेत टाकण्यात आली असली तरी दसऱ्यापासून तर परीक्षा संपेपर्यंत ती कधीच शाळेत जातच नाहीत. यापैकीच संजय मदन मारुभाऊ या १४ वर्षीय मुलाला विचारणा केली असता, शिक्षणाचे आमच्या जीवनात काहीच महत्त्व नाही. दसरा संपला की, आम्हाला बिऱ्हाड घेऊन कुटुंबासोबत निघाव लागतं. मेंढरं, बकऱ्या चाराव्या लागतात. कुटुंबाला सोडून गावात राहणार तर खाणार काय? असा प्रश्न त्याने केला. त्याच्या सारखीच अनेक मुलांची स्थिती आहेत. त्यांचे आई वडिलही त्यांना शिक्षणाचा नाही तर मेंढर, बकऱ्या चारण्याचा आग्रह धरतात.राजुरा तालुक्यात अनेक विट भट्टया आहेत. या विटाभट्टयांवर मध्यप्रदेशामधील कोरकू व इतर समाजाचेही अनेक कुटुंब राबतात. तसेच छत्तीसगढमधीलही कुटुंब विटाभट्टीवर काम करतात. त्यांची मुलेही त्यांच्या सोबत राहतात. त्यांनाही शिक्षणाचा गंध नाही. शिक्षणापासून कोसोदूर आहेत. ‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, विद्यार्थ्यांनी ते प्राशन केलेच पाहिजे’ या सुविचाराप्रमाणे विकासाचे सामर्थ्य शिक्षणातच आहे. देशातील प्रत्येक व्यक्ती शिक्षित झाला पाहिजे, कुणीही शिक्षणापासून वंचित राहु नये, तसेच शिक्षणाची गंगा घराघरात पोहचली पाहिजे असा आग्रह शासनाकडूनच धरला जातो. परंतु देशातील अनेक मुलं शिक्षणापासून कोसो दूर आहेत.