शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
2
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
3
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
4
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
5
पंतचा पराक्रम, एकाच कसोटीत दोन शतकं ठोकताना केले १० विक्रम, अशी आहे संपूर्ण यादी
6
UPI युजर्ससाठी मोठी बातमी! ट्रान्झॅक्शन फेल झालं तर लगेच मिळणार रिफंड; 'या' तारखेपासून लागू होणार नियम
7
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'
8
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
9
"म्हाताऱ्याला वेड लागलंय", चाहत्याची कमेंट पाहून भडकले अमिताभ बच्चन, म्हणाले- "तुम्हाला..."
10
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
11
Health Tips: एक लवंग दूर करेल दाताचे, तोंडाचे, पोटाचे विकार; पण जाणून घ्या 'अचूक' वेळ!
12
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
13
धक्कादायक! विठ्ठल दर्शनाचा बोगस टोकन पास घेऊन पंढरपूर मंदिरात ७ जणांचा घुसण्याचा प्रयत्न
14
अरे का, मी पूजेला एकटी बसू शकत नाही? ट्रोल झाल्यावर अमृता खानविलकरने थेट विचारला प्रश्न
15
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
16
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
17
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
18
जुन्नरच्या कोकणकड्यात तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले; आत्महत्येचा संशय, परिसरात खळबळ
19
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
20
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा

शाळा आमच्या नशिबी नाही!

By admin | Updated: June 21, 2015 01:46 IST

सोशल मिडीया आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहायाने तरुण पिढी संपूर्ण जग कवेत घेण्याच्या प्रयत्न करीत आहे.

शाहु नारनवरे विरुर (स्टे.)सोशल मिडीया आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहायाने तरुण पिढी संपूर्ण जग कवेत घेण्याच्या प्रयत्न करीत आहे. असे असताना, विट भट्टीवर काम करणारी व मेंढर चारणारी मुलं मात्र अद्यापही शाळा, मास्तर अन् अभ्यास या गोष्टीपासून कोसो दूर आहेत. या मुलांना अद्याप शिक्षणाचा गंध लाभला नाही.क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणाची ज्योत पेटविली. त्यामुळे शिक्षणाची गंगा घरोघरी पोहचली. मात्र पुरोगामी महाराष्ट्रात अजुनही लाखो मुलं शिक्षणापासून वंचित असल्याचे वास्तव आहे. उदरनिर्वाहासाठी स्थलांतर करणाऱ्या कुटुंबाची संख्या महाराष्ट्रात मोठी आहे. या कुटुंबातील मुलांच्या नशिबी शिक्षण नाहीत. शेकडो कुटुंब मेंढर चारण्यासाठी सध्या चंद्रपूर जिल्ह्यात आली आहेत. शेतामध्ये ती आपली मेंढर चारतात. शेतातच त्यांचा डेरा असून तेथेच त्यांनी संसार थाटला आहे. त्यांच्यासोबत एक वर्षांपासून ते पंधरा वर्षांपर्यंतची अनेक मुलं आहेत. दसऱ्यानंतर शेतातील कामे व चारा संपल्यामुळे ही कुटुंब मेंढारासाठी व आपल्या पोटासाठी भटकंतीला निघाली. आता पावसाळा सुरू झाल्यानंतरच ती आपल्या गावी परत जाणार आहेत. त्यामुळे शिक्षणापासून त्याची मुलं कोसो दूर आहेत. यांपैकी काहींची नावे शाळेत टाकण्यात आली असली तरी दसऱ्यापासून तर परीक्षा संपेपर्यंत ती कधीच शाळेत जातच नाहीत. यापैकीच संजय मदन मारुभाऊ या १४ वर्षीय मुलाला विचारणा केली असता, शिक्षणाचे आमच्या जीवनात काहीच महत्त्व नाही. दसरा संपला की, आम्हाला बिऱ्हाड घेऊन कुटुंबासोबत निघाव लागतं. मेंढरं, बकऱ्या चाराव्या लागतात. कुटुंबाला सोडून गावात राहणार तर खाणार काय? असा प्रश्न त्याने केला. त्याच्या सारखीच अनेक मुलांची स्थिती आहेत. त्यांचे आई वडिलही त्यांना शिक्षणाचा नाही तर मेंढर, बकऱ्या चारण्याचा आग्रह धरतात.राजुरा तालुक्यात अनेक विट भट्टया आहेत. या विटाभट्टयांवर मध्यप्रदेशामधील कोरकू व इतर समाजाचेही अनेक कुटुंब राबतात. तसेच छत्तीसगढमधीलही कुटुंब विटाभट्टीवर काम करतात. त्यांची मुलेही त्यांच्या सोबत राहतात. त्यांनाही शिक्षणाचा गंध नाही. शिक्षणापासून कोसोदूर आहेत. ‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, विद्यार्थ्यांनी ते प्राशन केलेच पाहिजे’ या सुविचाराप्रमाणे विकासाचे सामर्थ्य शिक्षणातच आहे. देशातील प्रत्येक व्यक्ती शिक्षित झाला पाहिजे, कुणीही शिक्षणापासून वंचित राहु नये, तसेच शिक्षणाची गंगा घराघरात पोहचली पाहिजे असा आग्रह शासनाकडूनच धरला जातो. परंतु देशातील अनेक मुलं शिक्षणापासून कोसो दूर आहेत.