शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
3
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
4
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
5
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
6
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
7
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
8
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
9
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
10
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
11
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
12
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
13
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
14
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
15
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
16
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
17
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
18
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
19
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
20
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार

शाळांकडून शासनाच्या अध्यादेशाची पायमल्ली

By admin | Updated: July 8, 2015 01:13 IST

ग्रामीण भागातील पालकांची आर्थिक परिस्थिती गरीबीची असल्याने ग्रामीण भागातील मुली शालेय शिक्षण घेवू शकत नाहीत.

खडसंगी : ग्रामीण भागातील पालकांची आर्थिक परिस्थिती गरीबीची असल्याने ग्रामीण भागातील मुली शालेय शिक्षण घेवू शकत नाहीत. त्यामुळे मुलींना शाळेत दाखल करण्याकरिता पालकांना प्रवृत्त करण्यासाठी तसेच त्यांना शाळेत टिकवून ठेवण्यासाठी शासनाने ५ ते १० वीपर्यंतच्या मुलींसाठी अहल्याबाई होळकर मोफत पास योजना सुरू केली. मात्र यासंदर्भातील अध्यादेशाची अनेक शाळांकडून पायमल्ली करण्यात येत असल्याचा प्रकार कोरा येथील विद्या विकास विद्यालय कोरा व खडसंगी येथील ग्रामदर्शन महाविद्यालय प्रशासनाने केलेल्या तक्रारीमुळे उजेडात आला आहे.ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींना शाळेत जाण्यासाठी एसटीने मोफत पास योजना (शासन निर्णय क्रमांक एफइडी १०९६/ १०९६/८४८८३/१९५७/९६ आशी-५) सुरू करण्यात आली. या निर्णयानुसार मोफत पास सवलत फक्त ग्रामीण भागातील मुलींनाच देय असून ज्या गावात माध्यमिक शिक्षणाची सोय आहे, त्या गावातील विद्यार्थीनींना दुसऱ्या गावात शिक्षणासाठी जाताना ही मोफत पास सवलत देण्यात येणार नाही, असे स्पष्ट निर्देश आहेत. मात्र या अध्यादेशाची पायमल्ली अनेक शाळांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे शासनाला लाखो रुपयांचा चुना लागत आहे.चिमूर पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या खडसंगी येथील ग्रामदर्शन विद्यालयात इयत्ता पाचवी ते १२ वीपर्यंत इंग्रजी माध्यमाची शिक्षणाची सोय आहे. मात्र याच गावातील गावाजवळील भान्सुली, सोनेगाव (वन), रेगांबोडी, बदर या गावातील विद्यार्थीनी खडसंगीची शाळा ओलांडून बोथली व चिमूर येथे शिक्षणासाठी जातात तर वर्धा जिल्ह्यातील कोरा येथे विद्या विकास विद्यालयमध्ये इयत्ता १२ वीपर्यंत शिक्षणाची व्यवस्था असतानाही येथील विद्यार्थीनी आमडी (बे) येथील साईबाबा विद्यालयात शिक्षणासाठी येतात.खडसंगी व कोरा येथे शाळा असतानाही या परिसरातील विद्यार्थीनी दुसऱ्या गावात शिक्षणासाठी जातात. यासाठी शासनाच्या अहल्याबाई होळकर मोफत पास योजनेचा लाभही घेतात. त्यामुळे या शाळांकडून शासनाच्या त्या अध्यादेशाचा दुरूपयोग करण्यात येत असल्याने शासनाला लाखो रुपयाचा चुना या शाळांकडून लावल्या जात आहे. (वार्ताहर)