शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

शाळांकडून शासनाच्या अध्यादेशाची पायमल्ली

By admin | Updated: July 8, 2015 01:13 IST

ग्रामीण भागातील पालकांची आर्थिक परिस्थिती गरीबीची असल्याने ग्रामीण भागातील मुली शालेय शिक्षण घेवू शकत नाहीत.

खडसंगी : ग्रामीण भागातील पालकांची आर्थिक परिस्थिती गरीबीची असल्याने ग्रामीण भागातील मुली शालेय शिक्षण घेवू शकत नाहीत. त्यामुळे मुलींना शाळेत दाखल करण्याकरिता पालकांना प्रवृत्त करण्यासाठी तसेच त्यांना शाळेत टिकवून ठेवण्यासाठी शासनाने ५ ते १० वीपर्यंतच्या मुलींसाठी अहल्याबाई होळकर मोफत पास योजना सुरू केली. मात्र यासंदर्भातील अध्यादेशाची अनेक शाळांकडून पायमल्ली करण्यात येत असल्याचा प्रकार कोरा येथील विद्या विकास विद्यालय कोरा व खडसंगी येथील ग्रामदर्शन महाविद्यालय प्रशासनाने केलेल्या तक्रारीमुळे उजेडात आला आहे.ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींना शाळेत जाण्यासाठी एसटीने मोफत पास योजना (शासन निर्णय क्रमांक एफइडी १०९६/ १०९६/८४८८३/१९५७/९६ आशी-५) सुरू करण्यात आली. या निर्णयानुसार मोफत पास सवलत फक्त ग्रामीण भागातील मुलींनाच देय असून ज्या गावात माध्यमिक शिक्षणाची सोय आहे, त्या गावातील विद्यार्थीनींना दुसऱ्या गावात शिक्षणासाठी जाताना ही मोफत पास सवलत देण्यात येणार नाही, असे स्पष्ट निर्देश आहेत. मात्र या अध्यादेशाची पायमल्ली अनेक शाळांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे शासनाला लाखो रुपयांचा चुना लागत आहे.चिमूर पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या खडसंगी येथील ग्रामदर्शन विद्यालयात इयत्ता पाचवी ते १२ वीपर्यंत इंग्रजी माध्यमाची शिक्षणाची सोय आहे. मात्र याच गावातील गावाजवळील भान्सुली, सोनेगाव (वन), रेगांबोडी, बदर या गावातील विद्यार्थीनी खडसंगीची शाळा ओलांडून बोथली व चिमूर येथे शिक्षणासाठी जातात तर वर्धा जिल्ह्यातील कोरा येथे विद्या विकास विद्यालयमध्ये इयत्ता १२ वीपर्यंत शिक्षणाची व्यवस्था असतानाही येथील विद्यार्थीनी आमडी (बे) येथील साईबाबा विद्यालयात शिक्षणासाठी येतात.खडसंगी व कोरा येथे शाळा असतानाही या परिसरातील विद्यार्थीनी दुसऱ्या गावात शिक्षणासाठी जातात. यासाठी शासनाच्या अहल्याबाई होळकर मोफत पास योजनेचा लाभही घेतात. त्यामुळे या शाळांकडून शासनाच्या त्या अध्यादेशाचा दुरूपयोग करण्यात येत असल्याने शासनाला लाखो रुपयाचा चुना या शाळांकडून लावल्या जात आहे. (वार्ताहर)