शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

निसर्गरम्य सिंधबोडी तलाव पर्यटन दृष्टीने उपेक्षितच

By admin | Updated: May 11, 2014 00:08 IST

सिंदेवाही तालुका समृद्ध वनवैभवांनी नटलेला आहे. याच तालुक्यात सिंधबोडी तलाव आहे. तलावाच्या सभोवताल घनदाट जंगल आहे.

बाबुराव परसावार - सिंदेवाही

सिंदेवाही तालुका समृद्ध वनवैभवांनी नटलेला आहे. याच तालुक्यात सिंधबोडी तलाव आहे. तलावाच्या सभोवताल घनदाट जंगल आहे. नानाविध वन्यप्राणी व पक्षी या तलावात येतात. विदेशी पक्षीही या ठिकाणी अनेकदा येऊन जातात.अगदी ताडोबासारखे हे ठिकाण असतानाही वनविभागाने कधी सिंंधबोडी तलावाचा परिसर पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करण्याचे सौजन्य दाखविले नाही. त्यामुळे त्याचा पर्यटन विकास आराखडा तयार झाला नाही. हे ठिकाण उपेक्षितच राहिले. पर्यटन क्षेत्र म्हणून या तलावाला दर्जा देण्याची गरज सध्या वन्यप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे. सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील कचेपार जंगलातील कक्ष क्रमांक १३५(अ) मध्ये सिंधबोडी तलावाचा परिसर हे एक रमणीय स्थळ आहे. सिंदेवाहीपासून १० किलोमीटर अंतरावर कचेपार गाव घनदाट जंगलात आहे. कचेपारपासून पुर्वेस पाच कि.मी. अंतरावर सिंधबोडी तलाव आहे. हे ठिकाण जंगलाच्या मध्यभागी असून याला लागून खैरी व पवनपार तलाव आहेत. त्यामुळे सिंधबोडी तलावात भरपूर पाण्याचा साठा उपलब्ध आहे. तसेच तलावाला लागून डोंगर असल्यामुळे या ठिकाणी वन्यप्राण्यांना राहण्यासाठी नैसर्गिक वातावरण निर्माण झाले आहे. या तलावाच्या परिसरात मुक्तपणे हिंडणारे पशुपक्षी व वनराई पाहून मन प्रसन्न होते. तलावाच्या सानिध्यात वनराईने नटलेला व विस्तारलेला हा परिसर आहे. येथे मोठ्या संख्येने तृणभक्षी, मासभक्षी, वन्यप्राण्याशिवाय सरपटणारे प्राणी, औषधोपयोगी वनस्पती व प्रचंड वृक्ष यांची समृद्धता आहे. या परिसरात रानगवे, हरिण, सांबर, चितळ, भेडकी आदी तृणभक्षी प्राणी यांचा वावर आहे.या जंगलात साग, एन, बिजा,मोह, सालई, धावडा, किन्ही, पळस, आंजन, आवळा, हिरडा, बेहडा, चारोळी व इतर फळझाडाचा समावेश आहे.या तलावात परदेशी पाहुणे लाल तोंडाचा करकोचा, पांढरा बगडा, बारडी, पानकवडी, आस्ट्रेलियन पक्षी व इतर विविध प्रकारचे पक्षी पाण्यात विहार करताना आढळून येतात. तसेच हरिण, सांबर, चितळ, चौरसिंग, भेडकी, माकड, रानगवे, रानडुक्कर, ससा, आस्वल याचे कळप याशिवाय मोर, लांडोर, लावे, तितीर यांचा आवाज नेहमीच येत राहतो. लांब पिसारा असलेले मोर मनसोक्त फिरताना आढळून येतात. तसेच सायंकाळी पट्टेदार वाघ, बिबट, तडस, रानमांजर, रानकुत्रे व कोल्हा शिकारीच्या शोधात जंगलात भटकत असतात. या परिसरात वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी पक्षासाठी खाद्य म्हणून ‘देवधान’ या भात पिकाची लागवड केली आहे. त्यामुळे येथे विविध प्रकारचे पक्षी पाहावयास मिळतात. या तलावावर सर्व प्रकारचे वन्यप्राणी पाणी पिण्याकरिता येतात. या ठिकाणी २४ तास वनकर्मचारी राहत असल्याने व ठिकठिकाणी कॅमेरा लावल्याने अवैध शिकारीवर प्रतिबंध झालेला आहे. इको टुरिझम व जंगल सफारीसारखे पर्यटकांना आकर्षित करणारे विविध उपक्रम राबविल्यास हे ठिकाण जंगल पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित होऊ शकते. परंतु तसा प्रयत्नच आजवर करण्यात आलेला नाही. या क्षेत्राला उपेक्षितच ठेवण्यात आले आहे.