शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

रेती तस्करी बिघडवतेय पर्यावरणाचे संतुलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:41 IST

फोटो चंद्रपूर : सध्या रेती तस्करी जिल्ह्यात गंभीर समस्या होऊ लागली आहे. येथील विविध नदीघाटावरून दररोज शेकडो ब्रास रेतीचा ...

फोटो

चंद्रपूर : सध्या रेती तस्करी जिल्ह्यात गंभीर समस्या होऊ लागली आहे. येथील विविध नदीघाटावरून दररोज शेकडो ब्रास रेतीचा नियमबाह्य उपसा केला जात आहे. याचा पर्यावरणाला मोठा फटका बसत आहे. यामुळे नद्यांचे पात्र रुंद व खोल झाले असून नैसर्गिक पात्रच बदलले आहे. शिवाय कृत्रिम पुरामुळे नदीकाठची शेकडो हेक्टर शेतजमीन खरवडून निघाली आहे.

जिल्ह्यात वर्धा, वैनगंगा, इरई, उमा, शिरणा आदी नद्या वाहतात. यातील वर्धा नदी जिल्ह्यातील बहुतांश गावांची जीवनदायिनी आहे. या नद्यांसोबत अनेक मोठे नालेही जिल्ह्यातून वाहतात. या सर्व नद्यांच्या विविध ठिकाणी असलेल्या घाटांवरून सध्या मोठ्या प्रमाणात अवैधरित्या रेतीचा उपसा होत आहे.

घुग्घूस परिसरातील नकोडा, घुग्घुस, घोडेघाट, वढा, नायगाव, चिचोली या घाटांवर तर रेती उपस्यामुळे वर्धा नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडले आहेत. जेसीबी, पे लोडर, पोकलॅन्डच्या साहाय्याने हा उपसा होत आहे. यासोबतच बल्लारपूर, भद्रावती, वरोरा तालुक्यातील वर्धा नदीच्या पात्राची अशी अवस्था झाली आहे. नदीचे नैसर्गिक पात्रच बदलले आहे. इरई, उमा, वैनगंगा या नद्यांचीही अशी अवस्था झाली आहे. रेतीच्या उपस्यामुळे नदीपात्रातील माती खरडून वाहून जाते. यामुळे घुग्घूस, मूल, भद्रावती, वरोरा, ब्रह्मपुरी आदी तालुक्यातील नदीकाठच्या शेकडो हेक्टर शेतात दरवर्षी पावसाळ्यात कृत्रिम पूर येतो. एकेकाळी सुपिक असलेली ही शेतजमीन आता खरडून निघत आहे.

बॉक्स

जलजन्य वनस्पती, प्राण्यांना फटका

नदीपात्रातील रेतीचे वाट्टेल तसे खनन केले जात असल्याने जलजन्य वनस्पती, किटक, जलचर प्राण्यांची अंडी नष्ट होत आहे. यामुळे नद्यांच्या परिसंस्थेला बाधा पोहचत आहे.

बॉक्स

जिल्ह्यात ५४ रेती घाट

चंद्रपूर जिल्ह्यात एकूण ५४ रेती घाट लिलाव प्रक्रियेत समाविष्ट केले आहेत. यातील ३४ रेतीघाटांसाठी जनसुनावणी नुकतीच घेण्यात आली. त्यात पाच रेती घाट नामंजूर करण्यात आले आहे. अद्याप कोणत्याच घाटाचा लिलाव झालेला नाही. प्रक्रिया सुरू असल्याचे जिल्हा खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम यांनी सांगितले.

बॉक्स

दरवर्षी २५ कोटींचा महसूल

जिल्ह्यातील प्रस्तावित ५४ रेतीघाटांच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे २५ कोटींचा महसूल मिळतो. यावर्षी घाटांचा लिलाव झाला नसल्याने या महसुलापासून शासनाला मुकावे लागले आहे.

बॉक्स

प्रशासनाकडून केवळ अधेमधे कारवाई

रेती उपशामुळे पर्यावरणाचा ºहास होत आहे. वर्धा, वैनगंगासारख्या मोठ्या नद्यांचे पात्र बदलत आहे. असे असताना प्रशासनाकडून पाहिजे तशा उपाययोजना नाही. अधेमधे रेती वाहतूक किंवा रेती उपसा करताना कारवाई करण्यापलिकडे प्रशासनाने काहीही केलेले नाही.

कोट

रेती उपशामुळे नद्यांचे पात्र रुंद व खोल होत आहे. यामुळे नद्यांची इको सिस्टीम धोक्यात येत आहे. जैविक वनस्पती, किटकवर्गीय जलजन्य प्राणी नष्ट होत आहेत. प्रशासनाने अवैध रेतीचा उपसा आता थांबविणे गरजेचे आहे. अन्यथा पर्यावरणाचे मोठे नुकसान होईल.

-प्रा. सुरेश चोपणे,

पर्यावरण अभ्यासक व अध्यक्ष,

ग्रिन प्लॅनेट सोसायटी, चंद्रपूर.